शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : कसवण गावातील शिवारे झाली जलयुक्त, पिण्याच्या पाण्याचीही मुबलकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 15:36 IST

कणकवली तालुक्यातील कसवण-तळवडे हे १६७३ लोकवस्तीचे गाव. परंपरागत भात शेती करण हे येथील शेतकरी बांधवांचे काम. जलयुक्त शिवार योजनेमुळे या गावातील शेतीचा काया-पालट होण्याबरोबरच रब्बी म्हणजे उन्हाळी हंगामात येथील शेतकऱ्यांनी उमेदीने शेतीची कास धरली.

ठळक मुद्देकसवण गावातील शिवारे झाली जलयुक्त, पिण्याच्या पाण्याचीही मुबलकतासिंधुदुर्ग जिल्हा कृषी अधिकारी, पत्रकारांचा पाहणी दौरा

सिंधुदुर्ग : कणकवली तालुक्यातील कसवण-तळवडे हे १६७३ लोकवस्तीचे गाव. परंपरागत भात शेती करण हे येथील शेतकरी बांधवांचे काम. जलयुक्त शिवार योजनेमुळे या गावातील शेतीचा काया-पालट होण्याबरोबरच रब्बी म्हणजे उन्हाळी हंगामात येथील शेतकऱ्यांनी उमेदीने शेतीची कास धरली.कसवण-तळवडे गावातील या जलयुक्त शिवार योजनेची पाहणी करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालय सिंधुदुर्ग व अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत पत्रकार दौरा आयोजित केला होता. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव शेळके, तालुका कृषी अधिकारी विठ्ठल राठोड, जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर, पत्रकार चंद्रशेखर देसाई, महेश सरनाईक, चंद्रकांत तांबट, भगवान लोके, अजित सावंत, सुषार सावंत या सर्वांसह या गावातील विहिरींच्या पाण्याची पातळी कशी वाढली, सिमेंट नाला बांध आदी कामांच्या प्रत्यक्ष पाहणीबरोबरच गावातील शेतकºयांशी संवाद साधला.कृषी सहाय्यक आर. आर. गावकर, वैष्णवी ठाकूर, सी. एम. कदम, कृषी पर्यवेक्षक एस. ए. कोटला, उपसरपंच गोपीनाथ सावंत यांनी गावाचे लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांच्या तसेच ग्रामसेवक एकनाथ चव्हाण यांनी कसवण-तळवडेचा ९२ लक्ष ८८ हजार रुपयांचा आराखडा तयार केला. समिती सदस्य मनोहर मालंडकर यांनी मोलाचे सहकार्य केले.

या गावाच्या परिसरात जलयुक्त शिवार आराखड्यानुसार २ नवीन तर ३ जुन्या सिमेंटनाला बांधची दुरुस्ती, १९ विहिरीतील गाळ काढण्यात आला. कोल्हापूर पद्धतीच्या व भूमिगत आशा एकूण पाच बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्यात आली.यासर्व कामांमुळे या दोन्ही गावच्या परिसरात फळझाड लागवडीचे क्षेत्र वाढण्यास मदत झाली. सुमारे २५0 हेक्टरहून अधिक क्षेत्रावर शेतकऱ्यांनी फळझाड लागवड केली. मुबलक पाणी उपलब्धतेमुळे उन्हाळी हंगामात येथील शेतकरी मूग, चवळी, कुळीथ, भूईमूग अशी पिक घेऊ लागले आहेत. मे महिन्यात या परिसरातील विहिरी कोरड्या पडायच्या. पण आता मे महिन्यातही परिसरातील विहिरींना मुबलक पाणी उपलब्ध झाले. गावच्या परिसरातील कलेश्वरवाडीतील कुलकर्णी विहिरीत पिण्याचे पाणी उपलब्ध झाले.सागवान, आंबा कलमांची लागवडयाच गावातील शेतकरी प्रशांत दळवी यांनी आपल्या तीन एकर शेतीत एक हजार सागवान तर दहा आंबा कलमांची यशस्वी लागवड केली आहे. याचबरोबर आंतरपिक भूईमूग व कुळीथ ही पिके ते घेतात. गतवर्षी त्यांनी अंतरपिक म्हणून हळदीची लागवड केली होती. केवळ पाणी उपलब्ध झालं म्हणून मी हे सर्व करु शकलो असे दळवी यावेळी म्हणाले, याच बरोबर त्यांनी यंदाच्या वर्षी बांबू लागवड करण्याचा निर्धार केला आहे.श्री पद्धतीने भात लागवडीतून दुप्पट उत्पादनगावातील शेतकरी प्रशांत दळवी, जगन्नाथ राणे, बापूशेठ कसवणकर, उदय सावंत, सखाराम गावकर, विनय राणे यांचाही अनुभव हिरवी पिक डोलणारी शिवार झाली असाच आहे. यापूर्वी उन्हाळी शेती हा विषय बोलण्यापुरताच मर्यादीत होता. पण आता उन्हाळी म्हणजेच रब्बी हंगामाच क्षेत्र वाढू लागले आहे. चवळी, मूग, भूईमूग याच बरोबर उन्हाळ्यात कलिंगडाचं पिकही यशस्वी केले आहे. या भागातील शेतकºयांनी भाताची श्री पद्धतीने लागवड करुन भाताचे उत्पन्न दुप्पट केले आहे. श्री पद्धतीने भात लागवड करण्यासाठी या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर प्रवृत्त होत आहेत.फळझाड लागवड क्षेत्रातही वाढविहिरीतील गाळ काढण्याच्या कार्यक्रमामुळे तसेच या परिसरात झालेल्या सिमेंट नाला बांध, कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची दुरुस्ती यामुळे विहिरींच्या पाणी पातळीत लक्षणीय फरक पडला. सुमारे एक मीटरने पाणी पातळी वाढण्यास मदत झाली आहे. जलयुक्त शिवार योजनेतील या विविध कामांमुळे उन्हाळी शेती क्षेत्रात वाढ होण्याबरोबरच फळझाड लागवड क्षेत्रातही वाढ होत आहे. 

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारsindhudurgसिंधुदुर्ग