शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे कळंबोलीत बत्ती गुल

By admin | Updated: June 14, 2017 03:15 IST

इन्फ्राच्या माध्यमातून कोट्यवधींची कामे करूनही पनवेल परिसरातील वीज वितरणचे व्यवस्थापन पहिल्याच पावसात फोल ठरले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

कळंबोली : इन्फ्राच्या माध्यमातून कोट्यवधींची कामे करूनही पनवेल परिसरातील वीज वितरणचे व्यवस्थापन पहिल्याच पावसात फोल ठरले आहे. सोमवारी रात्री झालेल्या जोरदार पावसात कळंबोलीतील महावितरणची यंत्रणा कोलमडून पडली. त्यामुळे मध्यरात्रीपर्यंत बहुतांश भागातील वीज गायब झाली, तर मंगळवारी सकाळी तीन तास बत्ती गुल होती. त्यामुळे कळंबोलीकरांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. सिडको वसाहतीत दिवसागणिक लोकवस्ती वाढत चालली आहे. त्याच प्रमाण वीजजोडण्यांची संख्या वाढत आहे. ग्राहकांच्या वाढत्या संख्येच्या विचार करता अनेक सुधारणा अपेक्षित असताना त्या केवळ कागदावरच आहेत. त्याचबरोबर एखाद्या वेळी वीजपुरवठा खंडित झाला तरी त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था करणे क्रमप्राप्त आहे. सिडको वसाहतीत वीजगळती व थकबाकीचे प्रमाण कमी आहे. मात्र तरीही नियमित वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा मिळत नाही. बत्ती गुल होणे ही नित्याचीच बाब झाली आहे. पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत रहावा याकरिता महावितरणने विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. मान्सूनपूर्व कामांसाठी उन्हाळ्यात पनवेल परिसरात दिवसभर शटडाऊन घेतला जात होता. मंगळवार तर महावितरणचा दुरूस्तीचा हक्काचा वार त्याचबरोबर मान्सूनपूर्व कामाच्या नावाखाली ग्राहकांना घामाघूम केले जात होते. मात्र त्याचा काही फायदा झाला नसल्याची प्रचिती सोमवारी कळंबोलीतील वीजग्राहकांना आली. या नोडमध्ये रात्री नऊ वाजता वीजपुरवठा खंडित झाला तो मध्यरात्री सुरळीत झाला. मंगळवारीही सकाळी साडेसहा वाजता गुल झालेली बत्ती दहा वाजता पूर्ववत झाली. यामुळे रहिवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. यासंदर्भात सहाय्यक कार्यकारी अभियंता ए. व्ही. पवार यांच्याशी संपर्क साधला असता तो होवू शकला नाही. विजेच्या प्रश्नावर सेना आक्र मकग्राहकांकडून नियमित वीज बिल भरण्याची अपेक्षा केली जाते. त्याचप्रमाणे सुरळीत व अखंडित वीजपुरवठा व्हावा मिळणे त्यांचा हक्क आहे. त्यानुसार योग्य उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी शिवसेनेच्या वतीने पनवेल विधानसभा संघटक दीपक निकम यांनी केली आहे, अन्यथा ग्राहकहितवर्धक भूमिका घेवून शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्याची येईल असा इशारा मंगळवारी निकम यांनी दिला. या संदर्भात पक्षाच्या वतीने कळंबोली उपविभागीय कार्यालयात पत्र देण्यात आले.