शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

दुष्काळामुळे वाखरी, भंडीशेगाव परिसरातील फळबागा करपल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 1:12 PM

दुष्काळाची दाहकता ; बोअर, विहिरी आटल्या, पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई, शेतकरी, नागरिक धास्तावले, प्रशासनाचे दुर्लक्ष

ठळक मुद्देवाखरी, भंडीशेगाव परिसरातील शेतकºयांची उभी पिके पाण्याअभावी जाळून शेकडो कोटींचे नुकसानजळालेल्या पिकांचे पंचनामे करून फळबागा, ऊस यासह चारा, भाजीपाला पिकांना नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकºयांमधून होत आहे

पटवर्धन कुरोली : वाखरी, भंडीशेगाव (ता. पंढरपूर) परिसरात भीषण दुष्काळामुळे विहिरी, बोअर कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे शेतकºयांची ऊस, केळी, डाळिंब, द्राक्ष, कडवळ, मका आदी पिके पाण्याअभावी करपू लागली आहेत.  पिण्याच्या पाण्याचीही भीषण टंचाई जाणवू लागली आहे. घागरभर पाण्यासाठी नागरिकांना मैलोन्मैल भटकंती करावी लागत आहे. प्रशासनाकडून टँकर सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी तो येतो कधी आणि कुणाला पाणी देतो. याची अनेक ग्रामस्थ, शेतकºयांना माहितीच नाही. प्रशासन याविषयी गंभीर दिसत नसल्याने शेतकरी ग्रामस्थ धास्तावले आहेत.

मागील वर्षी कमी प्रमाणात झालेला पाऊस, कॅनॉलच्या पाण्याचे कोलमडलेलं नियोजन यामुळे वाखरी, भंडीशेगाव परिसरातील भूजलपातळी कमालीची खालावली आहे. ५०० फूट खोल बोअर, विहिरीही पूर्ण कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात शेतकरी, नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. वाखरी, भंडीशेगाव परिसरात उसाचे क्षेत्र कमी असले तरी कमी पाण्यावर येतील अशा डाळिंब, केळी, द्राक्ष अशा फळबागा, कडवळ, मका अशी चाºयाची पिके व भाजीपाल्याची लागवड शेतकºयांनी ठिबक सिंचनावर केली होती; मात्र जिथे पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असेल तिथे ठिबकद्वारे पिकांना कुठून पाणी येणार अशी परिस्थिती आहे. ऐन उन्हाळ्यात अनेक शेतकºयांनी डाळिंब बागा जोपासल्या. त्या बागांना फळेही चांगली आली; मात्र ती फळे विक्रीयोग्य होण्याअगोदरच पाण्याअभावी अख्ख्या बागाच जळून खाक होत आहेत. ऊस व इतर पिकांची परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. त्यामुळं शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.

कवडीमोल किमतीला दुभत्या जनावरांची विक्री- वाखरी, भंडीशेगाव या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी विहीर व बोअरच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागते.  कॅनॉलला पाणी आले तरच विहीर, बोअरची पाणी पातळी समान राहते. यावर्षी पाण्याचे नियोजन कोलमडल्याने विहीर, बोअरच्या पाण्याची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. या परिसरात दूध व्यवसायावर अनेक शेतकºयांचे अर्थकारण चालते; मात्र जनावरांना हिरवा चारा मिळणे अवघड झाल्याने अनेक शेतकºयांनी आपली दुभती जनावरे कवडीमोल किमतीला विकून टाकली आहेत. दूध व्यवसायही धोक्यात आला आहे. त्यामुळे शेतकºयांचे अर्थकारण पूर्ण कोलमडले आहे. प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन जनावरांना हिरवा चारा उपलब्ध करणे, वाड्यावस्त्यांवर पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करणे गरजेचे आहे. मात्र प्रशासन याविषयी फारसे गंभीर नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिक शेतकºयांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

प्लॉट एरिया परिसरात पाण्याचा टँकर सुरू करावा- वाखरी प्लॉट एरिया इसबावी परिसरात मोठी लोकवस्ती आहे. या परिसरात नगरपालिका व वाखरी ग्रामपंचायतीतर्फे कोणतीही सार्वजनिक पाणीपुरवठ्याची सोय नाही. अनेक नागरिकांच्या स्वत:च्या मालकीच्या बोअर आहेत. बहुतांश त्या सर्व बोअरच्या पाण्याने तळ गाठला आहे. तर काही बोअर पूर्ण बंद पडल्याने पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई सुरू आहे; मात्र याकडे पंढरपूर नगरपालिका, वाखरी ग्रामपंचायत लक्ष देत नसल्याने नागरिकांवर पाण्यासाठी स्थलांतर करण्याची वेळ येऊ लागली आहे. या परिसरात प्रशासनाने पाण्याचे टँकर सुरू करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

नुकसानभरपाई द्या- वाखरी, भंडीशेगाव परिसरातील शेतकºयांची उभी पिके पाण्याअभावी जाळून शेकडो कोटींचे नुकसान झाले आहे. अशा जळालेल्या पिकांचे पंचनामे करून फळबागा, ऊस यासह चारा, भाजीपाला पिकांना नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकºयांमधून होत आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरdroughtदुष्काळagricultureशेतीFarmerशेतकरीwater shortageपाणीटंचाई