शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
5
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
6
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
7
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
8
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
9
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
10
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
11
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
12
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
13
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
14
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
15
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
16
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
17
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
18
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
19
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
20
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : कसवण गावातील शिवारे झाली जलयुक्त, पिण्याच्या पाण्याचीही मुबलकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 15:36 IST

कणकवली तालुक्यातील कसवण-तळवडे हे १६७३ लोकवस्तीचे गाव. परंपरागत भात शेती करण हे येथील शेतकरी बांधवांचे काम. जलयुक्त शिवार योजनेमुळे या गावातील शेतीचा काया-पालट होण्याबरोबरच रब्बी म्हणजे उन्हाळी हंगामात येथील शेतकऱ्यांनी उमेदीने शेतीची कास धरली.

ठळक मुद्देकसवण गावातील शिवारे झाली जलयुक्त, पिण्याच्या पाण्याचीही मुबलकतासिंधुदुर्ग जिल्हा कृषी अधिकारी, पत्रकारांचा पाहणी दौरा

सिंधुदुर्ग : कणकवली तालुक्यातील कसवण-तळवडे हे १६७३ लोकवस्तीचे गाव. परंपरागत भात शेती करण हे येथील शेतकरी बांधवांचे काम. जलयुक्त शिवार योजनेमुळे या गावातील शेतीचा काया-पालट होण्याबरोबरच रब्बी म्हणजे उन्हाळी हंगामात येथील शेतकऱ्यांनी उमेदीने शेतीची कास धरली.कसवण-तळवडे गावातील या जलयुक्त शिवार योजनेची पाहणी करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालय सिंधुदुर्ग व अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत पत्रकार दौरा आयोजित केला होता. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव शेळके, तालुका कृषी अधिकारी विठ्ठल राठोड, जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर, पत्रकार चंद्रशेखर देसाई, महेश सरनाईक, चंद्रकांत तांबट, भगवान लोके, अजित सावंत, सुषार सावंत या सर्वांसह या गावातील विहिरींच्या पाण्याची पातळी कशी वाढली, सिमेंट नाला बांध आदी कामांच्या प्रत्यक्ष पाहणीबरोबरच गावातील शेतकºयांशी संवाद साधला.कृषी सहाय्यक आर. आर. गावकर, वैष्णवी ठाकूर, सी. एम. कदम, कृषी पर्यवेक्षक एस. ए. कोटला, उपसरपंच गोपीनाथ सावंत यांनी गावाचे लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांच्या तसेच ग्रामसेवक एकनाथ चव्हाण यांनी कसवण-तळवडेचा ९२ लक्ष ८८ हजार रुपयांचा आराखडा तयार केला. समिती सदस्य मनोहर मालंडकर यांनी मोलाचे सहकार्य केले.

या गावाच्या परिसरात जलयुक्त शिवार आराखड्यानुसार २ नवीन तर ३ जुन्या सिमेंटनाला बांधची दुरुस्ती, १९ विहिरीतील गाळ काढण्यात आला. कोल्हापूर पद्धतीच्या व भूमिगत आशा एकूण पाच बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्यात आली.यासर्व कामांमुळे या दोन्ही गावच्या परिसरात फळझाड लागवडीचे क्षेत्र वाढण्यास मदत झाली. सुमारे २५0 हेक्टरहून अधिक क्षेत्रावर शेतकऱ्यांनी फळझाड लागवड केली. मुबलक पाणी उपलब्धतेमुळे उन्हाळी हंगामात येथील शेतकरी मूग, चवळी, कुळीथ, भूईमूग अशी पिक घेऊ लागले आहेत. मे महिन्यात या परिसरातील विहिरी कोरड्या पडायच्या. पण आता मे महिन्यातही परिसरातील विहिरींना मुबलक पाणी उपलब्ध झाले. गावच्या परिसरातील कलेश्वरवाडीतील कुलकर्णी विहिरीत पिण्याचे पाणी उपलब्ध झाले.सागवान, आंबा कलमांची लागवडयाच गावातील शेतकरी प्रशांत दळवी यांनी आपल्या तीन एकर शेतीत एक हजार सागवान तर दहा आंबा कलमांची यशस्वी लागवड केली आहे. याचबरोबर आंतरपिक भूईमूग व कुळीथ ही पिके ते घेतात. गतवर्षी त्यांनी अंतरपिक म्हणून हळदीची लागवड केली होती. केवळ पाणी उपलब्ध झालं म्हणून मी हे सर्व करु शकलो असे दळवी यावेळी म्हणाले, याच बरोबर त्यांनी यंदाच्या वर्षी बांबू लागवड करण्याचा निर्धार केला आहे.श्री पद्धतीने भात लागवडीतून दुप्पट उत्पादनगावातील शेतकरी प्रशांत दळवी, जगन्नाथ राणे, बापूशेठ कसवणकर, उदय सावंत, सखाराम गावकर, विनय राणे यांचाही अनुभव हिरवी पिक डोलणारी शिवार झाली असाच आहे. यापूर्वी उन्हाळी शेती हा विषय बोलण्यापुरताच मर्यादीत होता. पण आता उन्हाळी म्हणजेच रब्बी हंगामाच क्षेत्र वाढू लागले आहे. चवळी, मूग, भूईमूग याच बरोबर उन्हाळ्यात कलिंगडाचं पिकही यशस्वी केले आहे. या भागातील शेतकºयांनी भाताची श्री पद्धतीने लागवड करुन भाताचे उत्पन्न दुप्पट केले आहे. श्री पद्धतीने भात लागवड करण्यासाठी या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर प्रवृत्त होत आहेत.फळझाड लागवड क्षेत्रातही वाढविहिरीतील गाळ काढण्याच्या कार्यक्रमामुळे तसेच या परिसरात झालेल्या सिमेंट नाला बांध, कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची दुरुस्ती यामुळे विहिरींच्या पाणी पातळीत लक्षणीय फरक पडला. सुमारे एक मीटरने पाणी पातळी वाढण्यास मदत झाली आहे. जलयुक्त शिवार योजनेतील या विविध कामांमुळे उन्हाळी शेती क्षेत्रात वाढ होण्याबरोबरच फळझाड लागवड क्षेत्रातही वाढ होत आहे. 

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारsindhudurgसिंधुदुर्ग