शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

 महामार्ग चौपदरीकरणाचे काम जोरात पण धुळीच्या त्रासाने नागरिक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 3:00 PM

कणकवली शहर तसेच परिसरात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या जोरदार सुरू आहे. यासाठी अनेक ठिकाणी मातीचे भराव टाकण्यात आले आहेत. तेथून वाहने जाऊन मोठ्या प्रमाणात धुरळा उडत आहे. त्याचा वाहनचालक व नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असून ते हैराण झाले आहेत. कणकवलीत महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. उड्डाणपुलाचे कामही प्रगतीपथावर आहे. तर सर्व्हिस रोडशेजारी गटार बांधकाम केले जात आहे. त्यामुळे मातीचे खोदकामही होत आहे. याचा परिणाम वातावरणावर होत असून धुळीचे प्रमाण वाढले आहे.

ठळक मुद्दे महामार्ग चौपदरीकरणाचे काम जोरात पण धुळीच्या त्रासाने नागरिक हैराणनागरिकांना करावा लागतो धुळीतून प्रवास; वाहनचालकांसाठी धोकादायक

कणकवली : कणकवली शहर तसेच परिसरात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या जोरदार सुरू आहे. यासाठी अनेक ठिकाणी मातीचे भराव टाकण्यात आले आहेत. तेथून वाहने जाऊन मोठ्या प्रमाणात धुरळा उडत आहे. त्याचा वाहनचालक व नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असून ते हैराण झाले आहेत. कणकवलीत महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. उड्डाणपुलाचे कामही प्रगतीपथावर आहे. तर सर्व्हिस रोडशेजारी गटार बांधकाम केले जात आहे. त्यामुळे मातीचे खोदकामही होत आहे. याचा परिणाम वातावरणावर होत असून धुळीचे प्रमाण वाढले आहे.अनेकवेळा या धुळीमुळे अपघात होत आहेत. धुळीमुळे काहीवेळा वाहन चालकांना दिवसा वाहनांची लाईट चालू ठेवून प्रवास करावा लागतो. भरावाचे काम सुरू असताना धुरळा उडू नये, म्हणून ठेकेदार कंपनीकडून मातीवर पाणी मारणे गरजेचे आहे. काहीवेळा शहरात सर्व्हिस रस्त्यावर पाणी मारले जाते. पण त्यामुळे चिखल झाल्याने वाहने तसेच पादचारी घसरण्याचे प्रकार घडत आहेत. महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात आवश्यकती सुरक्षितता बाळगली जात नसल्याचा आरोपही नागरिकांकडून करण्यात येत आहे.धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास होत आहे. तसेच लहान मुले व वृद्ध यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. महामार्गाच्या जवळ असलेले दुकान व घरांमध्ये धूळ उडत आहे. त्यामुळे ग्रामस्थ व व्यापारीही हैराण झाले आहेत. महामार्गाच्या दोन्ही सर्व्हिस रोडवरून गटाराचे काम सुरु असल्याने वाहन चालविणे धोकादायक बनले आहे. धुळीमुळे वाहने सावकाश चालवावी लागत असल्याने अनेक नोकरदार व्यक्तींना कामावर वेळेत पोहोचता येत नाही. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान होत आहे.कणकवली शहरातील उडणाऱ्या धुरळ्यावर उपाययोजना करण्याची आवश्यकतामुंबई-गोवा महामार्गावर कणकवली शहरातील चौपदरीकरण कामामुळे प्रचंड धुरळा उडत आहे. त्यामुळे प्रवासी व वाहनचालक बेजार झाले आहेत. धुरळ्यामुळे समोरील वाहन दिसत नाही. त्यामुळे अपघाताचा धोका आहे. ठेकेदाराने वेळीच या संदर्भात योग्य उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

टॅग्स :highwayमहामार्गsindhudurgसिंधुदुर्ग