शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
3
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
4
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
5
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
6
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
7
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
8
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
9
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
10
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
11
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
13
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
14
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
15
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
16
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
17
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
18
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
19
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
20
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

सोलापूर अन् उस्मानाबादमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ८२७ कोटींचा निधी वितरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 1:19 PM

सोलापूर लोकमत ब्रेकींग

सोलापूर : गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टी आणि पूरग्रस्त स्थितीमुळे सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते, त्याची नुकसान भरपाई म्हणून मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोलापूर जिल्हासाठी 545 कोटी तर उस्मानाबाद जिल्ह्यासाठी 282 कोटींचा निधी वितरित केल्याची माहिती आमदार सुभाष देशमुख यांनी दिली आहे. 

गेल्या वर्षी जून ते ऑक्टोबर दरम्यान सोलापूर आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे  शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले होते. याबाबत चौथ्या अधिवेशनात आमदार सुभाष देशमुख यांनी या दोन्ही जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करावी, अशी मागणी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली होती.

त्यानंतर आमदार देशमुख यांनी वारंवार यासाठी वडेट्टीवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार ना. विजय वडेट्टीवार यांनी आतापर्यंत राज्यात चार हजार 4489 कोटीचा निधी वितरित करण्यात आला असून यात सोलापूर जिल्ह्यासाठी 545 कोटी तर उस्मानाबाद जिल्ह्यातील 282 कोटी चा निधी वितरित केल्याची माहिती आमदार सुभाष देशमुख यांना पत्राद्वारे दिली आहे. दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निधी दिल्याबद्दल आमदार देशमुख यांनी वडेट्टीवार यांचे आभार मानले आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरfloodपूरagricultureशेतीSubhash Deshmukhसुभाष देशमुख