शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

गणेशमूर्ती विसर्जनासाठी आणल्या; संकलन केंद्रात जमा करून परतले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 11:49 AM

पाच दिवसांच्या गणरायाला निरोप : तलावकाठी पोलिसांचा बंदोबस्त

सोलापूर : दीड दिवस अन् त्यानंतर पाच दिवसांच्या गणरायाला भक्तिभावाने निरोप दिला. कंबर तलावावर मूर्ती विसर्जनासाठी आणल्या खऱ्या. मात्र, काहींनी गुपचुपपणे पाण्यात मूर्तींचे विसर्जन केले, तर बहुतांश भक्त संकलन केंद्रात मूर्ती जमा करून तेथून परतले. तलावाकाठी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

काही भक्तगण गणपती विसर्जन करण्यासाठी मंगळवारी दुपारी कंबर तलाव येथे आले. तेथे पोलिसांनी त्यांना अटकाव करत त्यांना इंदिरा नगर येथील रामलिंग नगर येथील विहिरीवर जाण्यास सांगितले. तेथे गेल्यानंतर पोलिसांनी विहिरीत विसर्जन करता येणार नाही, असे सांगितले. यामुळे मूर्तींचे विर्सजन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी लगेच मूर्ती संकलन करण्यास सुरुवात केली; पण तेथे संकलन करण्यासाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे तेथे भक्तांमध्ये काही काळ संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. सकाळी रामलिंग नगर येथे मनपा कर्मचाऱ्यांकडूनच विसर्जन सुरू होते. सायंकाळी मात्र विसर्जन बंद करण्यात आले, अशी माहिती प्रशांत माने यांनी दिली.

सायंकाळी कंबर तलाव परिसरात विसर्जन

विसर्जनस्थळी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परिसरात नागरिकांकडून विसर्जन करण्यात येत नव्हते; पण रात्र होताच कंबर तलाव परिसरात अंधारात अनेक भक्त येऊन पूजा करतात. गणपतीचे विधिवत विसर्जन करतानाचे चित्र पाहायला मिळाले.

श्रींची विसर्जनाची सोय महानगरपालिकेने करणे गरजेचे आहे. सकाळी कंबर तलाव येथे विसर्जनासाठी गेल्यानंतर तेथे आम्हाला विसर्जन न करू देता रामलिंग नगर येथे पाठवण्यात आले. तिथे महिला पोलीस अधिकारी आल्या आणि त्यांनी विसर्जन करू नका, असे सांगत मूर्ती गोळा करण्याच्या सूचना दिल्या. आम्हाला कळलेच नाही, गणपतींचे विसर्जन होणार की संकलन होणार. त्यामुळे त्याबाबत आम्ही तेथील मनपा कर्मचाऱ्यांना विचारले असता त्यांनाही याबाबतची कोणतीही कल्पना नव्हती. यामुळे आम्हा भक्तांचा विसर्जनावेळी गोंधळ उडाला.

-डॉ. किशोर सावंत

टॅग्स :SolapurसोलापूरGanesh Mahotsavगणेशोत्सवSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस