शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

नुकसानीच्या नावाखाली लाखो रुपये उकळले, वनविभाग अंधारात, घाटीवडेतील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 4:35 PM

दोडामार्ग : शासनाने संपादित केलेल्या जागेसह घाटीवडे येथील सामाईक क्षेत्रात कोणत्याही परवानगीविना केळी, नारळ व काजू लागवड करण्यात आली ...

ठळक मुद्देनुकसानीच्या नावाखाली लाखो रुपये उकळले, वनविभाग अंधारात, घाटीवडेतील प्रकारसंबंधितांवर कारवाईसाठी देसाई यांचा उपोषणाचा ईशारा

दोडामार्ग : शासनाने संपादित केलेल्या जागेसह घाटीवडे येथील सामाईक क्षेत्रात कोणत्याही परवानगीविना केळी, नारळ व काजू लागवड करण्यात आली आहे. त्यातील हत्ती व अन्य वन्यप्राण्यांकडून झालेल्या नुकसानीची बनावट कागदपत्रे करून शासनाच्या तिजोरीतील लाखो रुपये उकळण्याचा प्रकार झालेला आहे.

अशा संबंधितांची चौकशी व्हावी व त्यानुसार कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन येथील रामराव देसाई आणि सचिन देसाई यांनी जिल्हाधिकारी व वनक्षेत्रपाल यांच्याकडे सादर केले आहे. अन्यथा बेमुदत उपोषण छेडण्याचा इशाराही दिला आहे.या निवेदनात रामराव देसाई यांनी म्हटले आहे की, गाव घाटिवडे येथील जमिनीचे क्षेत्र सामाईक आहे. त्यातील काही सहहिस्सेदारांनी सामाईक क्षेत्रात अन्य कोणाचीही सहमती न घेता भरमसाठ उत्पन्नाचे साधन केले आहे. या सामाईक क्षेत्रात त्यांच्या हिश्श्याला अल्पक्षेत्र येते. मात्र, भरमसाठ क्षेत्रात त्यांनी लागवड केलेली आहे.

सातबारात असलेल्या भागीदारांच्या परवानगीशिवाय त्यांनी आपल्या हिश्श्यापेक्षा जास्त जमीन कसली आहे. त्यांनी ज्या क्षेत्रात १२०० ते १५०० केळी, नारळ, सुपारीची लागवड केली आहे. त्यांच्या हिश्शाला तीन ते पाच गुंठे एवढेच क्षेत्र येते. त्या क्षेत्रात वरील एवढे उत्पन्न येऊ शकत नाही. परंतु ते कागदोपत्री दाखविण्यात आलेले आहे. त्यांचे नुकसान हत्ती व अन्य वन्यप्राण्यांकडून झाल्याचे दाखवून वनविभागाला अंधारात ठेवून भरपाई म्हणून हजारो रुपये उकळण्याचा प्रयत्न केला आहे.तेवढ्या क्षेत्रात १२०० ते १५०० केळी लागवड करणे शक्य नाही. तरीही नगसंख्या वाढवून दाखविण्यात आली आहे. याची चौकशी व्हावी. तसेच आमच्या सामाईक क्षेत्रात लागवड करून आम्हांला भरपाईपैकी काहीही मिळाले नाही. तसेच वनविभागाला अंधारात ठेवून उकळलेल्या लाखो रुपयांची चौकशी होऊन दोषींवर कारवाई करण्यात यावी, असे निवेदन दिले आहे.यापुढे सामाईक क्षेत्रात लागवड करण्यात आलेल्या पिकाची नुकसान भरपाई सर्वभागदारांच्या सहमतीशिवाय देण्यात येऊ नये. तसेच सर्व भागीदारांना कल्पना दिल्याशिवाय वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामे करू नयेत असे निवेदनात म्हटले आहे.शासनाकडून हत्ती व वन्य प्राण्यांच्या नावावर भरमसाठ भरपाई मिळवणे, खातेदारांनी त्याबाबत विचारल्यास दादागिरी करणे असे प्रकार होत आहेत. त्यामुळे देण्यात आलेल्या अर्जानुसार चौकशी करून संबंधितांवर १ आॅक्टोबरर्यंत कारवाई करण्यात यावी. तसे न झाल्यास २ आॅक्टोबर रोजी बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागsindhudurgसिंधुदुर्ग