शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

सिंधुदुर्ग : शिवस्मारकाच्या मुद्यावरून राज्यकर्त्यांकडून जनतेच्या डोळ्यात फक्त धूळफेकच  : उपरकर यांची टिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 16:28 IST

कॉंग्रेस - राष्ट्रवादी आघाडीच्या शासनाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अजुन काही उभरता आलेला नाही. फक्त या शिवस्मारकाच्या मुद्यावरून मागील २० वर्षे जनतेच्या डोळ्यात धूळफेक करणे सुरू आहे. अशी टिका मनसेचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी येथे केली.

ठळक मुद्देशिवस्मारकाच्या मुद्यावरून राज्यकर्त्यांकडून जनतेच्या डोळ्यात फक्त धूळफेकच सत्ताधारी पुतळा उभारण्यात अपयशी : उपरकर यांची टिका

कणकवली :पोलाद पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या राज्याची अस्मिता जोपासली आहे. तसेच जनतेला दिलेला शब्द पूर्ण केला आहे. मात्र, महाराष्ट्रात सत्तेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेणाऱ्या शिवसेना - भाजप युतीच्या शासनाला तसेच त्यापूर्वी सत्तेत असलेल्या कॉंग्रेस - राष्ट्रवादी आघाडीच्या शासनाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अजुन काही उभरता आलेला नाही. फक्त या शिवस्मारकाच्या मुद्यावरून मागील २० वर्षे जनतेच्या डोळ्यात धूळफेक करणे सुरू आहे. अशी टिका मनसेचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी येथे केली.कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मनविसे उपजिल्हाध्यक्ष अनिल राणे, शहराध्यक्ष शैलेंद्र नेरकर , संतोष कुडाळकर आदी उपस्थित होते. परशुराम उपरकर म्हणाले, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 'स्टॅच्यु ऑफ युनिटी'च्या माध्यमातून नरेंद्र मोदींनी सर्व देशाला गुजरातची अस्मिता दाखवून दिली आहे.महाराष्ट्रात मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबद्दल चालढकलपणा होत आहे. राज्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर केवळ निवडणुकीसाठी करीत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी छत्रपतींचे स्मारक अरबी समुद्रात होणे शक्य नसल्याचे याआधीच जाहीर केले होते. 'एल अँड टी' ने केलेल्या चाचणीत स्मारकासाठी आवश्यक खडकच या समुद्रात नसल्याचे समोर आले आहे.महाराष्ट्रातील गडकिल्ले हेच खरे शिवाजी महाराजांचे स्मारक आहेत. त्यांचे संवर्धन होणे आवश्यक आहे. मात्र, त्याच्याकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या स्वराज्याची राजधानी रायगड किल्ल्याची शिवकालीन प्रतिकृती निर्माण करणे आवश्यक आहे. ज्यामुळे सध्याच्या पिढीला शिवकालिन बाजारपेठ तसेच इतिहासाची माहिती मिळेल.शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडे या प्रतिकृतीची माहिती तयार आहे. त्याचा उपयोग करता येईल. मात्र, याबाबत कोणीही विचार करीत नाही. मुंबई येथील अरबी समुद्रातील शिवस्मारकाचा खर्च काँग्रेस राजवटीत ४०० कोटींचा होता . आता तो शिवसेना -भाजप राजवटित १६ हजार कोटींवर पोचला आहे.सरदार वल्लभभाई पटेल यांचा २३०० कोटींचा पुतळा ४ वर्षात होतो, तर शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा प्रश्न २० वर्षे होऊनही अजूनही रेंगाळत पडला आहे. सत्ताधाऱ्यांकडून फक्त वांझोट्या गप्पा मारल्या जात आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा तसेच इतर भागातील गडकिल्ल्यांचे संवर्धन केल्यास जनतेच्या मनातील छत्रपतींची अस्मिता जपली जाईल. तेच खरे छत्रपतींचे स्मारक असेल. शासनाच्या नाकर्तेंपणामुळे मराठी पाठ्यपुस्तक अभ्यासक्रमासह सीबीएसई अभ्यासक्रमातून शिवाजी महाराजांचा धडा गायब झाला आहे. ही शोकांतिका आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातला विकसित केले. आरबीआयसह सर्व शासकीय मुख्य कार्यालये गुजरातला नेऊन गुजरातची अस्मिता जपण्याचे काम ते करीत आहेत. मात्र यातुन देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचे महत्व कमी होत आहे. याबाबत सर्वच राज्यकर्ते मूग गिळून गप्प बसले आहेत. असेही परशुराम उपरकर यावेळी म्हणाले.शिवप्रेमिनी त्याना धडा शिकवावा !राज्यातील गडकिल्ले शाबूत ठेवून त्यांचे संवर्धन करून त्यातून पर्यटन वाढविणे सहज शक्य आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. त्यामुळे येत्या काळात फक्त आश्वासने देऊन फसविणाऱ्या राज्यकर्त्यांना शिवप्रेमिनी आता मतदानातून धडा शिकवावा.असे आवाहनही परशुराम उपरकर यांनी यावेळी केले.

टॅग्स :Parshuram Upkarपरशुराम उपरकर MNSमनसेsindhudurgसिंधुदुर्ग