शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

भारत हिंदू राष्ट्र होणे आवश्यक

By admin | Updated: January 6, 2015 23:59 IST

हेमंत मणेरीकर : मालवणात हिंदू जनजागृती समितीची सभा

मालवण : हिंदू धर्माला बळकटी आणण्याकरीता व भारत देशाच्या प्रगतीकरीता हिंदू बांधवांनी संघटीत होणे गरजेचे आहे. भारत देश आज अनेक समस्या व विकृतींनी जखडला गेला आहे. यातून देशाची मुक्तता करावयाची असल्यास भारत हे हिंदू राष्ट्र होणे आवश्यक आहे, असे विचार हिंदू धर्म प्रचारक हेमंत मणेरीकर यांनी मालवण येथे पार पडलेल्या हिंदू धर्म जागृती सभेत व्यक्त केले.हिंदू जनजागृती समितीच्यावतीने मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या पटांगणावर रविवारी हिंदू धर्म जागृती सभा पार पडली. यावेळी स्वाती खाडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी हिंदू जनजागृती समितीचे सदस्य तसेच मालवण तालुक्यातील बहुसंख्य हिंदूधर्मीय नागरिक उपस्थित होते.यावेळी बोलताना हेमंत मणेरीकर म्हणाले, हिंदू धर्मातील लोक संघटीत नसल्याने त्याचा फायदा दुष्ट प्रवृत्तीकडून घेतला जात आहे. त्यामुळे हिंदूंनी संघटीत होऊन एकजुटीने अशा दुष्ट प्रवृत्तींना हद्दपार केले पाहिजे. त्यासाठीच हिंदूंमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी अशा सभा आयोजित केल्या जात आहे. आज देशात हिंदुत्ववादी पक्षांचे सरकार आहे. तरीही अशा सभा घ्याव्या लागत आहेत. आज हिंदू धर्मावर गोहत्या, धर्मांतरण, दहशतवाद लव जिहाद अशाप्रकारे विविध मार्गांनी अत्याचार होत आहेत. यामुळे केवळ भारतातीलच नव्हे तर पाकिस्तान व बांग्लादेश या देशांमध्ये राहणाऱ्या हिंदुंचेही जगणे मुश्किल झाले आहे. धर्मनिरपेक्षता व सर्वधर्मसमभाव यांच्या विळख्यात हिंदू धर्म सापडला आहे. यामुळे भारतात अत्याचार, दहशतवाद, भ्रष्टाचार, घोटाळे असे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे भारताला सुस्थितीत आणण्यासाठी हिंदू राष्ट्र होणे आवश्यक आहे. त्यासाठी हिंदू धर्मवीर निर्माण झाले पाहिजेत असेही मणेरीकर म्हणाले.यावेळी बोलताना स्वाती खाडे म्हणाल्या, आज हिंदूधर्मीय पाश्चात्य प्रवृत्तींच्या आहारी जात आहेत. त्यामुळे हिंदू संस्कृतीला धोका निर्माण होत आहे. धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदूधर्मीय अशा प्रवृत्तींकडे ओढले जात आहेत. हिंदूच्या परंपरा व सणांवर काही धर्मद्रोही आरोप करून पर्यावरणाच्या नावाखाली हिंदूधर्मियांना फसवत आहेत. हिंदू देवतांच्या मूर्ती, मंदिरे यांची धर्मद्रोही लोकांकडून विटंबना केली जात आहे. मात्र, याबाबत कोणीही पुढे येवून आवाज उठवित नाही. त्यामुळे हिंदू धर्म व हिंदू संस्कृती निरंतर टिकविण्यासाठी भारत हे हिंदू राष्ट्र म्हणून अस्तित्वात येणे गरजेचे आहे. यासाठी हिंदूंनी संघटीत व्हावे तसेच हिंदू जनजागृती समिती हिंदू राष्ट्र निर्माण होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही असेही स्वाती खाडे म्हणाल्या. (प्रतिनिधी)