शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

विनायक राऊत हेच पुन्हा खासदारकीचे उमेदवार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 11:59 IST

लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघातून विद्यमान खासदार विनायक राऊत हेच पुन्हा निवडणूक लढवतील. या निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार ठरला असून कोणी काही बोलले तरी त्यात बदल होण्याचा प्रश्नच येत नाही. असे भूमिका शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी स्पष्ट केली .

ठळक मुद्देविनायक राऊत हेच पुन्हा खासदारकीचे उमेदवार !वैभव नाईक यांनी स्पष्ट केली भूमिका ; भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधाची पार्शवभूमी

कणकवली : लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघातून विद्यमान खासदार विनायक राऊत हेच पुन्हा निवडणूक लढवतील. या निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार ठरला असून कोणी काही बोलले तरी त्यात बदल होण्याचा प्रश्नच येत नाही. असे भूमिका शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी स्पष्ट केली .कणकवली येथील विजय भवन मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, नगरसेवक सुशांत नाईक, मानसी मुंज, शहर प्रमुख शेखर राणे, तेजस राणे, सुजित जाधव, युवा सेना जिल्हा प्रमुख गीतेश कडू, तेजल लिंग्रज, साक्षी आमडोसकर, प्रतीक्षा साटम,अनुप वारंग, रीमेश चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी विनायक राऊत यांच्या खासदारकीच्या उमेदवारीला भाजप कार्यकर्त्यांकडून विरोध केला जात आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना वैभव नाईक पुढे म्हणाले, शिवसेना व भाजप यांची निवडणुकीसाठी युती झाली आहे. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्रितपणे प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे भाजप व शिवसेना नेत्यांबरोबरच कार्यकर्त्यांमध्येही निश्चितच समन्वय होईल. तसेच नाराज असलेल्यांची नाराजीही दूर केली जाईल.खासदार विनायक राऊत यांनी सक्षमपणे गेली पाच वर्षे काम केले आहे. केंद्रशासनाच्या विविध योजना जिल्ह्यात राबविल्या आहेत. नरेंद्र मोदिंच्या नेतृत्वाखाली ते निवडणूक लढवीत आहेत. तर पक्षाच्या आदेशावर काम करणारे शिवसेना व भाजपचे कार्यकर्ते आहेत.त्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधला जाईल . असेही वैभव नाईक यावेळी म्हणाले.संदेश पारकरांशी आमचे घरगुती संबध !भाजप नेते संदेश पारकर यांच्याशी आमचे खूप वर्षांपासून घरगुती संबध आहेत. त्यामुळे आम्ही एकमेकांना भेटत असतो. विधानसभा निवडणूक समोर ठेवून आमची कोणतीही भेट नाही. सध्या आम्ही लोकसभेची तयारी करीत आहोत. तसेच युती झाल्यामुळे भाजप मधील नेते शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता सध्या तरी नाही. अशा शब्दात संदेश पारकर यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चचेर्बाबतचे स्पष्टीकरण आमदार वैभव नाईक यांनी यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरा दरम्यान दिले.राणेंची भूमिका सतत बदलते !शिवसेनेचे खासदार तसेच आमदार निवडून येत असल्याने नारायण राणेंची खऱ्या अथार्ने अधोगती झाली आहे. त्यामुळे शिवसेनेची अधोगती झाली असे वक्तव्य त्यांनी करू नये. शिवसेना - भाजप युती झाल्यामुळे तसेच शिवसेनेच्या कामाच्या झपाट्यामुळे त्यांचा पक्ष खासदारकीच्या निवडणुकीतून माघार घेण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे त्यांनी विनाकारण आमच्यावर टीका करण्यापेक्षा आपल्या कार्यसम्राट सुपुत्राची जाहीर केलेली उमेदवारी कायम ठेवावी आणि निवडणूक लढवावी. म्हणजे जनता त्यांना जागा दाखवून देईल.असे यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९sindhudurgसिंधुदुर्गVaibhav Naikवैभव नाईक