शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

राष्ट्रीय पेयजल योजना : सिंधुदुर्ग जिल्ह्यात  दहा कोटी रुपये अद्यापही अखर्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 13:46 IST

राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत २८ योजना व ३१ वाड्यांच्या उद्दिष्टापैकी १० योजना व १० वाड्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे. अद्यापपर्यंत या कामांवर ५ कोटी १७ लाख एवढा निधी खर्च करण्यात आला असून उर्वरित सुमारे १० कोटी रुपये अद्यापही अखर्चित आहेत. हा संपूर्ण निधी खर्च करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च ही आहे.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता समितीच्या सभेत माहितीनिधी खर्च करण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत

सिंधुदुर्गनगरी : राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत २८ योजना व ३१ वाड्यांच्या उद्दिष्टापैकी १० योजना व १० वाड्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे. अद्यापपर्यंत या कामांवर ५ कोटी १७ लाख एवढा निधी खर्च करण्यात आला असून उर्वरित सुमारे १० कोटी रुपये अद्यापही अखर्चित आहेत. हा संपूर्ण निधी खर्च करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च ही आहे.जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता समितीची मासिक सभा अध्यक्षा संजना सावंत यांच्या अध्यक्षतेखाली येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झाली. यावेळी समिती सचिव तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हरिश पाटील, उपाध्यक्ष रणजित देसाई, विषय समिती सभापती अंकुश जाधव, अनिषा दळवी, जेरॉन फर्नांडिस, सदस्य श्वेता कोरगावकर, सरोज परब, उत्तम पांढरे, प्रमोद कामत, मायकल डिसोजा, अधिकारी तसेच खातेप्रमुख उपस्थित होते.२०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत जिल्ह्याला १५ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर होता. यात २८ योजना व ३१ वाड्यांचे उद्दिष्ट होते. यापैकी अद्यापपर्यंत १० योजना व १० वाड्यांचे पेयजलचे काम पूर्ण झाले असून यावर ५ कोटी १७ लाख रुपये निधी खर्च करण्यात आला आहे. तर अद्यापही १८ योजना व २१ वाड्यांची कामे होणे बाकी आहे.

यासाठी १० कोटी रुपये निधी शिल्लक आहे. पेयजलची कामे करण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत आहे, अशी माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीपाद पाटील यांनी दिली.यावर्षीचा पाणीटंचाई आराखडा ४ गावे व ५१३ वाड्यांचा बनविण्यात आला आहे. त्यानुसार तालुक्यातून ४६९ पपत्र अ प्राप्त झाली आहेत. पपत्र ब साठी सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. १३८ अंदाजपत्रके जिल्ह्याला प्राप्त झाली असून विविध टंचाईच्या कामांची ३४ पपत्रे अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्याकडे पाठविण्यात आली आहेत. या अंदाजपत्रकांना मंजुरी मिळताच प्रत्यक्ष कामांना सुरुवात केली जाणार असल्याचे श्रीपाद पाताडे यांनी सांगितले.स्वच्छ भारत अंतर्गत जिल्ह्यात अद्यापही २४४२ जणांकडे वैयक्तिक शौचालय नसल्याचे समोर येत आहे. जानेवारीपासून ६६९६ जणांकडे शौचालय नव्हते. मात्र, त्यानंतर ४२५४ जणांनी शौचालय बांधून पूर्ण केले आहे. ३१ मार्चपर्यंत जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबनिहाय शौचालय असणे आवश्यक आहे.सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण, कुडाळमध्ये सर्वाधिक दूषित विहिरीआरोग्य विभागाने जारी केलेल्या एका अहवालात जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये १० टक्केपेक्षा जास्त दूषित पाणीनमुने आढळून आले आहेत. तर उर्वरित चार तालुक्यांमध्ये पाणी नमुने समाधानकारक असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. दूषित पाणी नमुने शुद्ध करून ते पिण्यायोग्य करण्यात आले आहेत.... थकीत ५ कोटी प्राप्तगतवर्षी पाणीटंचाईअंतर्गत करण्यात आलेल्या कामांची बिले निधीअभावी रखडली होती. त्यामुळे ठेकेदारांमधून नाराजीचा सूर होता. जिल्हा परिषदेच्यावतीने यासाठी पाठपुरावा केला जात होता. अखेर दोन टप्प्यात हे पैसे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला प्राप्त झाले आहेत. यातील पहिल्या टप्प्यात २ कोटी ९४ लाख रुपये तर दुसऱ्या टप्प्यात २ कोटी रुपये असे एकूण ४ कोटी ९४ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. संबंधित ठेकेदारांचे पैसे देण्याचे काम सुरू असल्याचे कार्यकारी अभियंता श्रीपाद पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Waterपाणीsindhudurgसिंधुदुर्ग