शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
3
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
4
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
5
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
6
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
7
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
8
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
9
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
10
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
11
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
12
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
13
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
14
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
15
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
16
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
17
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
18
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
19
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो

दोन किलोमीटरच्या देगाव जलसेतूला ग्रामपंचायतीच्या १३ गुंठ्यांचा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 20:41 IST

घोळ कायम : रेल्वेने परवानगी दिल्याने रखडलेले ९६ मीटरचे काम लागणार मार्गी

ठळक मुद्देरेल्वे खात्याने मंजुरी दिल्याने देगाव जलसेतूच्या उर्वरित ९६ मीटर कामाला सुरुवात होणार तरी पुढील कालव्याच्या कामासाठीचा अवघ्या १३ गुंठ्यावरील अतिक्रमित जागेचा अडथळा कायम बरखास्त ग्रामपंचायतीच्या नावावर असलेली १३ गुंठ्यातील अतिक्रमण काढणार कोण?

सोलापूर: रेल्वे खात्याने मंजुरी दिल्याने देगाव जलसेतूच्या उर्वरित ९६ मीटर कामाला सुरुवात होणार असली तरी पुढील कालव्याच्या कामासाठीचा अवघ्या १३ गुंठ्यावरील अतिक्रमित जागेचा अडथळा कायम आहे. बरखास्त ग्रामपंचायतीच्या नावावर असलेली १३ गुंठ्यातील अतिक्रमण काढणार कोण? व जमिनीचा मोबदला कोणाला द्यायचा हा घोळ संपलेला नाही.

उजनी धरणाचे हिरज वितरिकेतून देगाव जलसेतू बांधून पाणी उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यातील शेतीसाठी जाणार आहे. यासाठी देगाव जलसेतूचे काम २००४ पासून सुरू आहे. सोलापूर-पुणे रेल्वेमार्गावरून देगाव बायपासजवळून हा देगाव जोडकालवा जातो. या जोडकालव्याची लांबी १८८६ मीटर इतकी आहे. यामधीलच रेल्वे रुळावरील ५५ मीटर व लगतच्या दोन्ही बाजूचे ४१ मीटर असे ९६ मीटर काम राहिले आहे. रेल्वे खात्याने काम करण्यास मंजुरी दिली असून, काम सुरू करण्यासाठी स्थानिक रेल्वे प्रशासनाकडे पत्र दिले आहे. आता रेल्वे रुळावरील वितरिकेचे काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

जलसेतूचे काम संपल्यानंतर कालव्याचे ४०० मीटरचे गट नंबर १२५ व १२६ शेतजमिनीवरील काम राहिले आहे. १२५ गट नंबरवर सरपंच ग्रामपंचायत देगाव (केशव भानुदास सुपाते) असे नाव असून, या १३ गुंठे जमिनीवर अतिक्रमण करून लोक राहतात. हा परिसर हद्दवाढीत गेल्याने आता महानगरपालिकेचा ताबा आहे. ग्रामपंचायतही बरखास्त झाल्याने दप्तर महानगरपालिकेकडे आहे. उताºयावर ग्रामपंचायतीचे नाव व दप्तर महानगरपालिकेकडे असल्याने कृष्णा खोरे महामंडळाचे अधिकारी महानगरपालिकेशी पत्रव्यवहार करीत आहेत. यासंदर्भात संबंधित अधिकारी व आयुक्तांसोबत चर्चाही झाली आहे. 

मात्र मार्ग निघाला नाही. ग्रामपंचायतीच्या नावे असलेल्या उताºयावरील अतिक्रमण कोणी काढायचे, असा प्रश्न निर्माण झाला असून, मोबदला कोणाला द्यायचा?, हाही प्रश्न निकाली निघाला नाही. त्यामुळे जलसेतूचे काम पूर्ण झाले तरी १३ गुंठे क्षेत्राचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय पाणी उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्याला जाणार नाही. विशेष म्हणजे कालव्याचे पुढचे कामही बºयापैकी झाले आहे.

जागा हस्तांतराचा झेडपी-मनपात वादच्हद्दवाढीनंतर उत्तर सोलापूर तालुक्यातील ११ गावे सोलापूर शहरात सामावली आहेत. ११ ग्रामपंचायती मनपात गेल्याने या गावातील आरोग्य विभाग, पशुसंवर्धन, जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायत गावठाण तसेच अन्य शासकीय जागा हद्दवाढीत गेल्या. या जागा मनपाला हस्तांतरण करून देण्याचा प्रश्न लोंबकळत पडला आहे. अशाच पद्धतीने देगावची १२५ गट नंबरचीजमीनही हस्तांतरण होऊन मनपाचे नाव नोंदणे आवश्यक आहे. च्जलसेतूचे काम झाल्यानंतर कालव्याद्वारे उत्तर तालुक्यातील २७९९ हेक्टर, दक्षिण तालुक्यातील ३८०० हेक्टर व अक्कलकोट तालुक्यातील ९०००  हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरWaterपाणीwater shortageपाणीटंचाईrailwayरेल्वे