शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

सिंधुदुर्ग : आंबा, काजू बागेला आग; लाखोंचे नुकसान, नुकसान भरपाई देणार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 11:03 AM

सावंतवाडी तालुक्यातील मळगाव-वेत्ये गावांच्या सीमेवर सुमारे ३८ एकर जागेतील आंबा, काजू बागेला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न शेतकऱ्यांनी केले पण त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. हाताशी आलेले उत्पन्न या आगरुपी संकटाने हिसकावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. आगीचे कारण समजू शकले नाही.

ठळक मुद्देआंबा, काजू बागेला आग; लाखोंचे नुकसानशासन नुकसान भरपाई देईल का?मळगावातील शेतकऱ्यांवर संकट

तळवडे : सावंतवाडी तालुक्यातील मळगाव-वेत्ये गावांच्या सीमेवर सुमारे ३८ एकर जागेतील आंबा, काजू बागेला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न शेतकऱ्यांनी केले पण त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. हाताशी आलेले उत्पन्न या आगरुपी संकटाने हिसकावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. आगीचे कारण समजू शकले नाही.सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या शेतजमिनी, माळरानांवर अग्नीतांडव निर्माण होत असून यात आंबा, काजू बागायतींचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. हाता-तोंडाशी आलेली आंबा, काजू बागायती जळून खाक होत आहे. याची नुकसान भरपाई देणार कोण? असा सवाल केला जात आहे.

सावंतवाडी तालुक्यातील मळगाव-वेत्ये परिसरातील सुमारे तीन एकरच्या परिसरात गुरुवारी आगडोंब उसळला. यात आठ ते दहा शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. या अग्नितांडवात एक हजारच्यावर आंबा, काजू कलमे जळून खाक झाली. या घटनेचा अजूनही पंचनामा न झाल्याने नुकसानीचा नेमका आकडा उपलब्ध झाला नाही.गोरगरीब शेतकऱ्यांनी दिवस-रात्र घाम गाळून फुलविलेल्या आंबा, काजू बागा ऐन हंगामातच आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने त्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. आग कोणी लावली की अन्य कोणत्या कारणाने लागली याचा शोध घेणे गरजचे आहे. तशी मागणी नुकसानग्रस्त शेतकºयांनी केली आहे.दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात बागायतींना आग लागण्याचे प्रकार वाढले असून हे वेळीच थांबणे गरजेचे आहे. सावंतवाडी तालुक्यातील ओवळिये गावातही असाच प्रकार घडला. बांदा, वेंगुर्ले परिसरातही अशा बऱ्याच घटना घडल्या आहेत.

शासनाने अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन मदतीचा हात देणे गरजेचे आहे. आम्ही शेतकºयांनी गेली २५ वर्षे उन्हातान्हात राबून आंबा, काजूच्या बागा फुलविल्या. मात्र आज उत्पन्न घेण्याची वेळ आली असतानाच आमच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे. शासनाने आम्हांला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी दिलीप राऊळ यांनी केली आहे.आग लागून आंबा, काजू बागायतीचे जे नुकसान होते, त्याची नुकसान भरपाई शासनाने द्यावी. ग्रामीण भागातील शेतकरी कष्ट करून बागायती करतात, पण ऐन उत्पन्नाच्यावेळीच असे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी काय करावे? असे विचारले असता अशावेळी शासनाने शेतकऱ्यांसाठी तारणहार बनावे, असे शेतकरी गंगाराम राऊळ यांनी सांगितले.

शासन नुकसान भरपाई देईल का?; मळगावातील शेतकऱ्यांवर संकट२० ते २५ वर्षे उत्पन्न देणारी आंबा, काजू कलमे जळून खाक झाल्याने गरीब शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. याची दखल घेऊन शासन नुकसान भरपाई देईल का? की केवळ आश्वासने देणार? असा सवाल शेतकऱ्यांतून केला जात आहे.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गfireआगFarmerशेतकरी