शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
2
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
3
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
4
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
5
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
6
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
7
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
8
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
9
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
10
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
11
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
12
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
13
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
14
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
15
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
16
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
17
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
18
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
19
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
20
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
Daily Top 2Weekly Top 5

एअरप्रुनिंग तंत्रज्ञानामुळे पहिल्याच वर्षी द्राक्षाचे उत्पादन, पिंपळगावच्या नितीन घावटे यांचा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 12:22 IST

अवघ्या दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या या शेतकºयाने आंतरराष्ट्रीयस्तरावरील तंत्रज्ञानाचा वापर करुन ही नवीन पध्दत विकसित केली

ठळक मुद्देअत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने द्राक्ष वाणाची काडीआंतरराष्ट्रीयस्तरावरील तंत्रज्ञानाचा वापरशेतीबरोबरच रोपनिर्मिती प्रक्रियाही सुरू

सुहास ढेकणे सोलापूर : पिंपळगाव (ता. बार्शी) येथील शेतकरी नितीन घावटे यांनी प्रत्यक्ष उत्पादन मिळवून देणारी एअरप्रुनिंग द्राक्षशेती विकसित केली आहे. यामुळे पहिल्याच वर्षी उत्पादन मिळणार असल्याने फायद्याचे ठरणार आहे. 

पारंपरिक लागवड पध्दतीने द्राक्षबागेतून उत्पन्न मिळवायचे म्हटले की, दोन वर्षांचा कालावधी जातो. रुटस्टॉक लागवड करुन एक वर्षात ते कलम करण्यासाठी पक्व होते. कलमानंतर वेल फाउंडेशनवर जाण्यासाठी पुन्हा वर्षभर वाट पाहावी लागते. त्यामध्ये वेळ, श्रम, पैसा यांचा मोठा खर्च सोसावा लागतो. मात्र आता एअरप्रुनिंग तंत्रज्ञानाद्वारे दोन वर्षांऐवजी पहिल्याच वर्षी उत्पादन मिळविता येणार आहे. या तंत्रज्ञानाद्वारे द्राक्षची यशस्वी लागवड घावटे यांनी केली आहे. या प्रयोगातून पिंपळगावचे माळरान फुलले आहे. आधुनिकतेची कास धरुन शेती केली तर शेती तोट्यात जाऊ शकत नाही, हे या शेतकºयाने दाखवून दिले आहे. 

अवघ्या दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या या शेतकºयाने आंतरराष्ट्रीयस्तरावरील तंत्रज्ञानाचा वापर करुन ही नवीन पध्दत विकसित केली आहे. याचा लाभ अन्य शेतकºयांनाही मिळावा, यासाठी त्यांनी शेतीबरोबरच रोपनिर्मिती प्रक्रियाही सुरू केली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने द्राक्ष वाणाची काडी व आपल्याला हवी असलेली उत्पादनाची काडी एकत्रित करून एकजीव करण्यात येते. प्रयोगशाळेत आवश्यक तापमानात त्या काडीला मुळी फुटते. त्यानंतर सात ते आठ दिवसांत रोप पूर्ण तयार होते. त्यामुळे पाहिजे त्या वाणाच्या कलमी रोपांची लागवड थेट शेतामध्ये करता येते. खूपच वेळखाऊ व प्रचलित प्रक्रियेतून कलम करणाºया असंख्य द्राक्ष उत्पादकांना आता उत्तम दर्जाची कलम केलेली रोपेच मिळणार आहेत. हे नवीन तंत्रज्ञान द्राक्ष शिवारात नुकतेच दाखल झाले असून, त्यामुळे उत्पादन वेळेत मोठी बचत होणार आहे. 

या नव्या पद्धतीत पूर्णपणे ग्राफ्ट (कलम) केलेले रोपच लागवड केले जात असल्यामुळे पहिल्याच वर्षापासून उत्पादन सुरू होते. प्रारंभी ग्राफ्टेड रोपांची लागवड काही ठिकाणी होत असली तरी त्यासाठी रोपवाटिका करणाºयास आधी एक वर्षापासून तयारी करावी लागते. नूतन तंत्रज्ञानात ग्राफ्टिंगसाठी यंत्रांचा वापर होत असल्यामुळे ते खात्रीशीर एकजीव होऊन त्यांना लवकर मुळ्या फुटण्यासाठी प्रयोगशाळेत योग्य त्या तापमानाची सोय केली जाते. त्यानंतर ठराविक तापमान व आर्द्रता असलेल्या एका चेंबरमध्ये रुटस्टॉक आणि सायन एकजीव करण्याची प्रक्रिया केली जाते. तिला ‘कॅलसिंग’ असे म्हणतात.

 काडीच्या खालच्या बाजूला कोकोपीट असलेले प्लग लावले जातात. त्यामुळे तिथे मुळ्या फुटतात. ती मुळी पुढील ३0 दिवसांत विकसित केली जाते. त्यानंतर पुढील आठ दिवस बाह्य वातावरणाची सवय करण्यासाठी प्रयत्न केले जातात. अशी ३८ दिवसांत ग्राफ्टिंगची प्रक्रिया पूर्ण होऊन रोप लागवडीयोग्य होते. या प्रक्रियेत रुट आणि वाणाची काडी सर्व बाजूने एकरुप होते. या नव्या तंत्रज्ञानात ग्राफ्टिंगसाठी यंत्रांचा वापर केला जातो. त्यामुळे ते १०० टक्के एकजीव होते. इतकेच नव्हे तर त्यांना लवकर मुळ्या फुटण्यासाठी प्रयोगशाळेत योग्य त्या तापमानाची सोय केली जाते. यामुळे वेळेमध्ये प्रचंड बचत होते. पारंपरिक पद्धतीशी तुलनात्मक एअरप्रुनिंग या प्रक्रियेत रुट आणि वाणाची काडी सर्व बाजूने एकरुप होते.

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र