शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB च्या वाट्याला यंदाही 'ई साला कप नामदे' नाहीच! राजस्थान रॉयल्सकडून 'विराट' स्वप्नांचा चुराडा 
2
चित्त्यापेक्षा चपळ! विराट कोहलीचा भन्नाट थ्रो, ध्रुव जुरेल रन आऊट; Janhvi Kapoor चं सेलिब्रेशन
3
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी
4
२२ खून, अनेक गुन्हे, वेशांतर करून रामललांच्या दर्शनाला गेला असताना पोलिसांनी आवळल्या मुसक्या
5
हे आहेत लोकसभा निवडणूक लढवत असलेले सर्वात श्रीमंत उमेदवार, संपत्तीचा आकडा वाचून विस्फारतील डोळे  
6
"मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा...", PM मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
7
RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी
8
फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video
9
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
10
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
11
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...
12
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
13
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
14
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
15
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
16
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
17
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
18
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
19
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
20
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

सिंधुदुर्ग : महावितरणमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केला लाक्षणीक संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2019 3:55 PM

महाराष्ट्र राज्य विज मंडळ सूत्रधारी कंपनी, महानिर्मीती, महापारेषण,महावितरणमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबीत प्रश्नांसंदर्भात सोमवारी एकदिवशीय लाक्षणीक संप केला.यामुळे वीज वितरणच्या कामांवर परिणाम झाला होता.

ठळक मुद्दे महावितरणमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केला लाक्षणीक संपवीज वितरणच्या कामांवर झाला परिणाम ; संपात कंत्राटी कर्मचाऱ्याचा सहभाग नाही

कणकवली : महाराष्ट्र राज्य विज मंडळ सूत्रधारी कंपनी, महानिर्मीती, महापारेषण,महावितरणमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबीत प्रश्नांसंदर्भात सोमवारी एकदिवशीय लाक्षणीक संप केला.यामुळे वीज वितरणच्या कामांवर परिणाम झाला होता.वीज कर्मचारी अभियंते संघटना संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून हा संपकरण्यात आला. यात अधिकारी, कर्मचाऱ्याच्या संघटना सहभागी झाल्या होत्या.या कर्मचाऱ्यांनी येथील विभागीय कार्यालयाच्या प्रवेशव्दारावर जोरदार घोषणाबाजी करत या निर्णयाचा निषेध केला.महावितरण कंपनीमध्ये असलेल्या प्रचलित शाखा कार्यालयातून वीजग्राहकांना सेवा देण्याच्या पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्याचा विचार सुरु आहे. पहिल्या टप्प्यात ठाणे, पुणे विभागात काही बदल करण्याबाबतचे आदेश पारित करण्यात आले आहेत.

महावितरण कंपनीच्या एकूण महसुलाच्या ५० टक्के पेक्षा जास्त महसुल वीज बिलाच्या अनुषंगाने येत असतो. त्यामुळेच ग्राहकांना योग्य सेवा मिळाली पाहिजे. प्रस्तावित पुनर्बांधणी आराखड्यात मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आलेले आहेत.

यात शाखा कार्यालये बंद करण्यात आलेली असून अगोदरच कमी असलेली कर्मचारी संख्या ५० टक्के पेक्षा आणखिन कमी करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहक सेवेवर परिणाम होणार आहे. संघटनेच्या स्तरावर याबाबत काही प्रस्ताव सूचविण्यात आलेले होते. मात्र त्याचा अंतर्भाव यात करण्यात आलेला नाही.प्रस्तावित कर्मचारी आकृतीबंधच्या अनुषंगाने कामगार व अभियंते यांच्या पदांमध्ये मोठी कपात करण्यात आलेली आहे. याबाबत संघटनांनी सूचविलेले बदल न स्विकारता प्रशासनाकडून एकतर्फि आदेश करण्यात आले आहेत.

एकाबाजूला अति उच्चदाब केंद्रांची वाढती संख्या, वाहिन्यांचे वाढते जाळे सांभाळताना अभियंते व कर्मचारी मेटाकुटीस आलेले आहेत. त्यामुळे यात आणखी कपात करून कर्मचारी अधिकाऱ्यावरील ताण वाढविण्याचे काम प्रशासन करत आहे. त्यामुळे भविष्यात अनेक ग्राहकांचा विजपुरवठा अनियमित होऊन त्यांच्या रोषाला सामोरेजावे लागणार आहे.महापारेषण कंपनीत बदली धोरणाची अंमलबजावणीही एकतर्फि व संघटनाना विश्वासात न घेता करण्यात आलेली आहे. त्यानुसार अभियंत्यांच्या बदल्या करण्याची प्रक्रिया चालू आहे. अभियंत्यांच्या परिमंडळ बाहरे बदली करण्याचे धोरण आहे. त्यामुळे अभियंत्यांना २५० ते ३०० कि.मी अंतरा बाहेर जावे लागणार आहे.

व्यवस्थापकीय संचालकांनी अशा बदल्या न करण्याबाबत शब्द देऊनही त्याबाबतच चालढकल करण्यात येत आहे. महानिर्मीती कंपनीमध्येही २१० एमडब्ल्यू चे संच बंद करण्याचे धोरण तत्काळ रद्द करण्यात यावे. जोपर्यंत नविन संच उभारण्यात येत नाहीत, तोपर्यंत सध्या चालू असलेले संच बंद करू नयेत अशी मागणी आहे.महानिर्मिती कंपनीतील कार्यरत असलेल्या लघु जल विद्युत निर्मीती संचाचे अधिग्रहण न करता ही सर्व जल विद्युत निर्मीतीचे संच महानिर्मीतीच्या अंतर्गतच चालू ठेवणे महत्वाचे आहे. महानिर्मीती कंपनी 'ना नफा ना तोटा ' तत्वावर व अत्यंत कमी दरात वीजनिर्मीती करत आहे. ही सर्व लघु जल विद्युत केंद्रे चालवून महानिर्मीतीचे अभियंते कर्मचारी उद्दीष्ट पुर्ण करत आहेत.

ही लघु जल विद्युत केंद्रे पूर्ण क्षमतेने चालत असताना बीओटी तत्वावर आर अँड एम च्या नावाखाली खासगी कंपनीस चालविण्यास देणे चूकीचे आहे. या साऱ्याला विरोध म्हणून वीज कर्मचारी अभियंते संघटना संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून हा लाक्षणीक संप करण्यात आला. यात महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिक वर्कर्स फेडरेशन, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन, सबार्डीनेट इंजिनिअर्स असोसिएशन व इतर संघटना सहभागी असल्याचे संघटनांचे प्रतिनिधी एन. ए. मोगल, ई. आर. सादये, व्ही. ए. आग्रे, आर. पी. पाटील यांनी सांगितले.

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणsindhudurgसिंधुदुर्ग