शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूमध्ये 'खेला'! अभिनेता विजयच्या पक्षाची मुसंडी; द्रमुकला धक्का
2
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
3
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
4
बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
5
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
6
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
7
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
8
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
9
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
10
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
11
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
12
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
13
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
14
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
15
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
16
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
17
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
18
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
19
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
20
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

अन्यथा २६ जानेवारीला आंदोलन

By admin | Updated: November 22, 2014 00:12 IST

आचरा ग्रामसभेत ठराव : देवस्थान जमिनप्रश्नी न्यायाची मागणी

आचरा : आचरा गावच्या जमिनींच्या सात-बारावरील वरिष्ठ धारणकर्ता म्हणून श्री देव रामेश्वर हे नाव कमी करून सात-बारा हा पूर्ववत करावा, अशी मागणी १५ आॅगस्टच्या ग्रामसभेत करण्यात आली होती. परंतु आजमितीपर्यंत याबाबत कोणतीही कारवाई न झाल्याने शुक्रवारी झालेल्या ग्रामसभेत शासनाने याबाबत निर्णय १० जानेवारीपर्यंत न दिल्यास २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांसमोर निर्णय मिळेपर्यंत आंदोलन करण्याचा ठराव आचरा ग्रामसभेत घेण्यात आला.आचरा गावची ग्रामसभा सरपंच मंगेश टेमकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सभागृहात शुक्रवारी घेण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य राजन गावकर, चंदू पांगे, अवधूत हळदणकर, तृप्ती मिराशी, परशुराम शेटये, जेरोन फर्नांडीस, अनिल करंडो, साक्षी ठाकूर, समीर ठाकूर, अरूण आपकर आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.सन १९६४ला फेरफार क्रमांक २५९५ प्रमाणे नंतर सात-बारावर इतर हक्कात देवस्थानला फक्त वसुलीचा अधिकार असा शेरा ठेवण्यात आला होता. २९ मे १९७४ साली परिपत्रकानुसार आचरा फेरफार क्रमांक ३१७३ व गाऊडवाडी फेरफार १४५५ होऊन वरिष्ठ धारण करणारा म्हणून श्री देव रामेश्वर व कनिष्ठधारक यांची नावे दाखल करण्यात आली. ज्या परिपत्रकाने हा बदल झाला. त्याची माहिती तहसील कार्यालयाकडे ग्रामपंचायतीने केली असता उपलब्ध नसल्याचे कळविण्यात आले. हा गोंधळात टाकणारा बदल महसूल खात्याच्या चुकीच्या फेरबदलाचा फटका ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. यामुळे आचरा गावच्या जमिनीची खरेदी-विक्री, बिनशेती, बोजा धारण करणे असे व्यवहार बंद पडल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. यामुळेच ग्रामस्थांच्या मागणीमुळे १५ आॅगस्टच्या ग्रामसभेत देवस्थानच्या खुद्द मालकीच्या जमिनी सोडून इतर जमिनीच्या सात-बारावरील देवस्थानचे नाव कमी करण्याचा ठराव घेण्यात आला होता. परंतु शासन दरबारी आजच्या दिवसापर्यंत कोणताही ठोस निर्णय न घेतल्याने आंदोलनाचा मार्ग आचरा ग्रामसभेत घेतला आहे.यावेळी ग्रामसभेत आपले मत मांडताना ग्रामपंचायत सदस्य राजन गावकर म्हणाले, देवस्थानचे नाव सात-बारावरून कमी होणे आवश्यक आहे. प्रत्येक ग्रामस्थांच्या जीविताचा हा प्रश्न आहे. देवस्थानचे नाव कमी करणे म्हणजे आम्ही देवाच्या विरोधात नाही. देव रामेश्वराचे हक्क अबाधित राखले जातील, पूर्वी ज्याप्रमाणे ‘इ’ करार होत होते त्याचप्रमाणे ‘इ’ करार व्हावेत, अशी त्यांनी मागणी केली. यावेळी आचऱ्याच्या आठवडा बाजाराची जागा बदलल्यावरून जोरदार चर्चा झाली. गेल्या ग्रामसभेत आचरा आठवडा बाजाराची जागा बदलण्याचा ठराव घेण्यात आला होता. त्याची इतिवृत्तात नोंदच नसल्याने सरपंच टेमकर यांना ग्रामस्थांनी धारेवर धरले व वेळीच उपाययोजना करण्यासाठी योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. (वार्ताहर)न्यायालयीन लढा देणारसात-बारावरून देवस्थानचे नाव कमी करण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत न्यायालयीन लढाई देण्याचे यावेळी ग्रामसभेत ठरविण्यात आले. यासाठी उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, महसूल न्यायाधिकरण यांच्याकडे न्याय मागण्यासाठी न्यायालयीन लढा चालू करण्यात यावा व त्यासाठी लागणारा खर्च हा ग्रामपंचायतीमार्फत करण्यात यावा, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य राजन गावकर यांनी केली असता ग्रामसभेच्यावतीने मान्य करण्यात आली. न्यायालयीन लढा सक्षम करण्यासाठी ग्रामस्थांमधून ग्रामसभेत एक कमिटी तयार करण्यात आली असून यामध्ये आबा मुणगेकर, अनिल करंजे, जयदीप पांगे, सुभाष नलावडे, सचिन बागवे आदींचा समावेश करण्यात आला आहे.