शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
6
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
7
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
8
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
9
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
10
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
11
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
12
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
13
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
14
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
15
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
16
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
17
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
18
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
19
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
20
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी

कंपन्यांच्या हिताचे निर्णय घेणाºया भाजप सरकारमुळे शेतकरी संकटात - अजित अभ्यंकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2018 12:42 PM

सोलापूर :  शेतीच्या अरिष्टाला सरकारची नवउदारवादी धोरणे कारणीभूत आहेत. बहुराष्टÑीय कंपन्यांच्या फायद्यासाठी सरकारने अनेक क्षेत्रात परदेशी गुंतवणूक स्वीकारली आहे. त्यामुळेच आज शेतकरी मोठ्या संकटात आलेला आहे, असे मत प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ प्रा.अजित अभ्यंकर यांनी व्यक्त केले. स्टुडंट फेडरेशन आॅफ इंडिया (एसएफआय) च्या राज्यस्तरीय अभ्यास शिबिरातील दुसºया दिवशीच्या दुसºया सत्रात ते बोलत ...

ठळक मुद्देशेतीच्या अरिष्टाला सरकारची नवउदारवादी धोरणे कारणीभूत - अभ्यंकरयोग्य हमीभाव नसल्याने शेतकरी अडचणीत - अभ्यंकरविद्यार्थ्यांनी शेती क्षेत्राचा अभ्यास केला पाहिजे - अभ्यंकर

सोलापूर :  शेतीच्या अरिष्टाला सरकारची नवउदारवादी धोरणे कारणीभूत आहेत. बहुराष्टÑीय कंपन्यांच्या फायद्यासाठी सरकारने अनेक क्षेत्रात परदेशी गुंतवणूक स्वीकारली आहे. त्यामुळेच आज शेतकरी मोठ्या संकटात आलेला आहे, असे मत प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ प्रा.अजित अभ्यंकर यांनी व्यक्त केले. स्टुडंट फेडरेशन आॅफ इंडिया (एसएफआय) च्या राज्यस्तरीय अभ्यास शिबिरातील दुसºया दिवशीच्या दुसºया सत्रात ते बोलत होते. 

‘नवउदारवादी धोरणे आणि शेतीवरील अरिष्ट’ या विषयावर पुढे बोलताना प्रा.अभ्यंकर म्हणाले, भारतात १९९० नंतर सर्वच क्षेत्रात सरकारने उदारीकरण राबविण्याचे ठरविले. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या फायद्यासाठी सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील अनेक बाबतीत गुंतवणूक स्वीकारून शेती क्षेत्राला अधिक संकटात टाकले आहे.

स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचा वाटा मोठ्या प्रमाणात होता. आज तेच प्रमाण खूप कमी झाले आहे. त्याची सर्व कारणे सध्या सरकार राबवत असलेल्या नवउदारवादी धोरणांमध्ये सापडतात. आज शेतीमालाला योग्य हमीभाव मिळत नाही. योग्य हमीभाव नसल्याने शेतकरी अडचणीत आहे. सरकार मात्र आपल्या शेतकºयांना योग्य भाव देण्याऐवजी तेच धान्य आयात करत आहे. ही परिस्थिती सरकारच्या धोरणांमुळे निर्माण झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शेती क्षेत्राचा अभ्यास केला पाहिजे, असेही प्रा.अभ्यंकर म्हणाले.

या सत्राच्या अध्यक्षस्थानी ‘एसएफआय’ राज्य कमिटी सदस्या मीना आरसे या होत्या तर सत्राचे संचालन राज्य कमिटी सदस्य विलास भुयाळ आणि सत्यजित मस्के यांनी केले. 

शिबिरामध्ये एका विषयावर मांडणी झाल्यानंतर त्या विषयावर गटनिहाय चर्चा घडवून आणली जात आहे. चर्चेतून आलेल्या प्रश्नांवर वक्ते उत्तरे देत आहेत. त्याचबरोबर संध्याकाळी क्रांतिकारी गीतांसह सांस्कृतिक कार्यक्रमही या शिबिरात होत आहे. ५ जूनपर्यंत हे शिबीर चालणार आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरStudentविद्यार्थी