शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

सिंधुदुर्ग: चिंदर-तेरई डोंगरामध्ये भूस्खलन, घरांना धोका वाढला; प्रशासन सुस्तच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 16:47 IST

गेल्या वर्षीची भूस्खलन घटना ताजी असताना पुन्हा यावर्षीही भूस्खलन झाले असून मागील वर्षी घटना घडूनही प्रशासन स्थानिक आमदार यांनी कोणतीही दखल घेतलेली नाही.

आचरा : सतत कोसळणाऱ्या पावसाचा फटका चिंदर तेरईला बसला आहे. तेथील डोंगर खचू लागला असून उत्तम घागरे यांच्या घरामागील बाजूच्या पडवीवर मोठया प्रमाणत भूस्खलन होऊन दगड मातीचे ढीग येऊन धडकले आहेत. घराच्या काही भिंतीना तडे जाऊन जमिनीला तडे गेले आहेत.या घरातील कुटुंबिय मुंबईला गेले असल्याने घर बंद अवस्थेत आहे. समोरील मांगराच्या सर्व चिरेबंदी भिंतींसह जमिनीला भेगा पडल्या असून मांगर कोसळण्याची स्थिती निर्माण झाली आहे यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटने नंतर महसूल प्रशासनाने घागरे यांच्या बंद घरावर धोकादायक परिस्तिथीमुळे स्थलांतरीत होण्याची नोटीस चिकटवली आहे.चिंदर तेरई येथील उत्तम घागरे यांच्या घरालगतचा डोंगर खचण्याची घटना मागील वर्षी जुलै महिन्यात घडली  होती त्यावेळी त्यावेळीही घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते याचबरोबर घरा बाजूने जाणाऱ्या रस्त्याचीही ऊंची वाढण्याची घटना घडली होती. घागरे कुटूंबिय कामानिमित्त मुंबईला गेले असून त्याचे घर बंद आहे. बुधवारी संध्याकाळी त्यांच्या घरामागील डोंगराचा भाग कोसळून घरावर सरकत असल्याचे काही ग्रामस्थांनी पाहिले.  घरामागील बाजूच्या पडवीवर मोठया प्रमाणत भूस्खलन होऊन दगड मातीचे ढीग येऊन धडकले होते. घराच्या काही भिंतीना तडे जाऊन जमिनीला तडे गेले आहेत.  समोरील मांगराच्या सर्व चिरेबंदी भिंतींसह जमिनीला भेगा पडल्या असून मांगर कोसळण्याची स्थिती निर्माण झाली आहे.  सदर घटनेची माहिती ग्रामपंचायला देत याबाबतची माहिती महसूल प्रशासनास दिल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच चिंदर सरपंच राजश्री कोदे, उपसरपंच दीपक सुर्वे, सदस्य शशिकांत नाटेकर तंटामुक्ती अध्यक्ष संतोष गावकर, ग्रामस्थ रवी घागरे सुभाष सावंत किशोर खोत, पोलीस पाटील दिनेश पाताडे दाखल झाले होते.कोणतीही दखल न घेतल्याने ही पुनरावृत्तीगेल्या वर्षीची भूस्खलन घटना  ताजी असताना पुन्हा यावर्षीही भूस्खलन झाले असून मागील वर्षी घटना घडूनही प्रशासन स्थानिक आमदार यांनी कोणतीही उचल घेतलेली नाही. मागील वर्षी  आमदार तसेच महसूल प्रशासन कडून पाहणी करण्यापलीकडे कोणतेही काम झालेले नाही.गेल्या वर्षी घटना  घडल्यानंतर प्रशासनाला सक्तीच्या सूचना देऊन तात्काळ महसूल प्रशासन कडून उपाय योजना अथवा यावर पर्याय काढणे गरजेचे होते मात्र यावर्षीचा पावसाळा अर्ध्यावर आला तरी यावर कोणतीही दखल न घेतल्याने पुन्हा ही पुनरावृत्ती झाली आहे. महसूल प्रशासन फक्त नोटीसा बजावत आपली जबाबदारी झटकत असल्याचे सांगत चिंदर सरपंच राजश्री कोदे यांनी पाहणी दरम्यान संताप व्यक्त केला आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊसlandslidesभूस्खलन