शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
2
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
3
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
4
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
5
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
6
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
7
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
8
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
9
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
10
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
11
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
12
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
13
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
14
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
15
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
16
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
17
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
18
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
19
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
20
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस

दुहेरीकरण, विद्युतीकरण अन् रेल्वे ट्रॅक दुरुस्तीचे काम शेतकऱ्यांनी थांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 10:52 IST

मोबदला मिळेना - बाळे रेल्वेस्थानक परिसरातील शेतकरी आक्रमक

आप्पासाहेब पाटील

सोलापूर - १६ वर्षांपूर्वी घेतलेल्या जमिनीचा मोबदला अद्याप न दिल्याने संतप्त झालेल्या बाळे स्थानक परिसरातील शेतकऱ्यांनी दुहेरीकरण, विद्युतीकरण अन् रेल्वे ट्रॅक दुरुस्तीचे काम थांबविले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या या भूमिकेमुळे रेल्वे प्रशासनासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे.

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील दुहेरीकरणाच्या कामासाठी २००६ साली जमिनीचे भूसंपादन झाले. त्यावेळी योग्य तो मोबदला देऊ असे सांगितले; मात्र रेल्वेने अद्याप त्या परिसरात कामच सुरू केले नव्हते. मागील महिन्यांपासून या परिसरात विद्युतीकरणाचे काम सुरू झाले; मात्र शेतकऱ्यांनी हे काम थांबविले. आता रेल्वे ट्रॅकची दुरुस्ती व लेव्हल क्रॉसिंग रोडच्या दुरुस्तीसाठी रेल्वे क्रॉसिंग गेट क्रमांक ५४ बंद करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, सोलापूर शहर पोलिसांनी बाळे ते केगाव रस्ता बंद असल्याचे जाहीर करून पर्यायी वाहतुकीने वाहतूक करण्याचे प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले; मात्र मागील दोन दिवसांपासून रेल्वेचे सुरू असलेले काम मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्यांनी थांबविल्याने रेल्वे प्रशासनाची मोठी अडचण निर्माण झाली आहे.

-----------

जिल्हाधिकारी कार्यालय कागदीघोडे नाचवते

फेब्रुवारी महिन्यात संतप्त शेतकऱ्यांनी कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी तत्कालीन उपजिल्हाधिकारी दीपक शिंदे यांनी शेतकऱ्यांची समजूत काढून योग्य मोबदला देण्याचे सांगितले. त्यानंतर शेतकऱ्यांनी ते मान्य करून संमतीपत्रावर सह्या केल्या. दरम्यान, शिंदे यांना सेवेतून निलंबित करण्यात आले. त्यानंतर भूसंपादन पदाचा पदभार समिंदर यांच्याकडे आला. त्यांनी त्या जमिनीचा मोबदला देण्यासाठी नवा दर काढला. त्या दराला शेतकऱ्यांनी विरोध केला. नवा दर हवा असेल तर तसा प्रस्ताव द्या असे भूसंपादन विभागाकडून सांगण्यात आले. मागील काही वर्षांपासून फक्त जिल्हाधिकारी कार्यालय कागदीघोडे नाचवत असल्याचा आरोप अमोल काळजे, विकास काळजे, गौराबाई जक्कापुरे, गौरीशंकर कराळे, भालचंद्र कराळे, रामचंद्र कराळे, अ.गफूर अ.सत्तार जमादार, संजय काळजे या शेतकऱ्यांनी केला आहे.

---------------

शेतकऱ्यांचा रेल्वेच्या कामास विरोध नाही. आम्हाला आमच्या जमिनीचा मोबदला द्या, मगच काम सुरू करा. आम्ही तुमच्या कामास सहकार्य करू. जिल्हाधिकारी कार्यालयामुळेच भूसंपादनाचे पैसे मिळण्यास उशीर होत आहे. यात रेल्वे विभागाची काहीच अडचण नाही. ते पैसे देण्यास तयार आहेत. फक्त जिल्हाधिकारी कार्यालयाने तसा अहवाल, प्रस्ताव देणे गरजेचे आहे.

- अमाेल काळजे, शेतकरी, बाळे रेल्वेस्थानक, सोलापूर

------------

रेल्वे पैसे देण्यास तयार पण...

संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला देण्यासाठी रेल्वे प्रशासन तयार असून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भूसंपादन विभागाकडून अंतिम अहवाल आला नसल्याने बाधित शेतकऱ्यांना पैसे मिळण्यास अडचण होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने अहवाल त्वरित दिल्यास आम्ही तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करू असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेCentral Governmentकेंद्र सरकारFarmerशेतकरीagricultureशेती