शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
2
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
3
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
4
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
6
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
7
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
8
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
9
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
10
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
11
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
12
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
13
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
14
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
15
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
16
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
18
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
19
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
20
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी

सिंधुदुर्ग : कोकणात शेळ्या-मेंढ्यांची कारवणी पद्धत आजही टिकून, मेंढपाळ गावोगावी दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2018 10:54 AM

रासायनिक खतांच्या वाढत्या वापरामुळे जमिनीची सुपिकता कमी होऊ लागल्याने सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. परिणामी कोकणात पूर्वीपासून चालत आलेली शेतात शेळ्या-मेंढ्या बसविण्याची कारवणी पद्धत आजही टिकून आहे. जिल्ह्याच्या खलाट पट्ट्यातील मेंढपाळ आपल्या फौजफाट्यासह कारवाणीसाठी गावोगाव दाखल होऊ लागले आहेत.

ठळक मुद्देशेळ्या-मेंढ्यांची कारवणी पद्धत आजही टिकूनमेंढपाळ गावोगावी दाखल कोकणातील पूर्वपरंपरागत प्रथा

मिलिंद डोंगरे 

सिंधुदुर्ग : रासायनिक खतांच्या वाढत्या वापरामुळे जमिनीची सुपिकता कमी होऊ लागल्याने सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. परिणामी कोकणात पूर्वीपासून चालत आलेली शेतात शेळ्या-मेंढ्या बसविण्याची कारवणी पद्धत आजही टिकून आहे. जिल्ह्याच्या खलाट पट्ट्यातील मेंढपाळ आपल्या फौजफाट्यासह कारवाणीसाठी गावोगाव दाखल होऊ लागले आहेत.

पूर्वमशागतीसाठी पूर्वीच्या काळी रासायनिक खते नसल्याने लोक सेंद्रिय पद्धतीने शेती करीत असत. शेण व पालापाचोळ्यापासून बनविलेले खत शेतीसाठी वापरत असत. परंतु जसजशी शेती तंत्रज्ञानात प्रगती होत गेली तसतशी रासायनिक खते उपलब्ध होत गेली. रासायनिक खतांमुळे शेतीच्या उत्पन्नात वाढ होत गेली.

हे खरे असले तरी या खतांचा बेसुमार वापर होऊ लागल्याने त्याचा विपरीत परिणाम जमिनीच्या सुपिकतेवर होऊ लागला. त्यामुळे अलीकडे सेंद्रिय शेतीवर भर दिला जात आहे. जमिनीची सुपिकता वाढविणारी कारवणी पद्धत पूर्वीपासूनच कोकणात आहे.कारवणी म्हणजे नेमके काय?साधारणपणे हिवाळा सुरू झाला की, मेंढपाळ आपल्या शेळ्या-मेंढ्यांचा फौजफाटा घेऊन गावोगावी भटकंती करीत असतात. शेतकरी आपल्या शेतात मेंढ्या बसवून घेतात. या शेळ्या-मेंढ्यांचे मलमूत्र शेतात पडते. त्यालाच कारवणी म्हणतात. त्याने शेतीची सुपिकता वाढत असल्याचे शेतकरी सांगतात.

शेळ्या-मेंढ्यांच्या चाऱ्यांचा प्रश्न सुटतोलेंडीखताला फार मोठी मागणी असते. शेतीबरोबरच फळबागांना हे खत वापरले जाते. या खतामुळे जमिनीचा पोत सुधारत असल्याने कारवणीसाठी शेतकरी आग्रही असतात. एका रात्री शेळ्या-मेंढ्या शेतात बसविण्यासाठी तांदूळ किंवा पैसे अशी त्यांची बिदागी असते. पाऊस पडेपर्यंत हे मेंढपाळ गावोगावी भटकंती करीत असतात. त्यातून त्यांच्या उदरनिर्वाहाबरोबरच शेळ्या-मेंढ्यांच्या चाऱ्यांचा प्रश्न सुटतो. यात हजारो रुपयांची उलाढालही होत असते.शेळ्या-मेंढ्यांसोबत शेतातच संसारअर्थात यात मेंढपाळांना प्रचंड मेहनत करावी लागते. थंडी, वारा, कडाक्याचे ऊन सहन करीत ते गावोगावी भटकंती करीत असतात. शेळ्या-मेंढ्यांबरोबरच त्यांना शेतात संसार थाटावा लागतो. पावसाळा सुरू होण्याअगोदर ते आपल्या घरी परततात. एकेक मेंढपाळांकडे २०० ते २५० मेंढ्या असतात. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गFarmerशेतकरी