शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
5
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
6
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
7
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
8
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
9
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
10
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
11
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
12
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
13
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
14
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
15
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
16
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
17
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
18
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
19
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
20
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...

आष्टीची नरभूमी आजही दुर्लक्षित, आष्टीच्या लढाईला २०० वर्षे पूर्ण, आष्टीकर जोपासताहेत खुणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 13:01 IST

छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे त्यांच्या मृत्यूनंतरही रक्षण करण्यासाठी अनेक शूर मावळे, सेनापती यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. इंग्रज व मराठे यांच्यात मोहोळ तालुक्यातील आष्टीत लढाई झाली.

ठळक मुद्देइंग्रज व मराठे यांच्यात मोहोळ तालुक्यातील आष्टीत लढाई२० फेब्रुवारी १८१८ रोजी झालेल्या या लढाईला २०० वर्षे पूर्ण१६ नोव्हेंबर १८१७ च्या येरवडा येथील लढाईत  निष्क्रिय व उदासीन श्रीमंत दुसरे बाजीराव पेशवा यांचा पराभव झाला होता

महेश कोटीवालेआॅनलाइन लोकमत सोलापूरवडवळ दि २० : छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे त्यांच्या मृत्यूनंतरही रक्षण करण्यासाठी अनेक शूर मावळे, सेनापती यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. इंग्रज व मराठे यांच्यात मोहोळ तालुक्यातील आष्टीत लढाई झाली. ही लढाई अजरामर करणाºया नरवीर बापू गोखले यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. २० फेब्रुवारी १८१८ रोजी झालेल्या या लढाईला २०० वर्षे पूर्ण झाली. आज या लढाईतील खुणा आष्टीकर ग्रामस्थ जोपासताना दिसतात; मात्र आष्टीची ही नरभूमी आजही दुर्लक्षित आहे.   अनेक इतिहासकार व संशोधकांनी आष्टीच्या लढाईचे वर्णन केले आहे. १६ नोव्हेंबर १८१७ च्या येरवडा येथील लढाईत  निष्क्रिय व उदासीन श्रीमंत दुसरे बाजीराव पेशवा यांचा पराभव झाला होता. तेथून त्यांचे पलायन सुरु होते; मात्र राजा खचला तरी त्यांचे सैन्य व सेनापती मात्र खचले नव्हते. मूठभर सैन्य घेऊन नरवीर बापू गोखले त्यांच्या सोबत होते. या सैन्याचा तळ मोहोळ तालुक्यातील आष्टी येथे पडल्यानंतर इंग्रज सैन्य जनरल स्मिथ येथे धडकले. प्रसंग बाका होता. पेशवे अजूनही संभ्रमात व गोंधळलेले होते; मात्र नरवीर बापू गोखले यांनी पेशव्यांना मी एकटाच इंग्रजांना सामोरे जाणार असून, लढताना मरण आले तर बहुमान, याउपर श्रीमंतांचे दर्शन झाले तर उत्तम; अन्यथा हे अंतिम दर्शन असे सांगून जनरल स्मिथच्या सैन्याशी मूठभर मराठे प्राणाची बाजी लावून लढले. घनघोर लढाई झाली. यात नरवीर बापू गोखले धारातीर्थी पडले.  त्यांच्यासोबत गोविंदराव घोरपडे, बहिरजी शितोळे, बाबर आदी मोहरे देखील गळून पडले.आष्टी हे गाव पंढरपूरपासून २२ कि. मी. अंतरावर आहे. कैकाड्याची,बापू गोखल्यांची आष्टी या नावाने परिचित आहे. धूर्त इंग्रजांनी या लढाईनंतर येथील भूमीस महत्त्व प्राप्त होऊ नये व ऐतिहासिक महत्त्व कमी व्हावे म्हणून १८८८ मध्ये मोठे तळे खोदले. ही युद्धभूमी ओळखू येऊ नये याची काळजी घेतली. याच भूमीवर नरवीर बापू गोखले यांची समाधी होती का नाही याबाबत  निश्चित पुरावा अजून मिळाला नसला तरी येथे युद्ध संबंधी अनेक तलवारी, शस्त्रे यापूर्वी  सापडली असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात.--------------------------नरवीर बापू गोखलेंवर पुस्तक- आष्टी येथील बुजुर्ग व अभ्यासू मंडळींनी येथील खुणा जपण्याचा प्रयत्न केला आहे आणि करताहेत. नूतन विद्यालय येथील उपक्रमशील शिक्षक व लेखक  संजय पाटील यांनी स्वत: संशोधन करून ‘अजरामर योद्धा: नरवीर बापू गोखले’ हे पुस्तक लिहिले आहे.  देवानंद पाटील, मदनसिंह पाटील, बाळासाहेब पाटील,राजाबापू  पाटील,खासेराव पाटील, शंकर माने,महादेव व्यवहारे, शाम कांबळे, वसुदेव व्यवहारे,सरपंच शैलेंद्र पाटील,  पं. स. सदस्य डॉ. प्रतिभा व्यवहारे,भीमराव पाटील,सज्जनराव पाटील, भजनदास व्यवहारे,काकासाहेब पाटील,संजय क्षीरसागर, जे. के. गुंड, विजय गुंड, तुकाराम माने, विलास पाटील आदी ग्रामस्थांनी विविध उपक्रम, कार्यक्रम आयोजित करुन या स्मृति तेवत ठेवण्यासाठी प्रयत्न केला आहे. आज गावात नूतन विद्यालयाचे नरवीर वसतिगृह, नरवीर तरुण मंडळ, नरवीर वाचनालय, नरवीर व्याख्यानमाला, नरवीर क्रीडा मंडळ  सुरु आहे. इतकेच नाही तर येथे बँक आॅफ इंडिया शाखा-नरवीर बापू गोखले आष्टी असे नाव आहे.-----------------आष्टीची लढाईनरवीर बापू गोखले आणि इंग्रज यांच्यात आष्टीत येथे झालेल्या लढाईच्या ठिकाणी इंग्रजांनी इ. स. १८८८ साली खोदलेले तळे. 

टॅग्स :Solapurसोलापूर