शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
4
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
5
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
6
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
7
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
8
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
9
सलमान खान फायरिंग प्रकरणात आत्महत्या करणाऱ्या आरोपीच्या कुटुंबाची मुंबई उच्च न्यायालयात धाव, सीबीआय चौकशीची मागणी
10
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
11
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
12
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
13
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
14
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
15
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
16
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

'मोदी सरकारच्या 'राष्ट्रवादा'मुळे देशाच्या फाळणीचा धोका!'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 10:31 AM

सर्जिकल स्ट्राईकमधून राष्ट्रवाद पुढे आणला जात असला तरी यामुळे देशाच्या फाळणीचा धोका मोठा आहे, अशी भीती खासदार कुमार केतकर यांनी व्यक्त केली. 

ठळक मुद्देसोलापूर लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ खासदार कुमार केतकर सोलापूर दौºयावरलोकांचा असंतोष वाढत असल्याचे दिसल्यावर दिशाभूल करणारे असे नवे फंडे हे सरकार आणत आहे - केतकरसुरक्षेचा इतका गाजावाजा केला जातोय की यावरून भाजप नेत्यांचा इतिहास व भूगोल कच्चा दिसत आहे - केतकर

सोलापूर : मागील निवडणुकीत गुजरात मॉडेल दाखवून मोदी सरकार सत्तेवर आले, पण पाच वर्षांत यश न आल्याने आता राष्ट्रवाद पुढे करून जनतेला वेड्यात काढण्याचे काम सुरू आहे. भाजप नेत्यांचा इतिहास व भूगोल कच्चा असल्याचे दिसत आहे. सर्जिकल स्ट्राईकमधून राष्ट्रवाद पुढे आणला जात असला तरी यामुळे देशाच्या फाळणीचा धोका मोठा आहे, अशी भीती खासदार कुमार केतकर व्यक्त केली. 

सोलापूर लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ खासदार कुमार केतकर सोलापूर दौऱ्यावर आले होते. काँग्रेस भवनात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना मोदी सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली. सन २0१४ मध्ये गुजरात मॉडेल समोर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्ता हातात घेतली, पण पाच वर्षांतील अपयश झाकण्यासाठी विविध प्रयोग केले. मनमोहनसिंग पंतप्रधान असताना इंधनाचे दर काय होते़ आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलरवरून इंधनाचे भाव ठरतात. डॉलर खाली आला तरी देशात इंधनाचे दर उतरले नाहीत. याबाबत विचारणा केली तर सर्जिकल स्ट्राईकचे कारण पुढे केले. सुरक्षेचा इतका गाजावाजा केला जातोय की यावरून भाजप नेत्यांचा इतिहास व भूगोल कच्चा दिसत आहे. 

सर्जिकल स्ट्राईक यापूर्वीही झाले आहेत, असे खासदार केतकर यांनी सांगितले. यातून काय मिळाले, पाकिस्तानची फाळणी झाली, हा झाला इतिहास. त्यानंतर बांगलादेश निर्माण झाला, हे झाले भूगोल. काश्मीरसाठी कलम ३७0 रद्द करण्याची भाषा केली जातेय. यातून काय होईल. हे कलम काय फक्त काश्मीरसाठी नाही तर इतर राज्यांसाठी लागू आहे. हे कलम रद्द झाले तर देशाचे तुकडे पडतील. केवळ आपले अपयश झाकण्यासाठी मोदी सरकार अशी नवीन प्रकरणे समोर आणत आहे. सर्जिकल स्ट्राईकबाबत वाद निर्माण झाल्यावर लगेच क्षेपणास्त्र सोडण्यात आले. नीरव मोदी, विजय मल्ल्याचे विषय आल्यावर तलाकचे प्रकरण आणले. लोकांचा असंतोष वाढत असल्याचे दिसल्यावर दिशाभूल करणारे असे नवे फंडे हे सरकार आणत आहे, असा आरोप केतकर यांनी  केला.

 यावेळी माजी आमदार निर्मलाताई ठोकळ, शहर अध्यक्ष प्रकाश वाले, वात्रटीकाकार रामदास फुटाणे, राजन कामत आदी उपस्थित होते. 

उत्पन्न दुप्पट झाले का?सन २0२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची मोदी सरकारने घोषणा केली होती. उत्पन्नाचे सोडाच शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव दिला नाही, कर्ज माफ केले नाही. याउलट चार वर्षांत उद्योगपतींचे ६ लाख कोटींचे कर्ज माफ केल्याचा आरोप खासदार केतकर यांनी केला. दहा वर्षांत औद्योगिक कर्जमाफीची आकडेवारी ८ कोटींची आहे. त्यात मोदी सरकारने मोठा टप्पा गाठला. 

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsolapur-pcसोलापूरBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019