शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
4
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
5
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
6
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
7
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
8
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
9
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
10
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
11
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
12
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
13
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
14
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
15
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
16
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
17
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
18
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
19
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
20
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
Daily Top 2Weekly Top 5

२७ शाळांमध्ये शिक्षक नाहीत

By admin | Updated: September 26, 2014 23:34 IST

शैक्षणिक सत्र : पालकांची चिंता वाढली, अभ्यासक्रम अपूर्ण राहण्याची भीती

रत्नागिरी : पहिले शैक्षणिक सत्र संपले तरी जिल्ह्यातील २७ शाळांमध्ये अद्याप एकाही शिक्षकाचा पत्ता नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात दिसून येत आहे. जवळच्या गावातील किंवा वाडीतील शिक्षकांकडे संबंधित शाळांची जबाबदारी तात्पुरत्या स्वरूपात सुपूर्द करण्यात आल्याने पालकवर्ग चिंताग्रस्त झाला आहे.सर्व शिक्षा अभियानांतर्गत व आरटीई कायद्यानुसार शिक्षण सक्तीचे करण्यात आले. एकीकडे शिक्षणाचा प्रसार शासन करीत आहे. शाळांचा दर्जा सुधारण्याचा प्रयत्न सुरू आहे. असे असताना दुसरीकडे विद्यार्थी शाळेत असताना शिक्षकांचाच पत्ता नाही. शाळेचे पहिले शैक्षणिक सत्र संपले आहे. काही शाळांमध्ये सहामाही परीक्षा सुरू झाल्या आहेत, तर जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये एक तारखेपासून सहामाई परीक्षा सुरू होणार आहेत. परीक्षा तोंडावर असताना संबंधित शाळांमध्ये अद्याप शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाईल का, अशी भीती पालकांच्या मनात निर्माण झाली आहे.इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळेत पटसंख्येनुसार शिक्षकांची नियुक्ती करण्यात येते. काही शाळांमध्ये एकापेक्षा अधिक शिक्षक आहेत. परंतु जिल्ह्यातील २७ शाळांमध्ये शिक्षक नसल्यामुळे बाजूच्या शाळेतील शिक्षकांकडे अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना अध्यापन करण्याबरोबरच इतर विविध शैक्षणिक उपक्रम राबवावे लागतात. त्यामुळे शैक्षणिक अध्यापन तसेच विविध शैक्षणिक व प्रशासकीय कामकाज पूर्ण करीत असताना अतिरिक्त शाळांमधील शिक्षकांचे अध्यापन कसे पूर्ण करायचे हा प्रश्न शिक्षकांसमोर उभा ठाकला आहे. छोट्या विद्यार्थ्यांसाठी पूर्ण वेळ द्यावा लागतो, परंतु तसे होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात दिसून येत आहे.रत्नागिरी जिल्ह्यात दोन हजार ७४८ शाळा असून, ९ हजार ५०० इतकी शिक्षकांची संख्या आहे. मंडणगड व लांजा तालुक्यात प्रत्येकी एक, दापोली, खेड, चिपळूण तालुक्यात प्रत्येकी दोन राजापूर तालुक्यात चार, रत्नागिरी तालुक्यात १५ मिळून एकूण २७ शाळांमध्ये शून्य शिक्षक दिसून येत आहेत. अन्य तालुक्यांपेक्षा रत्नागिरी तालुक्यात शून्य शिक्षकांच्या सर्वाधिक शाळा आहेत. शैक्षणिक सत्र संपले असून, लवकरच सहामाही परीक्षा सुरू होणार आहेत. परंतु शिक्षकांची आस्थापना सूची ३० सप्टेंबर रोजी जाहीर होणार आहे. संबंधित शिक्षकांची सूची मंजूर झाल्यानंतरच जिल्ह्यातील रिक्त शिक्षकांची पदे मंजूर करण्यात येणार आहेत. त्यानंतर शून्य शिक्षक असलेल्या शाळांवरील शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या जातील, असे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)