शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

साखर कारखानदारीतील स्पर्धा ठरतेय जीवघेणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:22 IST

सोलापूर : राज्यात सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा म्हणून सोलापूर जिल्हा ओळखला जातो. साखर कारखानदारीत या जिल्ह्याने भरारी मारली ...

सोलापूर : राज्यात सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा म्हणून सोलापूर जिल्हा ओळखला जातो. साखर कारखानदारीत या जिल्ह्याने भरारी मारली असली तरी याच कारखानदारीमुळे जिल्ह्यात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आपसातील स्पर्धा कारखानदारांसाठी जीवघेणी ठरत असल्याचे चित्र पुढे येत आहे.

गोकुळ शुगरचे अध्यक्ष भगवान शिंदे यांनी सोमवारी केलेल्या आत्महत्येमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. गतवर्षी जिल्ह्यात उसाची उपलब्धता कमी होती. काही कारखान्यांना गाळप सुरू करण्याऐवजी बंद ठेवणे अधिक फायद्याचे होते. जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक कारखाने गतवर्षी गाळप करू शकले नाहीत, जे कारखाने गाळप करीत होते त्यांना ऊस मिळवण्याची चिंता होती. त्यातूनच ऊसदराची चढाओढ सुरू झाली. हंगाम तोट्यात जाऊ नये यासाठी पुरेशा क्षमतेने गाळप झाले पाहिजे याची कारखानदारांना चिंता होती. त्यामुळेच सर्वाधिक दर देण्याची स्पर्धा सुरू झाली. धोत्रीच्या गोकुळ शुगरने प्रतिटन २,६०१ रुपये दर जाहीर केला आणि नंतरच्या काळात त्यांना अडचणींचा सामना करावा लागला.

सहकारी साखर कारखाने शेतकरी हिताला प्राधान्य देत असत. निवडणुकीला सामोरे जाताना कारखाना आर्थिक संकटात असेल अथवा उसाला कमी दर मिळत असेल तर संचालक मंडळाला जबाबदार धरले जात होते. काटकसर, सचोटीचा कारभार, शेतकरी हिताला प्राधान्य, उसाला वाजवी दर आणि कारखान्याची आर्थिक स्थिती यावर निवडणुकीत सभासदांचा कौल मिळत असे. विश्वासार्हता, बांधिलकी यावर संचालक मंडळाचे धोरण ठरत असत. प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागत असे. संचालक मंडळाची सामूहिक जबाबदारी महत्त्वाची ठरते, मात्र खासगी कारखान्यासाठी हे मापदंड लागू पडत नाहीत.

अलीकडच्या काळात खासगी साखर कारखानदारी वाढली. किंबहुना ती वाढणे गरजेचे होते. उसाची वाढती लागवड आणि एकरी उत्पादनात होणारी वाढ यामुळे गाळपाचा प्रश्न अधिकच गंभीर बनत चालला. सहकारी कारखान्यांना मर्यादा होत्या. विस्तारीकरण, उपपदार्थ निर्मिती प्रकल्प उभारताना होणारी दिरंगाई यामुळे सहकारी कारखाने स्पर्धेत मागे पडले आणि खासगी कारखानदारी झपाट्याने वाढत राहिली. खासगी कारखानदारी वाढल्याने अतिरिक्त उसाच्या गाळपाचा प्रश्न मार्गी लागला. उसाचे क्षेत्रही वाढत राहिले.

पूर्वी सहकारी साखर कारखाने स्वतःच्या कार्यक्षेत्रात उसाची उपलब्धता वाढवण्यासाठी ऊस विकास कार्यक्रम हाती घेत असत. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा फायदा घेऊन शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन आणि इतर सोयी-सुविधा उपलब्ध करून देत असत. त्यामुळे आपल्या कारखान्याच्या गाळप क्षमतेच्या प्रमाणात स्वतःच्या कार्यक्षेत्रात हक्काचे ऊस लागवड क्षेत्र वाढवल्याने उसाची पळवापळवी करण्याचा प्रश्नच उद्भवत नसायचा. त्यात झोन बंदीमुळे शेतकऱ्यांना नजीकच्या कारखान्यांना ऊस पुरवठा करण्याचे बंधन असे. आज परिस्थिती विपरीत झाली आहे. खासगी कारखाने ऊस विकास कार्यक्रमाकडे गांभीर्याने पाहत नाहीत. हंगामात जादा दर देऊन कारखान्याला ऊस खेचण्याची स्पर्धा सुरू होते. यातूनच जिल्ह्यातील कारखान्यांमध्ये जीवघेणी स्पर्धा सुरू झाली आहे.

शासकीय धोरणामुळे साखर कारखानदार कमालीचे अडचणीत आले आहेत. उसाची एफआरपी आणि साखरेची एमएसपी यांचा ताळमेळ जमत नाही . साखर साठ्याची मर्यादा , साखर विक्रीचे बंधन, साखरेचा बाजार भाव आणि निर्यातीचे धोरण यामुळे कारखानदारी कमालीची बेभरवशाची बनली आहे. बरेच कारखाने तोट्यात चालवले जात आहेत. कारखाना बंद ठेवला तर व्याजाचा भुर्दंड वाढतो. कर्मचाऱ्यांचा पगार आणि मशिनरीची दुरवस्था होते. या कारणाने गळीत हंगाम घेणे आणि तोही पूर्ण क्षमतेने गाळप करणे आवश्यक ठरते. यातूनच साखर कारखानदारीमध्ये उसाची पळवापळवी, दराची स्पर्धा सुरू होते.

---------

कारखानदार एकत्र तरी सुप्त संघर्ष

जिल्ह्यातील साखर कारखानदारमध्ये अर्ध्या अधिक कारखान्याची मालकी राजकीय नेत्यांकडे आहे राजकारण आणि कारखानदारी यांचा ताळमेळ घालत ऊस दराची कसरत करावी लागते मात्र उद्योग म्हणून या क्षेत्रात आलेल्या मंडळींना सचोटीने कारखाने चालवण्याशिवाय पर्याय नाही. अर्थातच अधिक दर देऊन त्यांना ऊस मिळवावा लागतो. याच कारणाने कारखानदारांत सुप्त संघर्ष सुरू असतो. कारखान्यांचे प्रश्नांसाठी ते एकत्र येत असले तरी ऊसदराच्या मुद्द्यावर मतभेद होताना दिसून आले आहे.

----------