शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

Maharashtra Election 2019; विकासाचा अजेंडा नसलेल्या सरकारला सत्तेपासून दूर करा : प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 1:19 PM

करमाळ्यात वंचित बहुजन आघाडीची जाहीरसभा

ठळक मुद्दे- प्रकाश आंबेडकर विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराासाठी सोलापूर दौºयावर- प्रचार सभेदरम्यान भाजप-शिवसेनेच्या कार्यपध्दतीवर आंबेडकरांनी टीका- वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा वेग वाढला

करमाळा : गेल्या पाच वर्षांत राज्यात भाजप-सेनेचे सरकार आपले नव्हते. आपले सरकार कोणाला म्हणावयाचे ? जे सरकार सत्तेवर आल्यावर संकटाच्या वेळी जनतेसाठी धावून येते. गेल्या पाच वर्षांत राज्यामध्ये ज्या ज्या वेळी जनतेवर संकटे आली त्या वेळी हे सरकार धावून आले नाही. या सरकारसमोर विकासाचा कोणताच अजेंडा नाही. त्यामुळे या सरकारला सत्तेपासून दूर करा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले. 

करमाळा येथे आले असता आंबेडकर बोलत होते.  प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादी पक्ष नालायक आहेत, हे खरे आहे. मात्र गेल्या पाच वर्षांमध्ये तुम्ही काय केले ते सांगा, असा भाजप-शिवसेनेला टोला लगावला़ तुमच्याकडे विकासाचा अजेंडा नसल्यामुळे तुम्ही फक्त देशभक्तीच्या गप्पा मारत देशातील जनतेला वेठीस धरून त्यांची पिळवणूक करत आहात. देशातील व राज्यातील विरोधक संपविण्याचे काम एका बाजूला तुम्ही करत असताना दुसºया बाजूला चळवळीमध्ये काम करणाºया व्यक्तींवर खोटेनाटे आरोप करून त्यांना जेलमध्ये टाकण्याचे काम करत आहात, असे त्यांनी सांगितले.

सोलापूर जिल्ह्याचे हक्काचे पाणी नाहक टाटा व बिर्ला यांना विकण्याचे काम करण्यात आलेले आहे. धरण त्यांनी जरी बांधलेले असले तरी पाणी मात्र आमच्या हक्काचे आहे, असेही आंबेडकर म्हणाले़ यावेळी अतुल खुपसे, अ‍ॅड. विजय मोरे, सुभाष ओहोळ, देवा लोंढे यांची प्रमुख उपस्थिती होती़

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीkarmala-acकरमाळा