शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

‘निशाण’ची पातळी खालावली

By admin | Updated: February 28, 2016 00:56 IST

वेंगुर्ले शहरात टंचाई : एक दिवसआड पाणीपुरवठा सुरु

 प्रथमेश गुरव ल्ल वेंगुर्ले वेंगुर्ले शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निशाण तलावाच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने वेंगुर्ले नगरपालिकेने फेब्रुवारी महिन्यापासून एक दिवसआड पाणीपुरवठा सुरु केला आहे. यापुढे पावसाळ्यापर्यंत तलावातील पाणी नागरिकांना उपलब्ध करुन देण्यासाठी वेळोवेळी नियोजन करण्यात येणार आहे. तसेच पुढील कालावधीत पाणी कपातीमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, सध्यातरी शहरात पाणीटंचाईची शक्यता नाही. वेंगुर्ले नगर परिषदेमार्फत निशाण तलावातून शहरातील नागरिकांना दररोज ७ लाख लीटर पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, सध्या ३० ते ४५ दिवस पाणीपुरवठा होऊ शकेल एवढाच पाणीसाठा तलावामध्ये उपलब्ध आहे. शहरात ११०० नळ कनेक्शनधारक असून, ६२ सार्वजनिक शौचालयांना या तलावातून पाणीपुरवठा केला जातो. शहरातील बाजारपेठ, दाभोसवाडा, बंदर, किनळणे-भटवाडी या भागातील बहुतांशी नागरिक नगर पालिकेच्या पाण्यावर अवलंबून आहेत. शहरातील इतर भागात सार्वजनिक व वैयक्तिक विहिरींची संख्या जास्त आहे. तसेच नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात शहरातून जाणाऱ्या ओहळांवर ठिकठिकाणी नागरिकांनी नगर परिषदेच्या सहाय्याने बंधारे घातले असल्याने या विहिरींची पाण्याची पातळी बऱ्यापैकी आहे. बाजारपेठेतील नळ कनेक्शनवर अवलंबून असलेले हॉटेल व्यावसायिक, व्यापारी यांना या पाणी कपातीचा त्रास सहन करावा लागणार आहे. ज्या दिवशी पाणी कपात असेल, त्यादिवशी पाण्यासाठी पर्यायी व्यवस्था त्यांना करावी लागणार आहे. कित्येक वर्षे शहरातील नारायण तलावाची दुरवस्था आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा निशाण तलावावर अवलंबून आहे. दरवर्षी मार्च, एप्रिल, मे महिन्यात शहरवासीयांना पाणी कपातीला तोंड द्यावे लागते. नारायण तलावा संदर्भात नगर परिषदेकडून वेळोवेळी डागडुजीबाबत चर्चा, प्रस्ताव आदी सोपस्कार पार पाडले जातात. मात्र, अद्यापपर्यंत याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतली गेलेली नाही. नारायण तलाव सुस्थितीत केल्यास शहराला कायमस्वरुपी मुबलक पाणीपुरवठा होऊ शकतो. पाणी काटकसरीने वापरा : नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले... निशाण तलावातून वेंगुर्ले शहराला पाणीपुरवठा केला जातो. या तलावातील पाण्याची पातळी कमी झाली असून, त्यामुळे दिवसाआड पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन वेंगुर्ले नगर परिषदेमार्फत करण्यात आले आहे. आत्तापासूनच पाणीटंचाई भासू लागल्याने नागरिकांच्या तोंडचे पाणी मात्र पळाले आहे.