शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

दोन किलोमीटरच्या देगाव जलसेतूला ग्रामपंचायतीच्या १३ गुंठ्यांचा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 20:41 IST

घोळ कायम : रेल्वेने परवानगी दिल्याने रखडलेले ९६ मीटरचे काम लागणार मार्गी

ठळक मुद्देरेल्वे खात्याने मंजुरी दिल्याने देगाव जलसेतूच्या उर्वरित ९६ मीटर कामाला सुरुवात होणार तरी पुढील कालव्याच्या कामासाठीचा अवघ्या १३ गुंठ्यावरील अतिक्रमित जागेचा अडथळा कायम बरखास्त ग्रामपंचायतीच्या नावावर असलेली १३ गुंठ्यातील अतिक्रमण काढणार कोण?

सोलापूर: रेल्वे खात्याने मंजुरी दिल्याने देगाव जलसेतूच्या उर्वरित ९६ मीटर कामाला सुरुवात होणार असली तरी पुढील कालव्याच्या कामासाठीचा अवघ्या १३ गुंठ्यावरील अतिक्रमित जागेचा अडथळा कायम आहे. बरखास्त ग्रामपंचायतीच्या नावावर असलेली १३ गुंठ्यातील अतिक्रमण काढणार कोण? व जमिनीचा मोबदला कोणाला द्यायचा हा घोळ संपलेला नाही.

उजनी धरणाचे हिरज वितरिकेतून देगाव जलसेतू बांधून पाणी उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यातील शेतीसाठी जाणार आहे. यासाठी देगाव जलसेतूचे काम २००४ पासून सुरू आहे. सोलापूर-पुणे रेल्वेमार्गावरून देगाव बायपासजवळून हा देगाव जोडकालवा जातो. या जोडकालव्याची लांबी १८८६ मीटर इतकी आहे. यामधीलच रेल्वे रुळावरील ५५ मीटर व लगतच्या दोन्ही बाजूचे ४१ मीटर असे ९६ मीटर काम राहिले आहे. रेल्वे खात्याने काम करण्यास मंजुरी दिली असून, काम सुरू करण्यासाठी स्थानिक रेल्वे प्रशासनाकडे पत्र दिले आहे. आता रेल्वे रुळावरील वितरिकेचे काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

जलसेतूचे काम संपल्यानंतर कालव्याचे ४०० मीटरचे गट नंबर १२५ व १२६ शेतजमिनीवरील काम राहिले आहे. १२५ गट नंबरवर सरपंच ग्रामपंचायत देगाव (केशव भानुदास सुपाते) असे नाव असून, या १३ गुंठे जमिनीवर अतिक्रमण करून लोक राहतात. हा परिसर हद्दवाढीत गेल्याने आता महानगरपालिकेचा ताबा आहे. ग्रामपंचायतही बरखास्त झाल्याने दप्तर महानगरपालिकेकडे आहे. उताºयावर ग्रामपंचायतीचे नाव व दप्तर महानगरपालिकेकडे असल्याने कृष्णा खोरे महामंडळाचे अधिकारी महानगरपालिकेशी पत्रव्यवहार करीत आहेत. यासंदर्भात संबंधित अधिकारी व आयुक्तांसोबत चर्चाही झाली आहे. 

मात्र मार्ग निघाला नाही. ग्रामपंचायतीच्या नावे असलेल्या उताºयावरील अतिक्रमण कोणी काढायचे, असा प्रश्न निर्माण झाला असून, मोबदला कोणाला द्यायचा?, हाही प्रश्न निकाली निघाला नाही. त्यामुळे जलसेतूचे काम पूर्ण झाले तरी १३ गुंठे क्षेत्राचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय पाणी उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्याला जाणार नाही. विशेष म्हणजे कालव्याचे पुढचे कामही बºयापैकी झाले आहे.

जागा हस्तांतराचा झेडपी-मनपात वादच्हद्दवाढीनंतर उत्तर सोलापूर तालुक्यातील ११ गावे सोलापूर शहरात सामावली आहेत. ११ ग्रामपंचायती मनपात गेल्याने या गावातील आरोग्य विभाग, पशुसंवर्धन, जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायत गावठाण तसेच अन्य शासकीय जागा हद्दवाढीत गेल्या. या जागा मनपाला हस्तांतरण करून देण्याचा प्रश्न लोंबकळत पडला आहे. अशाच पद्धतीने देगावची १२५ गट नंबरचीजमीनही हस्तांतरण होऊन मनपाचे नाव नोंदणे आवश्यक आहे. च्जलसेतूचे काम झाल्यानंतर कालव्याद्वारे उत्तर तालुक्यातील २७९९ हेक्टर, दक्षिण तालुक्यातील ३८०० हेक्टर व अक्कलकोट तालुक्यातील ९०००  हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरWaterपाणीwater shortageपाणीटंचाईrailwayरेल्वे