शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
2
"प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
4
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
5
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
6
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
7
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
9
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
10
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
11
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
12
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
13
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
14
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
15
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
16
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
17
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
18
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
19
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
20
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार

महामार्ग बाहेरून गेल्याचा सावंतवाडीवर परिणाम नाही, केसरकर-साळगावकर यांचे एकमत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 12:38 AM

शहरातून रस्ता न जाता तो बाहेरून गेल्यामुळे बाजारपेठेवर कोणताही परिणाम झाला नाही. रोजगार आला की विकास आपणच होतो, असे उद्गार नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी काढले. त्याला पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत साळगावकरांचीच री पुढे ओढली.

 सावंतवाडी - शहरातून रस्ता न जाता तो बाहेरून गेल्यामुळे बाजारपेठेवर कोणताही परिणाम झाला नाही. रोजगार आला की विकास आपणच होतो, असे उद्गार नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी काढले. त्याला पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत साळगावकरांचीच री पुढे ओढली. यापुढे सावंतवाडी उद्योगात रोल मॉडेल असेल, अशी ग्वाही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. तसेच साळगावकरांच्या संकल्पनेतील विकास परिषद आपल्या अध्यक्षतेखाली होण्यासही मंत्री केसरकर यांनी हिरवा कंदिल दर्शविला आहे.

एका खासगी कार्यक्रमासाठी मंत्री दीपक केसरकर यांच्यासह नगराध्यक्ष बबन साळगावकर हे एकाच व्यासपीठावर आले होते. त्यावेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी गेल्या सत्तर वर्षात विकास झाला नाही. तो विकास आता होणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन विकासाची दिशा ठरवूया, असे सांगितले. तसेच सावंतवाडीच्या बाहेरून रस्ता गेला म्हणजे सावंतवाडीतील धंदा कमी झाला असे होत नाही. आता नव्याने वेगवेगळे प्रकल्प येत आहेत. ते प्रकल्प रोजगाराबरोबरच विकासाला दिशा देणारे ठरतील, अशी अपेक्षाही साळगावकर यांनी व्यक्त करत आम्ही विकास परिषद घेतो ती तुमच्या अध्यक्षतेखाली व्हावी, अशी अपेक्षा व्यकत केली.यावेळी बोलतना मंत्री केसरकर म्हणाले, सिंधुदुर्गमध्ये रोजगाराचे एक नवे पर्व सुरू होत आहे. याचा आम्हाला अभिमान आहे. सावंतवाडीजवळ चष्म्याचा कारखाना तसेच डाटा सेंटरही सुरू करण्यात येणार आहे. यातून थेट पाचशे महिलांना सावंतवाडीत रोजगार मिळेल. तर इतर ठिकाणी रोजगार मिळेल तो वेगळाच आहे. त्या शिवाय आपला आयएएस व आयएपीएस सेंटरही लवकरच मार्गी लागणार आहे. सिंधुदुर्गचा झपाट्याने विकास होत असताना चिपीमध्ये पहिले विमान १२ सप्टेंबरलाच येणार आहे. माल्टातून पहिले विमान चिपीला येईल, असेही मंत्री केसरकर यांनी सांगितले. सिंधुदुर्ग पर्यटनात अग्रेसर असेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.सावंतवाडी ही विकासाचे रोल मॉडेल करत असतानाच बाहेरून रस्ता गेला म्हणजे धंदा होत नाही असे नाही. मात्र आता ती मानसिकता सर्वांनी सोडून देऊन नवीन स्वीकारण्याची तयारी ठेवूया. रोजगारातून विकास साधूया, असे सांगत यापुढे सावंतवाडीतील शिल्पग्राम तसेच हेल्थ फार्म सुरू होईल, असे त्यांनी सांगितले.  ७२ कोटीचा निधी मागे जाणार होतासिंधुदुर्गमध्ये मागील वर्षातील ७२ कोटीचा निधी मागे जाणार होता. पण तो मी दोन महिन्यांसाठी थांबवला आणि तो खर्ची पडत आहे. हे मी अर्थराज्य मंत्री असल्याने शक्य झाले, अन्यथा निधी मागे गेला असता. अधिकाºयांनीही आता चांगले काम केले पाहिजे, अशी अपेक्षाही मंत्री केसरकर यांनी यावेळी व्यक्त 

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर sindhudurgसिंधुदुर्गnewsबातम्या