शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याच्या प्रश्नांसाठी आमदार विधानसभेत आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:20 IST

आमदार सातपुते यांनी विधानसभेत शेतकऱ्यांना वीज बिलाची होळी, माळशिरस तालुक्यातील एमआयडीसीचा प्रश्न, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न, राष्ट्रीय महामार्गासाठी ...

आमदार सातपुते यांनी विधानसभेत शेतकऱ्यांना वीज बिलाची होळी, माळशिरस तालुक्यातील एमआयडीसीचा प्रश्न, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न, राष्ट्रीय महामार्गासाठी भूसंपादनाचा प्रश्न यावर आवाज उठवून तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली. लक्ष वेधण्यासाठी त्यांनी विधानभवनात गळ्यात विद्युत पंप व स्टार्टर अडकवून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठविला. याचवेळी त्यांनी वीज बिल फाडले.

अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी तालुक्यातील कृषी संवर्धनाच्या फळपीक विमा, पशुधन अधिकारी यांच्या रिक्त जागा, शेततळे, शेतकऱ्यांचे हितार्थ असे अनेक विषयांवर विधानसभेत प्रश्न उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले. शेतकऱ्यांच्या बाबतीत काढलेले चुकीचे अध्यादेश शासनाने त्वरित मागे घ्यावेत, अशी मागणी त्यांनी सभापतींकडे केली.

या वर्षी सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन महापूर आला. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. त्यामुळे तब्बल ३१ हजार १५० फळपीक शेतकऱ्यांनी विमा उतरविला आहे. तरीही या शेतकऱ्यांना शासनाने काढलेल्या जीआरमुळे फळपीक विमा मिळणार नाही. तरी हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी केली.

पोषण आहारावर उठवला आवाज

बालके व गर्भवती स्त्रियांच्या पोषण आहार संदर्भात आमदार संजयमामा शिंदे यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला. पोषण आहार शिजवण्याचे ११ वर्षांपासूनचे कंत्राट अचानक बंद झाल्यामुळे राज्यातील हजारो बचत गटांतील महिलांवर उपासमारीची वेळ आली आहे. महिला बचत गट हे महिलांच्या आर्थिक स्तर उंचावण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्यामुळे बचत गटातील स्थानिक महिलांचा रोजगार जाऊ न देता आहाराचे केंद्रीकरण व खासगीकरण न करता पूर्वीप्रमाणेच महिला बचत गटांना शालेय पोषण आहाराचे काम देण्यात यावे, अशी मागणी आमदार शिंदे यांनी केली होती.

विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सोलापूर जिल्ह्याचा पाणीप्रश्न, अतिवृष्टीची नुकसान भरपाई, कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रश्न रेंगाळला आहे. स्थिरीकरण योजनेकडे राजकीय हेतूने पाहिले जाऊ नये. स्थिरीकरण योजनेकडे राजकीय हेतूने पाहिले जाऊ नये, अशी मागणी सभागृहात केली.

३४५० शेततळी रेंगाळली

कोरोना संसर्गाच्या काळात व्हेंटिलेटर व ऑक्सिजनचा तुटवडा, दुष्काळ, अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती या नैसर्गिक संकटग्रस्तांना नुकसानभरपाई देताना प्रशासनाची झालेली संभ्रमावस्था, हमीभावाने शेतकऱ्यांकडून पूर्ण मका खरेदी केली गेली नाही. पोल्ट्री व दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये परीक्षा चालू असताना त्यांचे वीज कनेक्शन तोडणे यांसह जिल्ह्यातील ३४५० शेततळी रेंगाळली असून, त्यासाठी १६ कोटी ८० निधी मिळावा, अशा अनेक मुद्द्यांवर आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सभागृह व सरकारचे लक्ष वेधून घेतले.

माझे प्रश्न मार्गी : माने

मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी मी सत्तेतील आमदार असल्याने मतदारसंघातील प्रश्न त्या त्या विभागाच्या मंत्र्यांकडे मांडतो. ते सर्व प्रश्न मार्गी लागतात. त्यामुळे मला सभागृहात प्रश्न मांडण्याचे आवश्यकता भासत नसल्याचे सांगितले.

-

कुष्टरोग वसाहत निधीसाठी खास तरतूद हवी : प्रणिती शिंदे

अतिजोखमीच्या रुग्णांना लस देण्याची घाई केली जात आहे. त्यांना माहिती न देता लस दिल्याने साईड इफेक्टचा धोका आहे. रुग्णांची तपासणी करुनच ती लस दिली जावी यासह कुष्टरोग वसाहतीच्या इमारती जीर्ण झाल्या आहेत. विविध घरकूल आहेत मात्र या वसाहतीसाठी तरतूद नाही. त्यासाठी खास निधीची तरतूद करावी, यासाठी आ. प्रणिती शिंदे यांनी विधानभवात अधिवेशनामध्ये आवाज उठवला.