शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
4
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
5
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
6
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
7
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
8
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
9
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
10
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
11
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
12
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
13
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
14
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
15
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
16
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
17
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
18
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
19
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
20
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडीत डास झिरो नाही हिरोच

By admin | Updated: September 30, 2015 00:09 IST

परूळेकरांचा साळगावकरांना टोला : रूग्णालयामध्ये माहिती घेण्याचा सल्ला

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपालिका ‘झिरो डास’चा दावा करीत आहे. मात्र, हा दावा सपशेल खोटा असून सावंतवाडीत डास झिरो नसून हिरोच आहेत. त्यामुळे रूग्णालये भरलेली दिसत आहेत, अशी बोचरी टीका काँग्रेस प्रवक्ते डॉ. जयेंद्र परूळेकर यांनी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यावर केली. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष संजू परब, शिक्षण सभापती गुरू पेडणेकर, माजी तालुकाध्यक्ष बाळा गावडे, सुधीर आडिवडेकर, साक्षी वंजारी, संदीप सुकी, दिलीप भालेकर, संतोष जोईल आदी उपस्थित होते.सावंतवाडी नगरपालिका स्मार्ट सिटीची स्वप्ने बघत आहेत. पण त्यांनी पायाभूत सुविधांबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा. मोती तलावाकाठचा विकास म्हणजे शहराचा विकास म्हणणे चुकीचे असून शहरातील रस्ते तसेच आरोग्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत असून याकडे दुर्लक्ष होत आहे. पालिका मोठ्या प्रमाणात उत्पादन घेते. पण त्याचा फायदा कुणाला होतो, असा सवाल करीत पालिकेचे सुसज्ज असे रूग्णालय नाही, अशी खंत डॉ. परूळेकर यांनी व्यक्त केली.पालिका एक डॉक्टर व एक कंपाऊं डर यांच्यावरच आतापर्यंत दिवस ढकलत असून मोठ्या प्रमाणात पाण्याचे स्त्रोत या पालिकेकडे आहे. ते पाणी इतर गावांना देऊन त्यातून येणाऱ्या उत्पादनातून वेगवेगळे प्रकल्प तसेच सुसज्ज हॉस्पिटल करण्यात येऊ शकते. पण त्याकडे पालिका दुर्लक्ष करीत आहे, असा आरोपही त्यांनी केला. शहरातील रस्ते अरूंद आहेत. भविष्यात पर्यटन दृष्ट्या जर शहराचा विकास व्हायचा असेल, तर रस्ते मोठे करणे गरजेचे आहेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.तसेच नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सावंतवाडी शहरातून जाणारा महामार्ग कुणाची संपत्ती वाचण्यासाठी बाहेरून गेला, हे जाहीर करावे. याचा मोठा परिणाम आता येथील बाजारपेठांवर दिसू लागला असून, भविष्यात जर यापेक्षाही सावंतवाडीचा विकास करायचा झाला, तसेच पर्यटक या ठिकाणी आणायचे झाले, तर त्यासाठी वेगळी योजना आखावी लागेल. मोठ्या प्रमाणात पर्यटक मालवण-तारकर्लीकडे वळू लागले आहेत, असेही यावेळी डॉ. परूळेकर म्हणाले. (प्रतिनिधी)अधिकाऱ्यांना का घेराव घालता?सातारा येथे जाणारी धान्याची पोती शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पकडली. ही धान्याची पोती पकडली ही बाब चांगली, पण सत्तेत राहून अधिकाऱ्यांना कसला घेराव घालता? हिम्मत असेल तर पालकमंत्र्यांना घेराव घाला आणि जाब विचारा. काँग्रेस नेते नारायण राणे असताना अधिकाऱ्यांना घेराव घालण्याची कधी नामुष्कीही काँग्रेस कार्यकर्त्यांवर आली नव्हती. पण आताच्या पालकमंत्र्यानी ही नामुष्की कार्यकर्त्यांवर आणली, असा आरोपही परूळेकर यांनी केला..अधिकाऱ्यांना का घेराव घालता?सातारा येथे जाणारी धान्याची पोती शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पकडली. ही धान्याची पोती पकडली ही बाब चांगली, पण सत्तेत राहून अधिकाऱ्यांना कसला घेराव घालता? हिम्मत असेल तर पालकमंत्र्यांना घेराव घाला आणि जाब विचारा. काँग्रेस नेते नारायण राणे असताना अधिकाऱ्यांना घेराव घालण्याची कधी नामुष्कीही काँग्रेस कार्यकर्त्यांवर आली नव्हती. पण आताच्या पालकमंत्र्यानी ही नामुष्की कार्यकर्त्यांवर आणली, असा आरोपही परूळेकर यांनी केला..