शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

सिंधुदुर्ग: चिंदर-तेरई डोंगरामध्ये भूस्खलन, घरांना धोका वाढला; प्रशासन सुस्तच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 16:47 IST

गेल्या वर्षीची भूस्खलन घटना ताजी असताना पुन्हा यावर्षीही भूस्खलन झाले असून मागील वर्षी घटना घडूनही प्रशासन स्थानिक आमदार यांनी कोणतीही दखल घेतलेली नाही.

आचरा : सतत कोसळणाऱ्या पावसाचा फटका चिंदर तेरईला बसला आहे. तेथील डोंगर खचू लागला असून उत्तम घागरे यांच्या घरामागील बाजूच्या पडवीवर मोठया प्रमाणत भूस्खलन होऊन दगड मातीचे ढीग येऊन धडकले आहेत. घराच्या काही भिंतीना तडे जाऊन जमिनीला तडे गेले आहेत.या घरातील कुटुंबिय मुंबईला गेले असल्याने घर बंद अवस्थेत आहे. समोरील मांगराच्या सर्व चिरेबंदी भिंतींसह जमिनीला भेगा पडल्या असून मांगर कोसळण्याची स्थिती निर्माण झाली आहे यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटने नंतर महसूल प्रशासनाने घागरे यांच्या बंद घरावर धोकादायक परिस्तिथीमुळे स्थलांतरीत होण्याची नोटीस चिकटवली आहे.चिंदर तेरई येथील उत्तम घागरे यांच्या घरालगतचा डोंगर खचण्याची घटना मागील वर्षी जुलै महिन्यात घडली  होती त्यावेळी त्यावेळीही घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते याचबरोबर घरा बाजूने जाणाऱ्या रस्त्याचीही ऊंची वाढण्याची घटना घडली होती. घागरे कुटूंबिय कामानिमित्त मुंबईला गेले असून त्याचे घर बंद आहे. बुधवारी संध्याकाळी त्यांच्या घरामागील डोंगराचा भाग कोसळून घरावर सरकत असल्याचे काही ग्रामस्थांनी पाहिले.  घरामागील बाजूच्या पडवीवर मोठया प्रमाणत भूस्खलन होऊन दगड मातीचे ढीग येऊन धडकले होते. घराच्या काही भिंतीना तडे जाऊन जमिनीला तडे गेले आहेत.  समोरील मांगराच्या सर्व चिरेबंदी भिंतींसह जमिनीला भेगा पडल्या असून मांगर कोसळण्याची स्थिती निर्माण झाली आहे.  सदर घटनेची माहिती ग्रामपंचायला देत याबाबतची माहिती महसूल प्रशासनास दिल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच चिंदर सरपंच राजश्री कोदे, उपसरपंच दीपक सुर्वे, सदस्य शशिकांत नाटेकर तंटामुक्ती अध्यक्ष संतोष गावकर, ग्रामस्थ रवी घागरे सुभाष सावंत किशोर खोत, पोलीस पाटील दिनेश पाताडे दाखल झाले होते.कोणतीही दखल न घेतल्याने ही पुनरावृत्तीगेल्या वर्षीची भूस्खलन घटना  ताजी असताना पुन्हा यावर्षीही भूस्खलन झाले असून मागील वर्षी घटना घडूनही प्रशासन स्थानिक आमदार यांनी कोणतीही उचल घेतलेली नाही. मागील वर्षी  आमदार तसेच महसूल प्रशासन कडून पाहणी करण्यापलीकडे कोणतेही काम झालेले नाही.गेल्या वर्षी घटना  घडल्यानंतर प्रशासनाला सक्तीच्या सूचना देऊन तात्काळ महसूल प्रशासन कडून उपाय योजना अथवा यावर पर्याय काढणे गरजेचे होते मात्र यावर्षीचा पावसाळा अर्ध्यावर आला तरी यावर कोणतीही दखल न घेतल्याने पुन्हा ही पुनरावृत्ती झाली आहे. महसूल प्रशासन फक्त नोटीसा बजावत आपली जबाबदारी झटकत असल्याचे सांगत चिंदर सरपंच राजश्री कोदे यांनी पाहणी दरम्यान संताप व्यक्त केला आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊसlandslidesभूस्खलन