शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदींनी जनतेची फसवणूक केली

By admin | Updated: October 13, 2014 23:06 IST

भालचंद्र मुणगेकर : पाच महिन्यात पाच रूपयेही देशात आणले नाहीत

कणकवली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासह राज्यातील जनतेची फसवणूक केली आहे. काळे धन देशात आणणार असे त्यांनी म्हटले होते. मात्र, पाच महिन्यांच्या कालावधीत पाच रुपयेही देशात आणले नाहीत, अशी टीका राज्यसभेचे खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी कणकवलीत पत्रकार परिषदेत केली. यावेळी जिल्ह्याचे पक्षनिरीक्षक के. सुरेश, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, राष्ट्रीय काँग्रेस मागास सेलचे जिल्हाध्यक्ष संदीप कदम, कणकवली तालुकाध्यक्ष प्रदीप सर्पे, सचिव अशोक कांबळी आदी उपस्थित होते.भालचंद्र मुणगेकर पुढे म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीत देशातील जनतेला ‘अच्छे दिन आने वाले है’ असे सांगितले होते. ते अच्छे दिन आता कुठे आहेत? असा सवालही मुणगेकर यांनी केला. सत्तेत आल्यानंतर मोदींनी गरिबांच्या विरोधात निर्णय घेतले. महागाई कमी न करता महागाई वाढविली. काळे धन देशात आणू, असे सांगितले होते. मात्र, पाच महिन्यात पाच रुपयेही आणू शकले नाहीत. जीवनावश्यक औषधांच्या किमतीही भरमसाठ वाढविल्या आहेत. एकूणच देशात महागाई वाढवत नरेंद्र मोदींनी जनतेची दिशाभूल केल्याचे सांगत भालचंद्र मुणगेकर यांनी मोदींवर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आमची १५ वर्षे आघाडी होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी घेतलेल्या जागावाटपाच्या अवाजवी भूमिकेमुळे आघाडी फिस्कटली. पहिल्यापासूनच राष्ट्रवादी पक्षाला आघाडी करायची नव्हती. त्यांनी स्वतंत्र लढण्याचे ठरविले होते, असेही भालचंद्र मुणगेकर यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले की, भाजप हा कागदावरचा पक्ष होता. सेनेची शिडी वापरुन भाजप मोठा झाला. गोपीनाथ मुंडे असते तर महाराष्ट्रात यावे लागले नसते, असे भाजपाचे नेते म्हणतात. याचा अर्थ मुख्यमंत्री होण्यासाठी भाजपाकडे एकही नेता पात्रतेचा नाही, असे स्पष्ट होते. त्यामुळे मुख्यमंत्रीपदी भाजपसारख्या पक्षाकडे कोणताच नेता नसल्याची टीका यावेळी त्यांनी केली.मराठी माणसाचा अजेंडा म्हणून शिवसेना पक्षाला मानले जाते. मात्र, मराठी माणसासाठी शिवसेनेने काय केले असा सवाल केला. शिवसेनेने १५ वर्षात मुंबईचा कोणता विकास केला? मुंबईतील प्रश्न अजूनही जैसे थेच आहेत. त्यामुळे मुंबईचा विकास करु न शकलेला शिवसेना पक्ष महाराष्ट्राचे काय भले करणार ? असा सवालही मुणगेकर यांनी यावेळी बोलताना केला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी खुद्द देशाच्या पंतप्रधानांना यावे लागते. त्यामुळे भाजपाच्या उमेदवारांना आपल्या विजयाची खात्री नसल्याचे स्पष्ट होत आहे, असेही यावेळी भालचंद्र मुणगेकर यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे नेते आर. आर. पाटील, अजित पवार यांच्यावरही मुणगेकर यांनी शाब्दीक हल्ला चढवला. ते म्हणाले, महिलांच्या संरक्षणाची जबाबदारी असताना आबांनी केलेल्या लाजिरवाण्या वक्तव्याचा मी निषेध करतो. यावेळी अजित पवार यांनी केलेल्या बेताल वक्तव्यांचाही समाचार घेतला. जिल्ह्याचा विकास काँग्रेसमुळेच झाला आहे. त्यामुळे या निवडणुकीत कणकवली, मालवण आणि सावंतवाडी मतदारसंघातून काँग्रेसचे तिन्ही उमेदवार भरघोस मतांनी निवडून येतील, असा विश्वासही डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी यावेळी व्यक्त केला. (प्रतिनिधी)