शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

विनायक राऊत हेच पुन्हा खासदारकीचे उमेदवार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 11:59 IST

लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघातून विद्यमान खासदार विनायक राऊत हेच पुन्हा निवडणूक लढवतील. या निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार ठरला असून कोणी काही बोलले तरी त्यात बदल होण्याचा प्रश्नच येत नाही. असे भूमिका शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी स्पष्ट केली .

ठळक मुद्देविनायक राऊत हेच पुन्हा खासदारकीचे उमेदवार !वैभव नाईक यांनी स्पष्ट केली भूमिका ; भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधाची पार्शवभूमी

कणकवली : लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघातून विद्यमान खासदार विनायक राऊत हेच पुन्हा निवडणूक लढवतील. या निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार ठरला असून कोणी काही बोलले तरी त्यात बदल होण्याचा प्रश्नच येत नाही. असे भूमिका शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी स्पष्ट केली .कणकवली येथील विजय भवन मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, नगरसेवक सुशांत नाईक, मानसी मुंज, शहर प्रमुख शेखर राणे, तेजस राणे, सुजित जाधव, युवा सेना जिल्हा प्रमुख गीतेश कडू, तेजल लिंग्रज, साक्षी आमडोसकर, प्रतीक्षा साटम,अनुप वारंग, रीमेश चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी विनायक राऊत यांच्या खासदारकीच्या उमेदवारीला भाजप कार्यकर्त्यांकडून विरोध केला जात आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना वैभव नाईक पुढे म्हणाले, शिवसेना व भाजप यांची निवडणुकीसाठी युती झाली आहे. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्रितपणे प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे भाजप व शिवसेना नेत्यांबरोबरच कार्यकर्त्यांमध्येही निश्चितच समन्वय होईल. तसेच नाराज असलेल्यांची नाराजीही दूर केली जाईल.खासदार विनायक राऊत यांनी सक्षमपणे गेली पाच वर्षे काम केले आहे. केंद्रशासनाच्या विविध योजना जिल्ह्यात राबविल्या आहेत. नरेंद्र मोदिंच्या नेतृत्वाखाली ते निवडणूक लढवीत आहेत. तर पक्षाच्या आदेशावर काम करणारे शिवसेना व भाजपचे कार्यकर्ते आहेत.त्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधला जाईल . असेही वैभव नाईक यावेळी म्हणाले.संदेश पारकरांशी आमचे घरगुती संबध !भाजप नेते संदेश पारकर यांच्याशी आमचे खूप वर्षांपासून घरगुती संबध आहेत. त्यामुळे आम्ही एकमेकांना भेटत असतो. विधानसभा निवडणूक समोर ठेवून आमची कोणतीही भेट नाही. सध्या आम्ही लोकसभेची तयारी करीत आहोत. तसेच युती झाल्यामुळे भाजप मधील नेते शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता सध्या तरी नाही. अशा शब्दात संदेश पारकर यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चचेर्बाबतचे स्पष्टीकरण आमदार वैभव नाईक यांनी यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरा दरम्यान दिले.राणेंची भूमिका सतत बदलते !शिवसेनेचे खासदार तसेच आमदार निवडून येत असल्याने नारायण राणेंची खऱ्या अथार्ने अधोगती झाली आहे. त्यामुळे शिवसेनेची अधोगती झाली असे वक्तव्य त्यांनी करू नये. शिवसेना - भाजप युती झाल्यामुळे तसेच शिवसेनेच्या कामाच्या झपाट्यामुळे त्यांचा पक्ष खासदारकीच्या निवडणुकीतून माघार घेण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे त्यांनी विनाकारण आमच्यावर टीका करण्यापेक्षा आपल्या कार्यसम्राट सुपुत्राची जाहीर केलेली उमेदवारी कायम ठेवावी आणि निवडणूक लढवावी. म्हणजे जनता त्यांना जागा दाखवून देईल.असे यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९sindhudurgसिंधुदुर्गVaibhav Naikवैभव नाईक