शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
2
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
3
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
4
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
5
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
6
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
7
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
8
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
9
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
10
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
11
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
12
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
13
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
14
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
15
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
16
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
17
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
18
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
19
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
20
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल

भारत हिंदू राष्ट्र होणे आवश्यक

By admin | Updated: January 6, 2015 23:59 IST

हेमंत मणेरीकर : मालवणात हिंदू जनजागृती समितीची सभा

मालवण : हिंदू धर्माला बळकटी आणण्याकरीता व भारत देशाच्या प्रगतीकरीता हिंदू बांधवांनी संघटीत होणे गरजेचे आहे. भारत देश आज अनेक समस्या व विकृतींनी जखडला गेला आहे. यातून देशाची मुक्तता करावयाची असल्यास भारत हे हिंदू राष्ट्र होणे आवश्यक आहे, असे विचार हिंदू धर्म प्रचारक हेमंत मणेरीकर यांनी मालवण येथे पार पडलेल्या हिंदू धर्म जागृती सभेत व्यक्त केले.हिंदू जनजागृती समितीच्यावतीने मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या पटांगणावर रविवारी हिंदू धर्म जागृती सभा पार पडली. यावेळी स्वाती खाडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी हिंदू जनजागृती समितीचे सदस्य तसेच मालवण तालुक्यातील बहुसंख्य हिंदूधर्मीय नागरिक उपस्थित होते.यावेळी बोलताना हेमंत मणेरीकर म्हणाले, हिंदू धर्मातील लोक संघटीत नसल्याने त्याचा फायदा दुष्ट प्रवृत्तीकडून घेतला जात आहे. त्यामुळे हिंदूंनी संघटीत होऊन एकजुटीने अशा दुष्ट प्रवृत्तींना हद्दपार केले पाहिजे. त्यासाठीच हिंदूंमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी अशा सभा आयोजित केल्या जात आहे. आज देशात हिंदुत्ववादी पक्षांचे सरकार आहे. तरीही अशा सभा घ्याव्या लागत आहेत. आज हिंदू धर्मावर गोहत्या, धर्मांतरण, दहशतवाद लव जिहाद अशाप्रकारे विविध मार्गांनी अत्याचार होत आहेत. यामुळे केवळ भारतातीलच नव्हे तर पाकिस्तान व बांग्लादेश या देशांमध्ये राहणाऱ्या हिंदुंचेही जगणे मुश्किल झाले आहे. धर्मनिरपेक्षता व सर्वधर्मसमभाव यांच्या विळख्यात हिंदू धर्म सापडला आहे. यामुळे भारतात अत्याचार, दहशतवाद, भ्रष्टाचार, घोटाळे असे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे भारताला सुस्थितीत आणण्यासाठी हिंदू राष्ट्र होणे आवश्यक आहे. त्यासाठी हिंदू धर्मवीर निर्माण झाले पाहिजेत असेही मणेरीकर म्हणाले.यावेळी बोलताना स्वाती खाडे म्हणाल्या, आज हिंदूधर्मीय पाश्चात्य प्रवृत्तींच्या आहारी जात आहेत. त्यामुळे हिंदू संस्कृतीला धोका निर्माण होत आहे. धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदूधर्मीय अशा प्रवृत्तींकडे ओढले जात आहेत. हिंदूच्या परंपरा व सणांवर काही धर्मद्रोही आरोप करून पर्यावरणाच्या नावाखाली हिंदूधर्मियांना फसवत आहेत. हिंदू देवतांच्या मूर्ती, मंदिरे यांची धर्मद्रोही लोकांकडून विटंबना केली जात आहे. मात्र, याबाबत कोणीही पुढे येवून आवाज उठवित नाही. त्यामुळे हिंदू धर्म व हिंदू संस्कृती निरंतर टिकविण्यासाठी भारत हे हिंदू राष्ट्र म्हणून अस्तित्वात येणे गरजेचे आहे. यासाठी हिंदूंनी संघटीत व्हावे तसेच हिंदू जनजागृती समिती हिंदू राष्ट्र निर्माण होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही असेही स्वाती खाडे म्हणाल्या. (प्रतिनिधी)