शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

राष्ट्रीय पेयजल योजना : सिंधुदुर्ग जिल्ह्यात  दहा कोटी रुपये अद्यापही अखर्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 13:46 IST

राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत २८ योजना व ३१ वाड्यांच्या उद्दिष्टापैकी १० योजना व १० वाड्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे. अद्यापपर्यंत या कामांवर ५ कोटी १७ लाख एवढा निधी खर्च करण्यात आला असून उर्वरित सुमारे १० कोटी रुपये अद्यापही अखर्चित आहेत. हा संपूर्ण निधी खर्च करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च ही आहे.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता समितीच्या सभेत माहितीनिधी खर्च करण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत

सिंधुदुर्गनगरी : राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत २८ योजना व ३१ वाड्यांच्या उद्दिष्टापैकी १० योजना व १० वाड्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे. अद्यापपर्यंत या कामांवर ५ कोटी १७ लाख एवढा निधी खर्च करण्यात आला असून उर्वरित सुमारे १० कोटी रुपये अद्यापही अखर्चित आहेत. हा संपूर्ण निधी खर्च करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च ही आहे.जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता समितीची मासिक सभा अध्यक्षा संजना सावंत यांच्या अध्यक्षतेखाली येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झाली. यावेळी समिती सचिव तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हरिश पाटील, उपाध्यक्ष रणजित देसाई, विषय समिती सभापती अंकुश जाधव, अनिषा दळवी, जेरॉन फर्नांडिस, सदस्य श्वेता कोरगावकर, सरोज परब, उत्तम पांढरे, प्रमोद कामत, मायकल डिसोजा, अधिकारी तसेच खातेप्रमुख उपस्थित होते.२०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत जिल्ह्याला १५ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर होता. यात २८ योजना व ३१ वाड्यांचे उद्दिष्ट होते. यापैकी अद्यापपर्यंत १० योजना व १० वाड्यांचे पेयजलचे काम पूर्ण झाले असून यावर ५ कोटी १७ लाख रुपये निधी खर्च करण्यात आला आहे. तर अद्यापही १८ योजना व २१ वाड्यांची कामे होणे बाकी आहे.

यासाठी १० कोटी रुपये निधी शिल्लक आहे. पेयजलची कामे करण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत आहे, अशी माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीपाद पाटील यांनी दिली.यावर्षीचा पाणीटंचाई आराखडा ४ गावे व ५१३ वाड्यांचा बनविण्यात आला आहे. त्यानुसार तालुक्यातून ४६९ पपत्र अ प्राप्त झाली आहेत. पपत्र ब साठी सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. १३८ अंदाजपत्रके जिल्ह्याला प्राप्त झाली असून विविध टंचाईच्या कामांची ३४ पपत्रे अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्याकडे पाठविण्यात आली आहेत. या अंदाजपत्रकांना मंजुरी मिळताच प्रत्यक्ष कामांना सुरुवात केली जाणार असल्याचे श्रीपाद पाताडे यांनी सांगितले.स्वच्छ भारत अंतर्गत जिल्ह्यात अद्यापही २४४२ जणांकडे वैयक्तिक शौचालय नसल्याचे समोर येत आहे. जानेवारीपासून ६६९६ जणांकडे शौचालय नव्हते. मात्र, त्यानंतर ४२५४ जणांनी शौचालय बांधून पूर्ण केले आहे. ३१ मार्चपर्यंत जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबनिहाय शौचालय असणे आवश्यक आहे.सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण, कुडाळमध्ये सर्वाधिक दूषित विहिरीआरोग्य विभागाने जारी केलेल्या एका अहवालात जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये १० टक्केपेक्षा जास्त दूषित पाणीनमुने आढळून आले आहेत. तर उर्वरित चार तालुक्यांमध्ये पाणी नमुने समाधानकारक असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. दूषित पाणी नमुने शुद्ध करून ते पिण्यायोग्य करण्यात आले आहेत.... थकीत ५ कोटी प्राप्तगतवर्षी पाणीटंचाईअंतर्गत करण्यात आलेल्या कामांची बिले निधीअभावी रखडली होती. त्यामुळे ठेकेदारांमधून नाराजीचा सूर होता. जिल्हा परिषदेच्यावतीने यासाठी पाठपुरावा केला जात होता. अखेर दोन टप्प्यात हे पैसे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला प्राप्त झाले आहेत. यातील पहिल्या टप्प्यात २ कोटी ९४ लाख रुपये तर दुसऱ्या टप्प्यात २ कोटी रुपये असे एकूण ४ कोटी ९४ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. संबंधित ठेकेदारांचे पैसे देण्याचे काम सुरू असल्याचे कार्यकारी अभियंता श्रीपाद पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Waterपाणीsindhudurgसिंधुदुर्ग