शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
5
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
6
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
7
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
8
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
9
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
10
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
11
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
12
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
13
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
14
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
15
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
16
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
17
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
18
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
19
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
20
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
Daily Top 2Weekly Top 5

दगड कोसळून महिलेचा मृत्यू

By admin | Updated: October 30, 2014 00:46 IST

महिला कऱ्हाडची : आंबोली धबधब्यातील घटना

सावंतवाडी : अंबोली येथील मुख्य धबधब्यावर नातेवाइकांसह पर्यटनासाठी आलेल्या कऱ्हाड येथील क्रांती सतीश दोडगे (वय ३५) यांच्या डोक्यावर दगड कोसळल्याने त्या जखमी झाल्या. त्यांना तत्काळ सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डोक्यावरील खोल जखमेतून अतिरक्तस्राव झाल्याने उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. अंबोलीत सध्या पर्यटनाचा हंगाम सुरू आहे. आज, बुधवारी सायंकाळी डोक्यावर दगड कोसळून जखमी झालेल्या पर्यटक महिलेच्या मृत्यूमुळे अंबोली येथील पर्यटनातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कऱ्हाड येथील क्रांती दोडगे यांच्यासह अकराजण आज, सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास तवेरा गाडीने अंबोली व गोवा येथे पर्यटनासाठी आले होते. अंबोली येथील अन्य पर्यटनस्थळे फिरल्यानंतर ते सारेजण सायंकाळी चारच्या सुमारास अंबोली मुख्य धबधब्यावर मौजमजा करण्यासाठी पोहोचले. परतीच्या पावसामुळे येथील धबधब्यामध्ये अजूनही पाण्याचा प्रवाह मुबलक आहे. क्रांती दोडगे यांच्यासह सर्वजण मुख्य धबधब्यावर आनंद लुटत असताना पाण्याच्या प्रवाहाबरोबर धबधब्यातील एक दगड त्यांच्या डोक्यावर कोसळला. यामुळे त्यांच्या डोक्यात खोलवर जखम झाली आणि रक्तस्राव होऊ लागला. त्यांच्यासोबत असलेले अशोक गायकवाड, सुनीता गायकवाड, विश्रांती लोखंडे, कविता गायकवाड, प्रशांत गायकवाड, श्रेया लोखंडे, संस्कृती लोखंडे यांच्यासह आंबोलीतील स्थानिकांनी त्यांना तत्काळ तवेरा गाडीतून सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. क्रांती यांचे पती पुणे येथे रिक्षा व्यवसाय करतात. सध्या क्रांती बहिणीसोबत कऱ्हाड येथे राहायला होत्या. आज सकाळी त्या बहीण, मावशी, मावस भाऊ आणि अन्य नातेवाइकांसह अंबोली येथे पर्यटनासाठी आल्या होत्या. अंबोली पर्यटनातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरअंबोली येथे लाखो पर्यटक पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येतात. मात्र, पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न अजूनही अधांतरीच आहे. येथील रेलिंग, रस्त्याच्या बाजूच्या दरडींवर व धबधब्यांवर जाळी बसविण्याची मागणी वेळोवेळी करण्यात येते; परंतु प्रशासनाकडून अद्यापही याकडे दुर्लक्षच करण्यात येत आहे. अशा घटनांनंतर तरी पर्यटकांच्या सुरक्षेकडे लक्ष दिले जावे, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत.