शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

डॉ. शरणकुमार लिंबाळे यांना ‘सरस्वती सन्मान’  १८ वर्षांनी मराठीला मिळाला मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 07:46 IST

ज्ञानपीठ पुरस्काराइतकाच तोलामोलाचा मानला जाणारा साहित्यातील ‘सरस्वती सन्मान’ पुरस्कार यंदा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांना जाहीर झाला आहे.

पुणे / सोलापूर  : ज्ञानपीठ पुरस्काराइतकाच तोलामोलाचा मानला जाणारा साहित्यातील ‘सरस्वती सन्मान’ पुरस्कार यंदा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांना जाहीर झाला आहे. ‘सनातन’ या कादंबरीसाठी लिंबाळे यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. १५ लाख रुपये, प्रशस्तिपत्र, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. विजय तेंडुलकर (१९९३) आणि महेश एलकुंचवार (२००२) यांच्यानंतर हा पुरस्कार मिळणारे लिंबाळे हे तिसरे मराठी साहित्यिक ठरले आहेत. दिल्लीतील के के. बिर्ला फाऊंडेशनच्या वतीने कविता, कादंबरी, नाटक, हास्य-व्यंग, ललित लेखन, आत्मकथा, समीक्षा आदी प्रकारांतील भारतीय भाषांमधील उत्कृष्ट कलाकृतींसाठी साहित्यिकांना ‘सरस्वती सन्मान’ दरवर्षी प्रदान केला जातो. त्यासाठी लेखकाची कोणत्याही भाषेतील ही साहित्यकृती सन्मानाच्या दहा वर्षे आधीच्या कालावधीत प्रकाशित झालेली असावी, असा निकष ठेवण्यात आला आहे.डॉ. लिंबाळे यांची ‘सनातन’ ही कादंबरी मुघल आणि ब्रिटीश कालखंडातील इतिहासावर प्रकाश टाकते. देशाच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात दलित आणि आदिवासींचे असलेले योगदान अधोरेखित करण्याचा प्रयत्न लिंबाळे यांनी या कादंबरीतून केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर या गावी जन्मलेल्या डॉ. लिंबाळे यांनी दलित साहित्याला वेगळा आयाम मिळवून दिला. त्यांचे ‘अक्करमाशी’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. ‘अक्करमाशी’ची इंग्रजीसह विविध भाषांत भाषांतरे झाली आहेत. त्यांची आजवर ४० हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.  

जीवनवादी साहित्य देशातल्या एखाद्या दलित लेखकाला कदाचित पहिल्यांदाच हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळत आहे. एका जीवनवादी साहित्याचा हा गौरव आहे. भीमा-कोरेगाव लढ्याला दोनशे वर्ष पूर्ण झाली. त्या पार्श्वभूमीवर ‘सनातन’ कादंबरी लिहिली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी दलित-आदिवासींनी खूप मोठ्या प्रमाणावर संघर्ष केला. मात्र इतिहासात त्यांच्या योगदानाचा कुठेही गौरव झालेला नाही. त्यामुळे मी ‘सनातन’ मधून नवा इतिहास उभा केला. - डॉ. शरणकुमार लिंबाळे, ज्येष्ठ साहित्यिक

टॅग्स :PuneपुणेSolapurसोलापूर