शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: बाबासाहेबांच्या गुरुवर्यांच्या आठवणी जन्मगावी जतन व्हाव्यात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 14:15 IST

सावळाराम भराडकर वेंगुर्ला : मराठीतील आद्य शिवचरित्रकार गुरूवर्य कृष्णराव अर्जुन केळूसकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या शालेय जीवनात ...

सावळाराम भराडकरवेंगुर्ला : मराठीतील आद्य शिवचरित्रकार गुरूवर्य कृष्णराव अर्जुन केळूसकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या शालेय जीवनात भेट म्हणून दिलेले स्वलिखित गौतम बुद्धांचे चरित्र बाबासाहेबांच्या जीवनात प्रेरणादायी ठरले. डॉ. बाबासाहेबांनी गुरूस्थानी मानलेल्या गुरूवर्य केळूसकर यांचे वास्तव्य असलेले वेंगुर्ला तालुक्यातील केळूस हे गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी भूषणावह आहे. त्यांच्या आठवणींचा ठेवा म्हणून केळूस गावाचे ऐतिहासिक दृष्ट्या जतन होणे गरजेचे असताना, शासनाला मात्र त्यांच्या जन्म गावाचा विसर पडल्याचे दिसत आहे.मराठीतील चरित्रलेखक, भाषांतरकार, वक्ते, विचारवंत, सुधारक आणि सामाजिक कार्यकर्ते गुरूवर्य कृष्णराव अर्जुन केळूसकर यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ले तालुक्यातील केळूस येथे २० ऑगस्ट १८६० साली झाला. केळूस गावी तारादेवी मंदिरानजीक त्यांचे वास्तव्य होते. स्वांतत्र्यपूर्व काळातील एका झाडाखाली भरवल्या जाणाऱ्या शाळेत त्यांनी काही काळ शालेय शिक्षण घेतले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते  मुंबईला आले. मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेतलेल्या केळूसकरांना उच्चशिक्षण घेण्याची इच्छा होती, मात्र घरच्या गरिबीमुळे त्यांना लवकरच शिक्षण सोडून नोकरी  पत्करावी लागली. सुरुवातीला डोंगरी भागातील इस्रायली शाळेत आणि नंतर विल्सन हायस्कूलमध्ये त्यांनी अध्यापन केले.केळूसकर यांनी १८९८ साली स्वत: लिहिलेले गौतम बुद्धांचे चरित्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या शालेय जीवनात भेट म्हणून दिले होते. ते चरित्र बाबासाहेबांच्या जीवनात प्रेरणा देणारे ठरले. त्यामुळे डॉ. बाबासाहेब केळूसकर यांना आपल्या गुरूस्थानी मानले होते, असा उल्लेख धनंजय कीर यांनी लिहिलेल्या केळूसकरांच्या चरित्रात मिळतो. तसेच, त्यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील चरित्रग्रंथाच्या पहिल्या खंडातही असाच उल्लेख असून, इतरही लेखकांनी असे  लिखाण केले आहे.गुरूवर्य कृष्णराव केळूसकर यांचे वर्णन धनंजय कीर यांनी ‘ऋषितुल्य प्रज्ञावंत’ असे केले आहे. त्यांचे वास्तव्य असलेले केळूस गाव जिल्ह्यासाठी भूषण असून, या गावाचे ऐतिहासिकदृष्ट्या जतन होणे गरजेचे आहे. पण, आज तेथे त्यांच्या घराचे अवशेषही बाकी नाहीत, हे दुर्दैव आहे. शासनाने तेथे त्यांचे स्मारक बांधण्याची मागणीही केळूसवासीयांतून होत आहे. शासनाला मात्र याचा विसर पडल्याने हे गाव दुर्लक्षित राहिले आहे.

केळूसकरांच्या पुस्तकावर बाबासाहेबांची प्रतिक्रियागुरूवर्य केळुसकर लिखित ‘गौतम बुद्धांचे चरित्र’ या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर डॉ. बाबासाहेबांची प्रतिक्रिया दिली आहे. ‘दादा केळूसकरांनी मला त्यांच्या बुद्धांच्या चरित्राचे पुस्तक दिले.  हे पुस्तक वाचल्यानंतर माझ्यात काही निराळाच प्रकाश पडला’ असा उल्लेख त्यात केला आहे.

गुरूवर्य केळूसकर यांनी लिहिलेली चरित्रेगुरूवर्य केळूसकर यांनी एल्लाप्पा बाळाराम, गुणाजीराव घुले, स्वामी गोविंद जनार्दन बोरकर, जनाबाई रोकडे, माधवराव रोकडे, म्यूर मॅकेंझी, रामचंद्र विठोबा धामणस्कर, गौतम बुद्ध व तुकाराम महाराज यांच्यावरील चरित्र ग्रंथांबरोबरच केळूसकरांनी क्षत्रियकुलावंतस  छत्रपती शिवाजी महाराजांचेही पहिले समग्र चरित्र ‘छत्रपती शिवाजी महाराज’ १९०७ साली प्रसिद्ध केले. सान्वय सार्थ सटीक श्रीमद्भागवतगीता हे पुस्तकही प्रसिद्ध आहे. तसेच ख्रिस्ती धर्मग्रंथ बायबलचा मराठी अनुवादही त्यांनी केला आहे.

शासनाचे प्रयत्न गरजेचेमहाराष्ट्राची राजधानी मुंबईत गुरूवर्य केळूसकर यांच्या नावाने राजमार्ग जातो. हा केळूस गावचा अभिमान आहे. केळूस गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी गुरूवर्य केळूसकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले जाते. डॉ. बाबासाहेब आबेडकरांची स्मारके राज्यात ठिकठिकाणी आहेत. तसेच, स्मारक गुरूवर्य कुष्णराव केळूसकर यांच्या जन्मगावी केळूस येथे होण्यासाठी सेवाभावी संस्था, लोकप्रतिनिधी व शासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.

गुरूवर्य कुष्णराव केळूसकर यांचे जन्मगावी  स्मारक होण्यासाठी आपण प्रयत्नशील असून, केळूस येथे जीर्ण असलेली शाळा पुनर्जीवित करून त्याठिकाणी गुरूवर्यांच्या आठवणी चिरंतर राहण्यासाठी आपण प्रस्ताव सादर केला आहे. वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. त्यासाठी शासनाचे सहकार्य खूप गरजेचे आहे. - योगेश शेटये,  सरपंच, केळूस ग्रामपंचायत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती