शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

अन् समोरची गर्दी पाहून वाजपेयी झाले होते अवाक्, आठवण अटलजींच्या सिंधुदुर्गातील एकमेव सभेची

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 1:23 AM

भाजपाची स्थापना झाल्यानंतर पहिले राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांची निवड झाली होती. हा काळ साधारणता 1980 च्या दशकाचा असावा, त्यानंतर वाजपेयीची कोकणात सभा घेण्याचे ठरले.

-अनंत जाधव सावंतवाडी - भाजपाची स्थापना झाल्यानंतर पहिले राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांची निवड झाली होती. हा काळ साधारणता 1980 च्या दशकाचा असावा, त्यानंतर वाजपेयीची कोकणात सभा घेण्याचे ठरले. त्यावेळी रत्नागिरी ऐवजी सिंधुदुर्ग वर एकमत झाले.आणि 1982-83 च्या  दरम्यान  देवगड जामसंडेत सभा घेण्यात आली. वाजपेयी दहा तासाचा प्रवास करत मुंबई हून  कोल्हापूर मार्गे जामसंडेत आले होते. एवढ्या लांबचा प्रवास बघून वाजपेयी सहकाऱ्यांना प्रवासातच म्हणाले होते की एवढ्या लांब सभा घेता लोक येतील ना. पण सहकारी त्याना धीर देत होते. आणि जेव्हा प्रत्यक्षात वाजपेयी सभास्थळी दाखल झाले तेव्हा ते गर्दी बघून चांगलेच  अवाक झाल्याचे भाजपाचे ज्येष्ठ नेते माधव भंडारी यांनी सांगितले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आपल्या राजकीय कारकिर्दीत फक्त एक वेळाच सिंधुदुर्ग मध्ये आले होते.असे ही त्यांनी सांगितले.

भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे गुरूवारी सांयकाळी दिल्लीतील एम्स रूग्णालयात निधन झाले आहे.त्यांच्या निधनानंतर भाजपा नेते माधव भंडारी यांनी  वाजपेयीच्या सिंधुदुर्ग भेटीच्या आठवणी ताज्या केल्या यावेळी भंडारी म्हणाले,1980 चे दशक असावे मुंबई पक्षाची स्थापना झाल्यानंतर पक्षाचे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अटलबिहारी वाजपेयींची निवड झाली होती.आम्ही काही पदधिकारी जिल्हयातून वाजपेयी यांची भेट घेण्यास गेलो होतो.यावेळी राज्यातील काही नेते सोबत होते.आम्ही सिंधुदुर्गमध्ये येण्याचा  प्रस्ताव दिला तेव्हा वाजपेयीनी कोणताही संकोच न बाळगता येण्याचे मान्य केले. आम्हाला धक्काच बसला सभेची तारीख ही ठरली कुठली पुढे निवडणूक नव्हती तरी वाजपेयी 1982 -83 च्या दरम्यान सिंधुदुर्ग जिल्हयात आले.येतना कार ने ते मुंबई तून कोल्हापूर मार्गे सिधुदुर्ग मध्ये येण्यास निघाले वाजपेयी कोल्हापूरातून देवगड कडे निघाले तेव्हा रस्ता तसेच आजबाजूचा परिसर बघून वाजपेयी आपल्या सहकार् याना म्हणाले.एवढ्या लांब सभा घेता लोक येतील ना तेव्हा सोबतचे सहकारी काही क्षणासाठी गप्प बसले पण नंतर वाजपेयीना धीर देत गर्दी होईल असे सांगितले प्रत्यक्षात  वाजपेयी  सभे च्या दिवशी दुपारच्या सुमारास जामसंडेत पोचले तेव्हा सभास्थळी समोरील गर्दी बघून वाजपेयी चांगलेच अवाक झाले.

सभा संपल्यानंतर तत्कालीन भाजपाचे नेते आप्पा गोगटे च्या घरी जेवण घेतले. तेथे ही त्यांनी सभेला वीस ते पंचवीस हजार लोक भर उन्हात आले होते.त्यानी आयोजकांचे कैतुक केले होते. सिंधुदुर्गच्या आठवणी जागवत किती लांबचा हा प्रवास, असे म्हणत नंतर वाजपेयी आल्या मार्गे म्हणजेच कोल्हापूर हून मुंबई कडे रवाना झाले होते. त्यानंतर दोन ते तीन वेळा रत्नागिरी मध्ये आले पण पुन्हा केव्हा ही वाजपेयीना सिंधुदुर्गमध्ये येण्याचा योग आला नाही, असे भंडारी यांनी सांगितले.

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीsindhudurgसिंधुदुर्ग