शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

सिंधुदुर्ग: चिंदर-तेरई डोंगरामध्ये भूस्खलन, घरांना धोका वाढला; प्रशासन सुस्तच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 16:47 IST

गेल्या वर्षीची भूस्खलन घटना ताजी असताना पुन्हा यावर्षीही भूस्खलन झाले असून मागील वर्षी घटना घडूनही प्रशासन स्थानिक आमदार यांनी कोणतीही दखल घेतलेली नाही.

आचरा : सतत कोसळणाऱ्या पावसाचा फटका चिंदर तेरईला बसला आहे. तेथील डोंगर खचू लागला असून उत्तम घागरे यांच्या घरामागील बाजूच्या पडवीवर मोठया प्रमाणत भूस्खलन होऊन दगड मातीचे ढीग येऊन धडकले आहेत. घराच्या काही भिंतीना तडे जाऊन जमिनीला तडे गेले आहेत.या घरातील कुटुंबिय मुंबईला गेले असल्याने घर बंद अवस्थेत आहे. समोरील मांगराच्या सर्व चिरेबंदी भिंतींसह जमिनीला भेगा पडल्या असून मांगर कोसळण्याची स्थिती निर्माण झाली आहे यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटने नंतर महसूल प्रशासनाने घागरे यांच्या बंद घरावर धोकादायक परिस्तिथीमुळे स्थलांतरीत होण्याची नोटीस चिकटवली आहे.चिंदर तेरई येथील उत्तम घागरे यांच्या घरालगतचा डोंगर खचण्याची घटना मागील वर्षी जुलै महिन्यात घडली  होती त्यावेळी त्यावेळीही घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते याचबरोबर घरा बाजूने जाणाऱ्या रस्त्याचीही ऊंची वाढण्याची घटना घडली होती. घागरे कुटूंबिय कामानिमित्त मुंबईला गेले असून त्याचे घर बंद आहे. बुधवारी संध्याकाळी त्यांच्या घरामागील डोंगराचा भाग कोसळून घरावर सरकत असल्याचे काही ग्रामस्थांनी पाहिले.  घरामागील बाजूच्या पडवीवर मोठया प्रमाणत भूस्खलन होऊन दगड मातीचे ढीग येऊन धडकले होते. घराच्या काही भिंतीना तडे जाऊन जमिनीला तडे गेले आहेत.  समोरील मांगराच्या सर्व चिरेबंदी भिंतींसह जमिनीला भेगा पडल्या असून मांगर कोसळण्याची स्थिती निर्माण झाली आहे.  सदर घटनेची माहिती ग्रामपंचायला देत याबाबतची माहिती महसूल प्रशासनास दिल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच चिंदर सरपंच राजश्री कोदे, उपसरपंच दीपक सुर्वे, सदस्य शशिकांत नाटेकर तंटामुक्ती अध्यक्ष संतोष गावकर, ग्रामस्थ रवी घागरे सुभाष सावंत किशोर खोत, पोलीस पाटील दिनेश पाताडे दाखल झाले होते.कोणतीही दखल न घेतल्याने ही पुनरावृत्तीगेल्या वर्षीची भूस्खलन घटना  ताजी असताना पुन्हा यावर्षीही भूस्खलन झाले असून मागील वर्षी घटना घडूनही प्रशासन स्थानिक आमदार यांनी कोणतीही उचल घेतलेली नाही. मागील वर्षी  आमदार तसेच महसूल प्रशासन कडून पाहणी करण्यापलीकडे कोणतेही काम झालेले नाही.गेल्या वर्षी घटना  घडल्यानंतर प्रशासनाला सक्तीच्या सूचना देऊन तात्काळ महसूल प्रशासन कडून उपाय योजना अथवा यावर पर्याय काढणे गरजेचे होते मात्र यावर्षीचा पावसाळा अर्ध्यावर आला तरी यावर कोणतीही दखल न घेतल्याने पुन्हा ही पुनरावृत्ती झाली आहे. महसूल प्रशासन फक्त नोटीसा बजावत आपली जबाबदारी झटकत असल्याचे सांगत चिंदर सरपंच राजश्री कोदे यांनी पाहणी दरम्यान संताप व्यक्त केला आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊसlandslidesभूस्खलन