शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा? बिहारला ना एकत्र गेले, ना एकत्र आले, एकमेकांकडे पाहून कोरडंच हसले; नेमके काय घडले? 
2
'एनडीएने बिहारची मते ५.५ रुपये प्रतिदिन दराने खरेदी केली', प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
3
'मुलगा गोरा कसा?'; संशयी पतीने क्रौर्याची सीमा ओलांडली! बाळाच्या रंगावरून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला अन्.. 
4
कराची शेअर बाजारात तेजी... पाकिस्तानची सर्वात मोठी कंपनी कोणती? रिलायन्सच्या तुलनेत कुठे?
5
Mumbai Crime: ऑफिसमधून बाहेर पडताच कारच्या समोरून आले आणि घातल्या गोळ्या; मुंबईतील घटनेचा व्हिडीओ आला समोर
6
Jara Hatke : जगातील अद्भुत कोपरा, जिथे सूर्य दोन महिने 'सुट्टीवर' जातो; तापमानही जाते शून्याच्या खाली!
7
Numerology 2026: ६ मूलांकांचे दु:खाचे दिवस सरणार, सुवर्ण काळ येणार; २०२६ला मालामाल-भाग्योदय!
8
उदयपूरमध्ये शाही विवाह सोहळा, ज्युनियर ट्रम्पपासून VVIP पाहुणे येणार; कोण आहे वधू आणि वर?
9
Smriti Mandhana : समझो हो ही गया... स्मृती मंधानाने केली साखरपुड्याची अनोखी घोषणा, रविवारी होणार विवाह
10
किलर स्माईल ते किलर्स स्माईल! माधुरी दीक्षितची सस्पेन्स सीरिज 'या' दिवशी होणार रिलीज
11
एकनाथ शिंदेंकडून दिल्लीत तक्रार पण मंत्री उदय सामंतांनी रवींद्र चव्हाणांचं केलं भरभरून कौतुक
12
धक्कादायक! शाळेच्या छतावरून उडी घेऊन १३ वर्षीय विद्यार्थिनीने आयुष्य संपवले, नेमके कारण काय?
13
असं काय झालं की, लग्नाला फक्त ३ दिवस बाकी असताना नवरदेवाने संपवले आयुष्य; ४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
14
"युट्यूबमधून मी जास्त पैसे कमावते...", फराह खानचा खुलासा; कोरिओग्राफी-दिग्दर्शनाबद्दल म्हणाली...
15
Jalana: १३ वर्षीय विद्यार्थिनीने शाळेतच संपवले जीवन; पालकांचा शिक्षकावर गंभीर आरोप
16
"जर मी तिला शाळेत पाठवलं नसतं तर..."; चौथ्या मजल्यावरुन उडी मारलेल्या अमायराच्या आईचा टाहो
17
मोमोजचा व्यवसाय, प्रचंड मेहनती, नवीन फ्लॅटही घेतला; साहिलने जे कमावलं ते ड्रायव्हिंगने गमावलं
18
The Family Man 3 Review: 'श्रीकांत तिवारी'वरच 'टास्क फोर्स'ला संशय; या मिशनमध्ये 'द फॅमिली मॅन' पास की फेल? वाचा रिव्ह्यू
19
Pune Accident: ताम्हिणी घाटात जीप ५०० फूट दरीत कोसळली, ६ तरुणांचा मृत्यू
20
IND vs SA: भारताला मोठा धक्का! शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, अनुभवी खेळाडूला कर्णधारपद
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधाऱ्यांनी सिंधुदुर्गातील जनतेला फक्त आश्वासने देवून फसविले, मनसे नेते परशुराम उपरकरांचे टीकास्त्र

By सुधीर राणे | Updated: September 15, 2023 15:42 IST

..तेव्हा श्रेय घेण्यासाठी पुढे पुढे करणारे आता कोठे गेले?

कणकवली: मागील १५ वर्षे सर्व सत्ताधाऱ्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला फक्त विविध आश्वासने देवून सातत्याने फसवले आहे. विकासाच्या फक्त मोठ्मोठया वलग्नाच करण्यात आल्याची टीका मनसे सरचिटणीस, माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली. कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.उपरकर म्हणाले, चिपी विमानतळाच्या श्रेयासाठी पुढे पुढे करणारे आणि आपसात भांडणारे अनेक राजकीय नेते होते. तर अनधिकृतरित्या विमान उडवून एका  माजी पालकमंत्र्यांनी आणि केंद्रीय उद्योगमंत्र्यांनीही स्वतः श्रेय घेण्यासाठी चढाओढ केली. सध्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनीही गणेशोत्सवात चिपी वरून नियमित विमानसेवा सुरू राहील हे फसवे आश्वासन दिले. मात्र, विमान सेवा ठप्प झाल्यावर तेव्हा श्रेय घेण्यासाठी पुढे पुढे करणारे आता कोठे गेले?सध्या पालकमंत्री रवींद्र चव्हाण असो किंवा खासदार विनायक राऊत अथवा स्थानिक आमदार या सर्वांनी जनतेची फसवणूक केली आहे. पालकमंत्र्यांनी गणेशोत्सवापूर्वी रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवर आच्छादन घालण्याचे दिलेले आश्वासन हवेत विरले आहे. त्यामुळे गणेशचतुर्थीला रेल्वेने येणारे गणेशभक्त पावसात भिजत गावी पोहोचणार आहेत. तसेच सुशोभीकरणाचे कामही सुरू झालेले नाही. भाजप जिल्हाध्यक्षानी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी  २० कोटी रुपये निधीची मागणी केली आहे. त्यानिमित्ताने त्यांनी रस्ते खड्डेयुक्त असल्याचे मान्य केले. जिल्ह्यातील ठेकेदारांनी केलेल्या कामांची ७० ते८० कोटी रुपये देणे बाकी आहे. त्यामुळे  विकासाच्या गप्पा मारणारे जनतेला फसवत आहेत.महामार्गाची एक लेन जरी चालू केली असली तरी अन्य रस्ते खड्डेमय झाले आहेत. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात बांधकाम विभाग प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांची उदासीनता दिसून येते. मंत्री रवींद्र चव्हाण यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाकडे दुर्लक्ष होत आहे. जिल्हयात शासकीय रुग्णालयात डॉक्टर नाहीत, गोरगरीब रुग्णांना चांगली आरोग्य सेवा मिळत नाही. याकडे कोणीच पाहत नाहीत. त्यामुळे पालकमंत्री हे कशासाठी आहेत? फक्त स्वतःच्या विकासासाठी आहेत का? असा प्रश्न पडतो. जिल्ह्याच्या दृष्टीने विचार करता पालकमंत्री आणि शिक्षण मंत्री हे दोन्ही निष्क्रिय ठरले असल्याची टीकाही त्यांनी केली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMNSमनसेParshuram Upkarपरशुराम उपरकर