शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण, उड्डाणपुलाच्या कामाला गती-पावसाळ्यापूर्वी होणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 5:26 PM

कणकवली : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाअंतर्गत कणकवलीत गांगोमंदिर ते शासकीय विश्रामगृहापर्यंत उड्डाणपूल होत आहे. या उड्डाणपुलाच्या कामाने गती घेतली आहे. ...

ठळक मुद्देचौपदरीकरणाबाबतच्या कणकवलीतील समस्या कायम

कणकवली : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाअंतर्गत कणकवलीत गांगोमंदिर ते शासकीय विश्रामगृहापर्यंत उड्डाणपूल होत आहे. या उड्डाणपुलाच्या कामाने गती घेतली आहे. मात्र, प्रकल्पबाधितांच्या समस्या अजूनही तशाच असून लोकप्रतिनिधीही गप्प आहेत. पावसाळ्यात अनेक समस्या निर्माण होणार असून त्यांचे निराकरण त्यापूर्वी होणे आवश्यक आहे.

कणकवलीत महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू झाल्यानंतर भूसंपादन प्रक्रिया, रुंदीकरण, अतिक्रमण हटाव करीत असताना सुरुवातीला मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून विरोध झाला. प्रकल्पग्रस्तांच्या मोबदल्यासाठी लढा उभा राहिला. त्यानंतरच्या काळात सर्व्हिस रस्ते, खड्डेमय रस्ते, वाहतूक कोंडी यासाठीही आंदोलन झाले.

अधिकाऱ्यांवर चिखलफेकही झाली. त्यानंतर कणकवली शहरातील उड्डाणपुलाचे काम मोठ्या गतीने सुरू झाले. कोरोना विषाणूच्या संकटामुळे संचारबंदी लागू केल्याने परत हे काम बंद ठेवावे लागले होते. आता परत या कामाने वेग घेतला आहे. कणकवली शहरातील विकासाच्या या सेतूला खºया अर्थाने नवी झळाळी प्राप्त होताना दिसत आहे.

कणकवली शहरात वाहतूक कोंडीला या उड्डाणपुलामुळे कायमस्वरुपी तोडगा निघणार आहे. कणकवली नरडवे नाका ते एस. एम. हायस्कूलपर्यंतच्या पिलरचे काम पूर्ण झाले आहे. काही भागात वाय आकाराचे पिलर उभे केल्यानंतर उड्डाणपुलाच्या रस्त्याच्या स्लॅबच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. काही ठिकाणचे स्लॅब पूर्ण झाले आहेत. मे अखेरपर्यंत उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेकेदाराने ठेवले होते.

परंतु लॉकडाऊनच्या काळातील जवळजवळ एक महिना काम बंद ठेवावे लागल्याने ते शक्य होणार नाही. तरीही आता वेगाने उड्डाणपुलाच्या स्लॅबचे काम कणकवली शहरात सुरू आहे.महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असताना अरुंद सर्व्हिस रस्ते, बंद पथदीप, अधूनमधून रस्त्यावर पडणारे खड्डे अशा अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. तर अनेक प्रकल्पबाधितांना मोबदला न मिळाल्याने तेही अडचणीत सापडले आहेत. तर संबंधित जागेवरील काम रखडले आहे. त्यामुळे शहरातील सर्व्हिस रस्ते पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुले होऊ शकलेले नाहीत. परिणामी असलेल्या रस्त्यावर अनेकवेळा वाहतूक कोंडीचा अनुभव वाहनचालकांना तसेच पादचाऱ्यांना येत आहे. या समस्येतून आपली सुटका कधी होणार? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

कणकवली शहरात महामार्ग चौपदरीकरणाचे काम हाती घेतल्यानंतर शिवाजी चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविण्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. अनेक राजकीय पक्षांनी आपली भूमिका मांडली होती. आता महामार्ग उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर असतानादेखील त्या पुतळ्याचा प्रश्न ह्यजैसे थेह्ण स्थितीतच असल्याचे दिसून येत आहे.

पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याचे आव्हान!

  • सिंधुदुर्गात जोरदार पाऊस पडत असतो. त्यामुळे पावसाळ्यात महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणे मोठ्या जोखमीचे आहे. या चौपदरीकरणांतर्गत कणकवलीत उड्डाणपुलाचे काम सुरू असून पावसापूर्वी ते पूर्ण करण्याचे आव्हान ठेकेदार कंपनीसमोर आहे.
  • शहरातील महामार्गालगतच्या ओहोळांची साफसफाई करावी लागणार आहे. ती न केल्यास पावसाचे पाणी तुंबून अनेक इमारतींमध्ये ते घुसण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गkonkanकोकणhighwayमहामार्ग