शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
2
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
3
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
4
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
5
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
6
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
7
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
8
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
9
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
10
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
11
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
12
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
13
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
14
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
15
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
16
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
17
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
18
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
19
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
20
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाची दाहकता; पाण्याअभावी हंजगी गावातील ग्रामस्थांनी केले स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 12:39 IST

हंजगी गावात तीव्र पाणीटंचाई; तलाव, बोअर, विहीर, अन्य पाण्याचे स्रोत पडले बंद

ठळक मुद्देगेल्या काही वर्षांपासून सतत पाणीटंचाईला सामोरे जात खडतर जीवन जगणाºया हंजगी ग्रामस्थांना पाणीटंचाईची समस्या पाचविला पुजलेली आहेया गावाला जानेवारीपासूनच तीव्र पाणीटंचाई भासत आहे. यामुळे येथून अनेक लोक पुणे, मुंबई यांसारख्या महानगरांत रोजगाराच्या निमित्ताने स्थलांतरित होत आहे

अक्कलकोट : गेल्या काही वर्षांपासून सतत पाणीटंचाईला सामोरे जात खडतर जीवन जगणाºया हंजगी ग्रामस्थांना पाणीटंचाईची समस्या पाचविला पुजलेली आहे. या गावाला जानेवारीपासूनच तीव्र पाणीटंचाई भासत आहे. यामुळे येथून अनेक लोक पुणे, मुंबई यांसारख्या महानगरांत रोजगाराच्या निमित्ताने स्थलांतरित होत आहेत. एकूणच या भागातील तलाव, बोअर, विहीर आदी प्रकारचे स्रोत कोरडेठाक पडल्याने भयावह स्थिती निर्माण झाली आहे.

एकेकाळी ऊसशेती, फळबाग व दुग्धव्यवसायासाठी प्रसिद्ध असलेले हंजगी गाव़ बोअर, विहीर घेईल तिथे पाणी लागत होते. या माध्यमातून नावारूपाला आलेले हंजगी गाव सध्या भीषण पाणीटंचाईचा सामना करीत आहे. मागील ५-६ वर्षांपासून या गावाला दर जानेवारीपासून पाणीटंचाई भासत आहे. 

दरवर्षी ग्रामस्थांना याचे हाल सोसावे लागत आहेत. याबरोबरच तालुक्यातील हंजगी, जेऊर, हंद्राळ, हालचिंचोळी, वळसंग, बॅगेहळ्ळी, करजगी, मंगरुळ या भागातसुद्धा तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. या भागात ५०० ते एक हजार फुटापर्यंत बोअरवेल घेऊन ही पाणी लागताना दिसत नाही. शासनाचे नियम धाब्यावर बसवून आज शेतकरी व नागरिक नवीन विहीर व बोअरवेल घेताना दिसतात. आज प्रत्येकाच्या शेतात दोन-दोन विहिरी व दोनपेक्षा अधिक बोअरवेल पाहायला मिळतात. यंदा मात्र या सर्व विहिरी व बोअरवेल कोरडे ठणठणीत पडले आहेत. यामुळेच या भागात सामान्य नागरिक, शेतकरी व जनावरे पाण्यासाठी वणवण भटकंती करताना दिसतात. उसाच्या पिकाला अधिक पाणी लागते़ ऊस शेतीतून अधिक उत्पादन मिळत असल्याने साहजिकच जास्तीत जास्त शेतकरी ऊस शेतीकडे वळले आहेत. अक्कलकोट तालुक्यात नेहमीच ऊस शेतीसाठी प्रसिद्ध असलेले हंजगी गाव सध्या पिण्याच्या पाण्यासाठी तीव्र संघर्ष करताना दिसते. 

दुग्धव्यवसाय अडचणीत- एकेकाळी शेतीबरोबर दुग्धव्यवसायासाठी प्रसिद्ध असलेल्या हंजगी गावात हालहळ्ळी, कोन्हाळी अशा तीन-चार गावचे गवळी लोक दूध संकलन करून सोलापूर येथे छोट्या हत्तीच्या साह्याने घेऊन जात होते. आता याच गावात पाणी-चारा टंचाई निर्माण झाली आहे. म्हणून दूधव्यवसाय मोडकळीस        आलेला आहे. तसेच उसाचे क्षेत्र नेहमी मोठ्या प्रमाणात होते. यामुळे एका शेतकºयाकडे तीन-तीन साखर कारखान्यांचे शेअर्स होते. तरीही कधी कधी अतिरिक्त ऊस होत होता. या शिवारातील १०० विहिरी, ५०० हून अधिक बोअर, तलाव आदी स्रोत कोरडेठाक पडल्याने या गावात सध्या पिण्याच्या पाण्यासाठी मारामारी होत आहे, अशी माहिती रशीद मुल्ला यांनी दिली़

टँकर सुरू, पण नियोजन नाही...- जानेवारीपासून हंजगी गावाला तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. आता महिनाभरापासून टँकरने पाणीपुरवठा होत असला तरी नियोजन नाही.            यामुळे ज्या ठिकाणी एनटीपीसी फताटेवाडी येथे रोज टँकर भरतो त्या       ठिकाणी कधी डिझेल नाही म्हणून तर कधी वीज नाही म्हणून ठरलेल्या तीन खेपा होत नाहीत. यामुळे ग्रामस्थांकडून ओरड होत असते. पाण्यासाठी  शाळकरी मुले, आबालवृद्ध नेहमी धडपडत असतात, अशी माहिती सरपंच     उमेश पाटील यांनी दिली.

साखर कारखानदारी वाढली..- गेल्या दहा ते पंधरा वर्षांखाली या भागात भरपूर ऊस होता. उसाचा पट्टा म्हणून  या गावाकडे पाहिले जायचे. म्हणूनच तालुक्यातील व जिल्ह्यातील सर्व कारखानदारांचे लक्ष या गावावर होते. गाळप हंगाम संपेपर्यंत गावातील ऊस टोळ्या हलत नव्हत्या. कधी कधी अतिरिक्त उसाचा प्रश्न या भागात निर्माण व्हायचा. या भागातील प्रत्येक शेतकरी पारंपरिक जुन्या पद्धतीने शेती करत असल्याने उसाच्या पिकासाठी भरपूर पाणी वाया जात असे. उसाच्या पिकाला पाणी कमी पडणार असे शेतकºयांना वाटले की, नवीन विहीर व बोअरवेल घ्यायला शेतकरी लगेच तयार व्हायचे. यामुळेच आज जमिनीतून पाण्याची  पातळी घटली आहे. या अतिरिक्त ऊस शेतीमुळेच आज या गावातील नागरिक व जनावरांनो पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. जमिनीतून पाण्याची पातळी घटल्याने शेतकरी व नागरिक हवालदिल झाले आहेत. 

टॅग्स :Solapurसोलापूरdroughtदुष्काळwater shortageपाणीटंचाई