शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

पर्यावरण संवर्धनाचे मॉडेल अंमलात आणावे; पर्यावरण तज्ज्ञांची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2020 12:11 PM

सोलापूर जिल्ह्यात पाण्याच्या जास्त वापरावर यावे नियंत्रण 

ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्यात पडणाºया पावसामध्ये फार मोठा बदल झाला नाहीगरज पूर्ण करण्यासाठी पाण्याच्या वाढत्या वापरावर नियंत्रण आणायला हवेभूजल पातळी खाली गेली तर त्याचा नदी व वनावरही परिणाम होतो

 शीतलकुमार कांबळे 

सोलापूर : जगाच्या एखाद्या विशिष्ट भागात अमूक एक मॉडेल राबविले म्हणजे आपल्याकडेही तेच मॉडेल उपयोगी पडेल असे नाही. त्या मॉडेलचा शास्त्रीय अभ्यास करुन त्या भागातील परिस्थितीबाबत संशोधन करुन पर्यावरण संवर्धनाचे नवे मॉडेल तयार करायला हवे.

सोलापूर जिल्ह्यात पडणाºया पावसामध्ये फार मोठा बदल झाला नाही. पण, लोकसंख्या वाढत आहे. या सर्वांची गरज पूर्ण करण्यासाठी पाण्याच्या वाढत्या वापरावर नियंत्रण आणायला हवे. भूजल पातळी खाली गेली तर त्याचा नदी व वनावरही परिणाम होतो. सध्या भूजल पातळी वाढविण्यासाठी प्रयत्न होत आहेत; पण या प्रयत्नापेक्षा जमिनीतून पाण्याचा उपसा जास्त होत आहे. 

मागील २० वर्षांत पर्यावरणामध्ये बदलही झाला. करमाळा, माढा हा भाग पाण्याने समृद्ध झाला; मात्र, बार्शी, अक्कलकोट हा भाग अद्यापही पावसावरच अवलंबून आहे. तसेच वाळूचा उपसा वाढल्याने जमिनीची पाणी साचवून ठेवण्याची क्षमता  कमी होत आहे. वसुंधरा महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. बापू राऊत यांनी सोलापूर शहरातील पर्यावरणीय समस्यांचा भौगोलिक अभ्यास या विषयावर संशोधन केले आहे. त्यांच्या संशोधनानुसर जगभरात पर्यावरणात बदल होत आहेत. त्यात सोलापूर जिल्ह्याच्या पर्यावरणातही बदल होत असल्याचे दिसून येत आहे. राज्याच्या तुलनेत सोलापूर जिल्ह्यामध्ये खूप कमी पाऊस पडतो.  वाढत्या लोकसंख्येमुळे जलसिंचनाची साधने कमी पडू लागली. वाळूचा उपसा वाढला. मागील २० वर्षांमध्ये सरासरी तापमानात २ अंश सेल्सिअस इतकी वाढ झाली आहे. 

अमेरिकेतील कॅलिफोर्निया, इस्त्रायल या देशात कमी पाऊस पडतो. प्रत्येक थेंबाचा जास्तीत जास्त किती वापर करुन घ्यायचे याचे तंत्रज्ञान तिथे प्रगत झाले आहे. आपल्याकडील भागाचा विचार करुन काही तंत्रज्ञान आपल्याकडेही राबवता येईल, अशी अपेक्षा तज्ज्ञांनी व्यक्त केली.

सन 2000 ची स्थिती

  • 1. सोलापूर जिल्ह्याचे सरासरी तापमान हे ३५ अंश सेल्सिअस इतके होते. २००० मधील परिस्थितीनुसार हे तापमान कमी आहे. 
  • 2.  लोकसंख्येचा परिणामही पर्यावरणावर होतो.  सोलापूर जिल्ह्याची लोकसंख्या ही ३८ लाख ४९ हजार ५४३ इतकी होती.         
  • 3. भारतीय हवामान विभागाच्या सोलापूर शाखेच्या माहितीनुसार जिल्ह्यात सरासरी ५४० मिलीमीटर इतका पाऊस पडत होता.          
  • 4. १९८० मध्ये बांधल्या गेलेल्या उजनी धरणामुळे करमाळा, पंढरपूर, बार्शी, माढा, मंगळवेढा येथे हिरवळ वाढीस लागत होती.                     
  • 5. एकूणच जिल्ह्याचा विचार केला असता, सरासरी ६० फुटावर बोअर आणि विहिरीला पाणी लागत होते. 

सध्याची स्थिती

  • 1. सध्याची परिस्थिती पाहता सरासरी तापमानात २ अंश सेल्सिअसने वाढ झाली असून आता ते ३७ अंश सेल्सिअस इतके आहे.
  • 2. भारतीय राष्ट्रीय जनगणना अहवालानुसार जिल्ह्याची लोकसंख्या ४६ लाख १७ हजार ७५६ इतकी आहे. सुमारे आठ लाखांची वाढ.               
  • 3. जिल्ह्यात सरासरी ३७७ मिलीमीटर इतका पाऊस पडतो. २० वर्षांत १६३ मिलीमीटरची घट दिसून येते.            
  • 4. करमाळा, पंढरपूर, मंगळवेढा, परिसरात ५ टक्क्यांनी वनाची वाढ होताना दिसत आहे. तर जवळच्या इतर भागांनाही फायदा होतोय.    
  • 5. आजची परिस्थिती पाहता पाण्याच्या पातळीत घट झाली आहे. सध्या सरासरी ४०० फुटांवर पाणी लागते.

पर्यावरणपूरक जीवनशैलीसाठी...

  • 1. नागरिकांनी आपले दैनंदिन कर्बउत्सर्जन कमी करावे. त्यासाठी कर्बपदचिन्हे, जलपदचिन्हे, पर्यावरणीय पदचिन्हे समजून घेऊन कमीत कमी करून जगावे.
  • 2. आपले अन्न शक्यतो स्थानिक पातळीवरील विकत घ्यावे.
  • 3. वस्तू खरेदी करताना त्याचा छुपा वा प्रत्यक्ष पर्यावरणावर
  • काय परिणाम होणार आहे, त्याचा विचार करावा आणि ती वस्तू घ्यायची की नाही, ते ठरवावे.
  • 4. पर्यावरणावर आणि कर्बउत्सर्जन कमी करण्यासाठी जागरूकपणे व्यक्त व्हा.
  • 5. पाणी किती अंतरावरून येते ते पाहावे. लांबून येत असेल, तर कर्बउत्सर्जन वाढते. पाण्याचा पुनर्वापर करणाºयांना सवलत द्यावी आणि जे करीत नाहीत त्यांना शिक्षा व्हावी.
  • 6. निसर्ग आॅक्सिजन देतो. आपण निसर्गाला काय परत देतो, याचा विचार करा. भावी पिढीला आॅक्सिजन मुबलक मिळावा म्हणून झाडे लावा.
  • 7. शेतकरी, आदिवासी हे झाडांचे रक्षण करतात. त्यांना सरकारने अनुदान द्यावे. मग लोक झाडे जपतील.
  • 8. कोणताही प्रकल्प आणताना त्याचा तत्काळ होणारा फायदा न पाहता भविष्यातील आपत्तीवर विचार व्हावा.
  • 9. बायोडिझाईन तयार करून इमारती उभ्या राहिल्या, तर निसर्ग आपत्ती आणणार नाही.
  • 10. शहरे हरित करण्यासाठी प्रयत्न करायला हवा. त्यासाठी सरकारने प्रोत्साहन द्यावे.
टॅग्स :Solapurसोलापूरenvironmentपर्यावरणwater shortageपाणीकपातwater pollutionजल प्रदूषण