शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

उन्हाळी पिकांना फायदा;  उजनी कालव्यातून रब्बी पिकांसाठी पाणी सुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 3:31 PM

भीमानगर: उजनी धरणातून कालव्याला रब्बी हंगामासाठी बुधवारी सायंकाळी ५ वाजल्यापासून पाणी सोडण्यात आले. हे पाणी डाव्या व उजव्या दोन्ही ...

ठळक मुद्देसुरूवातीला २०० क्युसेक व नंतर ५०० क्युसेक व येत्या दोन दिवसांत २८०० ते ३००० क्युसेकनी पाणी सोडण्यात येणार धरणातील पाणीसाठाही स्थिर राहिला आणि हेच पाणी आता एप्रिल, मे व जून या महिन्यांत उपयोगी येणार

भीमानगर: उजनी धरणातून कालव्याला रब्बी हंगामासाठी बुधवारी सायंकाळी ५ वाजल्यापासून पाणी सोडण्यात आले. हे पाणी डाव्या व उजव्या दोन्ही कालव्याला सोडण्यात येणार आहे. सुरूवातीला २०० क्युसेक व नंतर ५०० क्युसेक व येत्या दोन दिवसांत २८०० ते ३००० क्युसेकनी पाणी सोडण्यात येणार आहे.

सुरुवातीला दोन जानेवारीला सुटणारी पाळी नंतर २० जानेवारीला ठरली, परंतु पाणी मागणीस उठावच नसल्याने सुमारे एक महिनाभर पाणीपाळी पुढे ढकलण्यात आली. कालवा सल्लागार समितीने मिटिंग घेऊन २० फेब्रुवारीला पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. याचा फायदा मात्र ऐन उन्हाळ्यात शेतकºयांच्या पिकांना होणार असून, यामुळे धरणातील पाणीसाठाही स्थिर राहिला आणि हेच पाणी आता एप्रिल, मे व जून या महिन्यांत उपयोगी येणार आहे. 

उजनी धरण व्यवस्थापन विभागाने उशिरा का होईना पाणी काटकसर केल्यामुळे येणाºया काळात याचा फायदा दिसून येणार आहे.उजनी धरणातील पाणीसाठा २०.४२ टक्के असून, उपयुक्त १०.९४ टीएमसी आहे. त्यामुळे आता येणाºया महिनाभरात उजनी धरण मायनसमध्ये प्रवेश करेल व तिथून पुढे पाणी मात्र काटकसरीने वापरावे लागेल. आजच्या स्थितीला दहिगाव उपसा सिंचन योजना, सीना-माढा उपसा सिंचन योजना, बोगदा या सर्वांसाठी पाणी सुरू असून, थोड्याच दिवसात नदीला पाणी सोडण्यात येईल म्हणजेच झपाट्याने पाणी कमी होणार हे मात्र नक्की आहे. गेल्यावर्षी आजच्या दिवशी उजनीची पाणीपातळी ७७.३८ टक्के होती.

उजनीची आजची स्थिती

  • - एकूण पाणीपातळी: ४९२.४९५ मीटर
  • - एकूण पाणीसाठा :२११२.६७ दलघमी
  • - उपयुक्त पाणीसाठा : ३०९.८५ दलघमी
  • - टक्केवारी: २०.४२
  • - एकूण: ७४.६० टीएमसी
  • - उपयुक्त : १०.९४ टीएमसी
  • - बोगदा: ९०० क्युसेक
  • - सीना-माढा उपसा: २८० क्युसेक
  • - दहिगाव उपसा: ९० क्युसेक
  • - कालवा: ५०० क्युसेक
टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणWaterपाणीagricultureशेतीFarmerशेतकरी