शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

येत्या चार तासात सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पाऊस, सतर्कतेचा इशारा

By सुधीर राणे | Updated: June 28, 2023 12:48 IST

जोरदार पावसामुळे नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ

कणकवली : राज्यात मान्सूनच्या आगमनानंतर जोरदार पावसाची वाट शेतकरी राजा पाहत होता. मात्र, शनिवारी जोराचा पाऊस झाल्यानंतर इतर दिवशी तुरळक सरीच कोसळत होत्या. मात्र, काल मंगळवारी रात्रीपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे. दरम्यान, मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांत येत्या तीन-चार तासात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने  वर्तवली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला ३० जून पर्यंत ऑरेंज अलर्ट दिला आहे. मंगळवारी रात्रीपासून  सुरू झालेल्या पावसाने अनेक सखल भागात पाणी साचले आहे. तसेच सध्या भात शेतीच्या कामांना जिल्ह्यात वेग आला आहे.मुसळधार पावसाच्या अनुषंगाने नागरिकांना तसेच सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आले आहेत. जोरदार पावसामुळे नद्यांच्या पाण्याच्या पातळीत हळूहळू वाढ होत आहे. सलग आठवडाभर जोरदार पाऊस झाल्यास नदी, ओहोळामधील पाणी वाढणार आहे. पावसाने जोर धरल्याने नागरिकांना पाणी टंचाई पासून मुक्ती मिळणार आहे. मालवण तालुक्यात सर्वाधिक पाऊसजिल्ह्यात आज, बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चौवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक ११५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ८७.९ मिलीमीटर पाऊस झाला असून एकूण सरासरी ३२८.६ मिलीमीटर पाऊस झाला आहे.तालुका निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे (कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात)देवगड ९८.४ (२९३.४), मालवण ११५ (३४४.४), सावंतवाडी १०७.५ (४३१.०), वेंगुर्ला ७३.० (२८४.७), कणकवली ६०.७ (२८४.३), कुडाळ ८९.५ (३४२.१), वैभववाडी ७३.० (२९३.७), दोडामार्ग ७४.८ (३६०.८) असा पाऊस झाला आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊस