शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

मातीचे ढिगारे कोसळून शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 4:53 PM

Rain Sindhudurg : पाडलोस येथील तिलारी कालव्याच्या दुतर्फा असलेले मातीचे ढिगारे कोसळून शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले. पावसाळ्यापूर्वी अधिकाऱ्यांनी शेताच्या बाजूने संरक्षक भिंत घालून देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, त्याला अधिकाऱ्यांनीच मूठमाती देण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे शेती वाचविण्यासाठी आमचे संपूर्ण कुटुंब या दलदलमय चिखलात आंदोलनासाठी उतरणार असल्याचा इशारा शेतकरी राजू माधव यांनी दिला.

ठळक मुद्देपाडलोस येथील स्थिती : मातीचे ढिगारे कोसळून शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसानतिलारी कालव्याच्या दुतर्फा असलेली माती धोकादायक

बांदा : पाडलोस येथील तिलारी कालव्याच्या दुतर्फा असलेले मातीचे ढिगारे कोसळून शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले. पावसाळ्यापूर्वी अधिकाऱ्यांनी शेताच्या बाजूने संरक्षक भिंत घालून देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, त्याला अधिकाऱ्यांनीच मूठमाती देण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे शेती वाचविण्यासाठी आमचे संपूर्ण कुटुंब या दलदलमय चिखलात आंदोलनासाठी उतरणार असल्याचा इशारा शेतकरी राजू माधव यांनी दिला.मडुरा-पाडलोस या सीमा भागात तिलारी कालव्याचे काम सुरू आहे. कालव्याच्या दुतर्फा शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बागायती आहेत. शेतकरी राजू माधव यांनी तिलारी कालव्याच्या अधिकाऱ्यांचे अशा धोकादायक परिस्थितीकडे लक्ष वेधले होते. त्यावेळी येत्या दोन दिवसात दगड टाकून त्याठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले. परंतु, अद्यापपर्यंत यावर कुठलीही कार्यवाही न झाल्याने अधिकाऱ्यांच्या आश्वासनाला त्यांनीच मूठमाती दिल्याचे माधव यांनी सांगितले.कुटुंबासह दलदलमय चिखलात आंदोलन करणारपावसामुळे शेतजमीन कोसळत असून, शेती बागायती करणे धोक्याचे बनले आहे. त्यामुळे आम्हा कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. सुमारे चार ते सहा गुंठे जमीन तिलारी कालव्यात वाहून गेली असून, धोका कायम आहे. उर्वरित जमिनीत नारळ, जंगली झाडे तसेच शेतीसाठी केलेली पेरणी (तरवा) कालव्यात जाणार असल्याने याला जबाबदार कोण, असा प्रश्नही राजू माधव यांनी केला. अधिकाऱ्यांना सांगूनही याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे आपल्या कुटुंबासह याच दलदलमय चिखलात आंदोलन करणार असल्याचा इशारा शेतकरी माधव यांनी दिला. 

टॅग्स :RainपाऊसDamधरणsindhudurgसिंधुदुर्ग