शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

सोलापूर स्मार्ट सिटीतील दररोजचा पाणीपुरवठा होणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 2:11 PM

हिप्परग्याची पातळी खालावली: उन्हामुळे वाढली पाण्याची मागणी

ठळक मुद्दे स्मार्ट सिटी अंतर्गत शहराला (एबीडी एरिया) दररोज पाणीपुरवठा करण्याचे प्रस्तावितहिप्परग्याची पातळी घटल्यामुळे बदल करणे अपरिहार्य असल्याचे अधिकाºयांनी सांगितले

सोलापूर : स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत एबीडी एरियात (जुने गावठाण) दररोज पाणीपुरवठा करण्याच्या प्रकल्पांतर्गत गोलचावडी व नवीपेठ भागात आॅगस्टपासून करण्यात येत असलेल्या दररोज पाणीपुरवठ्यावर गंडांतर येणार आहे. हिप्परग्याची पातळी घटल्यामुळे बदल करणे अपरिहार्य असल्याचे अधिकाºयांनी सांगितले. 

 स्मार्ट सिटी अंतर्गत शहराला (एबीडी एरिया) दररोज पाणीपुरवठा करण्याचे प्रस्तावित आहे.  त्याप्रमाणे गावठाण हद्दीतील भागात दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. त्याप्रमाणे प्रायोगिक तत्त्वावर दोन भागात दररोज पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यामध्ये दयानंद कॉलेज पाण्याच्या टाकीवरून जुनी गोलचावडी परिसर, जोडभावी पेठ, मंगळवार बाजार परिसर, कुंभार वेस, काशीकापडे गल्ली, चाटी गल्ली, गोल व बोरामणी तालीम, वडार गल्ली परिसरातील काही भागांचा समावेश आहे.  

दुसरा भाग उजनी जलवाहिनीवरून निवडण्यात आला आहे. पाकणी जलशुद्धीकरण केंद्रातून कोंडी एमबीआर ते शहरातील पाण्याच्या टाक्यांना जलवाहिन्या जोडण्यात आल्या आहेत. कोंडी एमबीआरवरून येणाºया जलवाहिनीला जुना पुणे नाका येथे एक दुसरी जलवाहिनी जोडलेली आहे. या जलवाहिनीवरून शिवशक्ती हॉटेल परिसर, दक्षिण व उत्तर कसबा, नवीपेठ, पत्रा तालीमच्या भागापर्यंत दररोज पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले. त्याप्रमाणे ८ आॅगस्टपासून या भागात दररोज अर्धा तास पाणी देण्यात येत आहे.

गेल्या महिनाभरात विजेचा व्यत्यय, औज बंधारा कोरडा, जलवाहिनीत बिघाड यामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.  या काळात दररोजच्या पाणीपुरवठ्याच्या प्रयोगावरही परिणाम झाला. गेल्या एक महिन्यापासून उन्हाचा कडाका वाढला आहे व पाणी वितरणाचे दिवस वाढले आहेत. यामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे पाणी वितरणाचे नियोजन करणे जड जात आहे. --------------

  • - हिप्परगा तलावाची पातळी खालावली आहे. दुबार पंपिंगद्वारे आता दररोज केवळ १ एमएलडी (दशलक्ष लिटर) पाणी उपलब्ध होत आहे. पाणी गिरणीची क्षमता २२.५ एमएलडी इतकी आहे. त्यामुळे कमी पडणारे पाणी उजनी जलवाहिनीवरून घेण्यात येत आहे. उजनी जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह बदलल्यानंतर वाढलेले पाणी या नियोजनात जात आहे. त्यामुळे आता लवकरच दररोजचा पाणीपुरवठा बंद करावा लागणार अशी चिन्हे आहेत.

--------------दोन दिवसाआड अशक्य- आयुक्त डॉ.अविनाश ढाकणे यांनी जलवाहिन्याचे जोड पूर्ण झाल्यावर व अमृतमधील कामे पूर्ण झाल्यावर पाणी वाढणार असे सांगितले होते. यातून डिसेंबरनंतर दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे सुतोवाच त्यांनी केले होते. पण आता निर्माण झालेली परिस्थिती पाहता तीन दिवसाआड शहराला पाणीपुरवठा होणे अशक्य झाले आहे. त्यामुळे दोन दिवसाआडच्या प्रयोगाबाबत साशंकता व्यक्त होत आहे.  

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाWaterपाणीSmart Cityस्मार्ट सिटी