शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

महामार्गाचे काम हस्तांतरित करण्यामागे गौडबंगाल काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 14:19 IST

Kankavli, MNS, Parshuram Upkar, sindhudurg, pwd महामार्ग चौपदरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असतानाच सावंतवाडी विभागाच्या उपअभियंत्यांच्या जागी नवीन अधिकाऱ्याची नेमणूकच नाही. त्यामुळे ठेकेदाराकडून कनिष्ठ अभियंत्यांच्या देखरेखीखाली महामार्गाचे काम रामभरोसे सुरू आहे.

ठळक मुद्देमहामार्गाचे काम हस्तांतरित करण्यामागे गौडबंगाल काय ? सत्ताधाऱ्यांना एवढी घाई का ? : परशुराम उपरकर यांचा प्रश्न

कणकवली : महामार्ग चौपदरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असतानाच या कामावर नियंत्रणासाठी दोन्ही विभागात उपअभियंताच नसल्याचे दिसून येत आहे. खारेपाटण विभागातील उपअभियंत्यांची कोल्हापूरला बदली झाल्यानंतर ते इकडे फिरकतच नाहीत. तर सावंतवाडी विभागाच्या उपअभियंत्यांच्या जागी नवीन अधिकाऱ्याची नेमणूकच नाही. त्यामुळे ठेकेदाराकडून कनिष्ठ अभियंत्यांच्या देखरेखीखाली महामार्गाचे काम रामभरोसे सुरू आहे.खासदार, पालकमंत्री यांनी जनतेशी चालविलेला हा खेळ असून या साऱ्याकडे दुर्लक्ष करीत केवळ काम पूर्ण करून ते हस्तांतरित करण्यात स्वारस्य असण्यामागे नेमके गौडबंगाल काय? असा सवाल मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे.याबाबत त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम चुकीच्या पद्धतीने, निकृष्ट दर्जाचे होत असल्याबाबत आम्ही न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यानंतर हे काम लवकरात लवकर पूर्ण करून ते हस्तांतरित करण्यावर खासदार, पालकमंत्री यांचा भर असल्याचे दिसत आहे.

मुळात दोन महिन्यांपूर्वी खारेपाटण विभागाचे उपअभियंता अमोल ओटवणेकर यांची कोल्हापूरला बदली झाली. त्यांच्याकडे सांगली, सातारा विभाग आहे. तसेच खारेपाटण ते जानवलीपर्यंतच्या भागाचा अतिरिक्त पदभार त्यांच्याकडेच आहे.मात्र, बदलीनंतर ते इकडे फिरकलेलेच नाहीत. तर सावंतवाडी विभागाचे उपअभियंता पाटील यांच्यानंतर येथे अधिकृत उपअभियंता देण्यात आलेले नाहीत. दोन्ही ठिकाणी केवळ कनिष्ठ अभियंताच काम पाहत आहेत. अशी दयनीय स्थिती असताना अधिकारी न देता काम पूर्ण करून ते हस्तांतरित करण्यासाठी घाई का ? असा प्रश्न उपरकर यांनी केला आहे.जनतेच्या प्रश्नांकडे सत्ताधारी खासदार, पालकमंत्री, आमदारांचे दुर्लक्षपालकमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीवेळी कार्यकारी अभियंता सलीम शेख यांनी प्रांताधिकारी कार्यालयात आठवड्यात दोन दिवस त्यांचे अधिकारी थांबतील असे सांगितले होते. मात्र, असे अधिकारी थांबल्याचे एकदाही दिसून आलेले नाही. मात्र, त्याबाबत सत्ताधाऱ्यांना सोयरसुतक नाही. लोकांच्या अनेक तक्रारी आहेत. त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

सत्ताधाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे आग्रह धरत सागरी जलक्रीडासाठी परवानगी मिळवित ते सुरू केले. मात्र, शासनाने आता त्याला बंदी आणली. सत्ताधारी मंडळी लोकांच्या व्यवसायाशी खेळत आहेत. मात्र, जनतेच्या प्रश्नांबाबत या मंडळीना काहीच वाटत नाही. जिल्हा शल्यचिकित्सकांची बदली केली.मात्र, जनतेच्या सोयीसाठी पर्यायी डॉक्टरही उपलब्ध केला नाही. असलेल्या डॉक्टरांची बदली करताना दुसरे डॉक्टर नसतील तर लोकांना आरोग्य सुविधा कशा मिळणार? मात्र, जनतेच्या समस्यांकडे सत्ताधारी खासदार, पालकमंत्री सोयीस्कर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही परशुराम उपरकर यांनी केला आहे. 

टॅग्स :highwayमहामार्गMNSमनसेParshuram Upkarपरशुराम उपरकर sindhudurgसिंधुदुर्गpwdसार्वजनिक बांधकाम विभागKankavliकणकवली