शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

घर इथे अन् उमेदवारी तिथे

By admin | Updated: September 24, 2014 00:09 IST

आपले गाव सोडून इच्छुक उमेदवार मुक्काम करताहेत मतदारसंघात

महेश सरनाईक - कणकवली -विधानसभा निवडणूक आता २२ दिवसांवर येऊन ठेपली आहे. अजून आघाडी, युतीबाबत थांगपत्ता नाही. मात्र, आपल्यालाच उमेदवारी मिळणार या आशेने संभाव्य उमेदवारांनी जोरदार प्रचारयंत्रणा राबविण्यास सुरूवात केली आहे. सिंधुदुर्गात असलेल्या तीन मतदारसंघात सावंतवाडी आणि कुडाळ मतदारसंघात लक्षवेधी लढत असल्याने प्रचारामध्ये मोठी चुरस निर्माण होत आहे. त्यातच या दोन्ही मतदारसंघात बाहेरून जाऊन लढणारे उमेदवार असल्याने या उमेदवारांनी आपण स्थानिक असल्याबाबत नामी शक्कल लढवून त्या-त्या मतदारसंघात घरे घेऊन तेथेच बस्तान मांडले आहे. त्यामुळे प्रचाराचा हा नवा फंडा असल्याचेही बोलले जात आहे.मतदारसंघात उमेदवार हा त्या भागातला प्रतिनिधी असेल तर त्याला जास्त लोकांची पसंती असते, हे सार्वत्रिक सूत्र आहे. मात्र, जिल्ह्याच्या राजकारणात काम करत असताना ‘जवळची व्होकाल कुरडी’ (जवळची नवरी कुरुप म्हणजे चांगली नाही.) या मालवणी म्हणीच्या प्रत्ययाप्रमाणे आपण आपल्या मतदारसंघात उमेदवार म्हणून उभा राहिलो तर आपल्याला तेवढी पसंती मिळणार नाही. त्यामुळे जर दुसऱ्या मतदारसंघात राहिलो तर आपण मोठे मताधिक्य मिळवू शकतो म्हणून की काय कणकवलीतील माजी आमदार राजन तेली, परशुराम उपरकर यांनी सावंतवाडी मतदारसंघाची निवड केली आहे.राजन तेली आणि परशुराम उपरकर या दोघांनीही सध्या सावंतवाडीत मुक्काम ठोकला आहे. असे म्हणतात की, त्यांनी तेथे घरेच खरेदी केली आहेत. म्हणजे गेले महिनाभर ही नेतेमंडळी सावंतवाडीत ठाण मांडून आहेत. या मतदारसंघात माजी आमदार व शिवसेनेत प्रवेश केलेले दीपक केसरकर हे सावंतवाडीतीलच आहेत. त्यामुळे त्यांच्यासमोर आव्हान उभे करायचे असेल तर सावंतवाडीत राहिल्याशिवाय पर्याय नाही. या सूत्रामुळे या दोघाही उमेदवारांनी सावंतवाडीत राहणे पसंत केले आहे.दुसरीकडे कुडाळ मालवण मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडणूक रिंगणात असलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी मालवणात मुक्काम केला आहे. त्यांनीही मालवणात राहून कुडाळ-मालवणमध्ये प्रचाराचा धुरळा उडवायला सुरूवात केली आहे. वैभव नाईक यांचे निवासस्थान कणकवलीत आहे. त्यामुळे त्यांच्यावरही परतालुक्याचा शिक्का बसू शकतो. त्यामुळे त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी गेले दोन महिने मालवणातच मुक्काम ठोकला आहे. त्यांना गेल्या सहा निवडणुका मोठ्या मताधिक्याने निवडून आलेल्या नारायण राणे यांच्याशी टक्कर द्यायची आहे. त्यामुळे त्यांना संपूर्ण मतदार संघ ढवढून काढण्यासाठी कणकवलीतील घरात मुक्काम करून काहीच साध्य होणार नसल्याने ते मालवणात तळ ठोकून बसले आहेत.एकंदरीत जरी या उमेदवारांनी त्या-त्या भागात राहून आपण ‘लोकल’ असल्याचा बुरखा घेतला असला तरी प्रत्यक्षात मतदारराजा कोणाला पसंती देतो हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.मुक्कामी दौऱ्यांचे प्रमाण वाढले...!कणकवली मतदारसंघात नितेश राणे आणि आमदार प्रमोद जठार यांच्यात सरळ लढत होणार आहे. अपक्ष म्हणून काँग्रेसचे आमदार विजय सावंत आणि राष्ट्रवादीचे कुलदीप पेडणेकर रिंगणात उतरण्याची शक्यता असली तरी खरी लढत राणे विरूद्ध जठार यांच्यातच होणार आहे. जठार प्रत्येक गावात प्रचार यंत्रणा राबवित आहेत. कार्यकर्त्यांच्या भेटी-गाठी घेत आहेत. मात्र, नितेश राणे या तिन्ही मतदारसंघात बुजुर्गांच्या तसेच सामाजिक कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या काही संकल्पना लोकांसमोर मांडण्यासाठी प्रचारातील काही दिवस वैभववाडी, देवगडमध्ये मुक्कामही करत आहेत.