शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

दुहेरीकरण, विद्युतीकरण अन् रेल्वे ट्रॅक दुरुस्तीचे काम शेतकऱ्यांनी थांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 10:52 IST

मोबदला मिळेना - बाळे रेल्वेस्थानक परिसरातील शेतकरी आक्रमक

आप्पासाहेब पाटील

सोलापूर - १६ वर्षांपूर्वी घेतलेल्या जमिनीचा मोबदला अद्याप न दिल्याने संतप्त झालेल्या बाळे स्थानक परिसरातील शेतकऱ्यांनी दुहेरीकरण, विद्युतीकरण अन् रेल्वे ट्रॅक दुरुस्तीचे काम थांबविले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या या भूमिकेमुळे रेल्वे प्रशासनासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे.

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील दुहेरीकरणाच्या कामासाठी २००६ साली जमिनीचे भूसंपादन झाले. त्यावेळी योग्य तो मोबदला देऊ असे सांगितले; मात्र रेल्वेने अद्याप त्या परिसरात कामच सुरू केले नव्हते. मागील महिन्यांपासून या परिसरात विद्युतीकरणाचे काम सुरू झाले; मात्र शेतकऱ्यांनी हे काम थांबविले. आता रेल्वे ट्रॅकची दुरुस्ती व लेव्हल क्रॉसिंग रोडच्या दुरुस्तीसाठी रेल्वे क्रॉसिंग गेट क्रमांक ५४ बंद करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, सोलापूर शहर पोलिसांनी बाळे ते केगाव रस्ता बंद असल्याचे जाहीर करून पर्यायी वाहतुकीने वाहतूक करण्याचे प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले; मात्र मागील दोन दिवसांपासून रेल्वेचे सुरू असलेले काम मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्यांनी थांबविल्याने रेल्वे प्रशासनाची मोठी अडचण निर्माण झाली आहे.

-----------

जिल्हाधिकारी कार्यालय कागदीघोडे नाचवते

फेब्रुवारी महिन्यात संतप्त शेतकऱ्यांनी कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी तत्कालीन उपजिल्हाधिकारी दीपक शिंदे यांनी शेतकऱ्यांची समजूत काढून योग्य मोबदला देण्याचे सांगितले. त्यानंतर शेतकऱ्यांनी ते मान्य करून संमतीपत्रावर सह्या केल्या. दरम्यान, शिंदे यांना सेवेतून निलंबित करण्यात आले. त्यानंतर भूसंपादन पदाचा पदभार समिंदर यांच्याकडे आला. त्यांनी त्या जमिनीचा मोबदला देण्यासाठी नवा दर काढला. त्या दराला शेतकऱ्यांनी विरोध केला. नवा दर हवा असेल तर तसा प्रस्ताव द्या असे भूसंपादन विभागाकडून सांगण्यात आले. मागील काही वर्षांपासून फक्त जिल्हाधिकारी कार्यालय कागदीघोडे नाचवत असल्याचा आरोप अमोल काळजे, विकास काळजे, गौराबाई जक्कापुरे, गौरीशंकर कराळे, भालचंद्र कराळे, रामचंद्र कराळे, अ.गफूर अ.सत्तार जमादार, संजय काळजे या शेतकऱ्यांनी केला आहे.

---------------

शेतकऱ्यांचा रेल्वेच्या कामास विरोध नाही. आम्हाला आमच्या जमिनीचा मोबदला द्या, मगच काम सुरू करा. आम्ही तुमच्या कामास सहकार्य करू. जिल्हाधिकारी कार्यालयामुळेच भूसंपादनाचे पैसे मिळण्यास उशीर होत आहे. यात रेल्वे विभागाची काहीच अडचण नाही. ते पैसे देण्यास तयार आहेत. फक्त जिल्हाधिकारी कार्यालयाने तसा अहवाल, प्रस्ताव देणे गरजेचे आहे.

- अमाेल काळजे, शेतकरी, बाळे रेल्वेस्थानक, सोलापूर

------------

रेल्वे पैसे देण्यास तयार पण...

संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला देण्यासाठी रेल्वे प्रशासन तयार असून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भूसंपादन विभागाकडून अंतिम अहवाल आला नसल्याने बाधित शेतकऱ्यांना पैसे मिळण्यास अडचण होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने अहवाल त्वरित दिल्यास आम्ही तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करू असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेCentral Governmentकेंद्र सरकारFarmerशेतकरीagricultureशेती