शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

भल्या पहाटे कणकवलीतील रामेश्वर प्लाझा इमारतीत भरले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 15:40 IST

Kankavli Rain Sindhudurg : गेले 3 दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने आपला जोर वाढविला असून कणकवली शहरात सलग तिसऱ्या दिवशी पुन्हा पहाटे ४ वाजता रामेश्वर प्लाझा इमारतीच्या तळमजल्यावर पाणी भरले.

ठळक मुद्देभल्या पहाटे कणकवलीतील रामेश्वर प्लाझा इमारतीत भरले पाणी नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी केली ऑन द स्पॉट पाहणी

कणकवली : गेले 3 दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने आपला जोर वाढविला असून कणकवली शहरात सलग तिसऱ्या दिवशी पुन्हा पहाटे ४ वाजता रामेश्वर प्लाझा इमारतीच्या तळमजल्यावर पाणी भरले.

गेले तीन-चार दिवस कोसळणार्‍या पावसामुळे मोठ्या प्रमाणात लगतच्या नाल्यांमध्ये पाणी आले होते. मात्र गोकुळधाम हॉटेलच्या बाजूला पाणी विसर्ग होत असलेल्या तोंडावर महामार्ग ठेकेदारांने सेंट्रींग साहित्य न काढल्यामुळे पुन्हा एकदा पाणी तुंबले.

इमारतीच्या तळमजल्यावर सारस्वत बँक एक हॉटेल व निवासी संकुल असल्याने काही भागात पाणी गेल्यामुळे मोठे नुकसान झाले. तळमजल्याला पाणी भरल्याने जीव मुठीत धरुन आपली वाहने पार्किंग मधून बाहेर काढली. लगेचच वीज पुरवठा खंडित करण्यात आल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

जवळील नाल्याचे पाणी नाल्या मधून बाहेर पडत बिल्डिंगच्या तळमजल्यावर आले पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे तिथे असणारा डायनिंग हॉल दुकाने तसेच घरामध्ये सर्वच ठिकाणी तळमजल्याला पाणी साचले यावेळी लगेचच तेथील रहिवाशांनी स्थानिक प्रशासन म्हणजे तहसीलदार कार्यलय, नगरपंचायत यांना कळवले व आपली वाहने तिथून सुरक्षित ठिकाणी लावली पण सकाळी सात वाजेपर्यंत पाणी ओसरले तरीही कोणतीही प्रकारची आपत्कालीन मदत येथे उपलब्ध न झाल्याने तेथील रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

यावेळी संजय राणे, अमोल कोळी, अशोक कदम ,पांडुरंग कुलकर्णी, अरुण चव्हाण, सुभाष सावंत, माधव कदम, सुनील कदम, अमित दळवी उपस्थित होते.

महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांनी केलेले दुर्लक्षमुळे पाणी थेट रामेश्वर प्लाझा इमारतीमध्ये घुसल्याने वाहने पाण्यात अडकली होती. मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण ठेकेदार दिलीप बिल्डकॉन यांच्या गलथान कारभाराचा कणवलीकरांना यावर्षी पुन्हा त्रास भोगावा लागला आहे.

कणकवली महामार्ग उड्डाणपुलाचे काम आटोपल्यानंतर कणकवली शहरातील गटारे व नाले विसर्ग चांगल्या पद्धतीने करण्याची गरज होती. मात्र ठेकेदार कंपनीने काम संपल्याने काढता पाय घेतला आहे. त्याचा फटका या ठिकाणी पहिल्याच पावसात या भागातील नागरिकांना बसला आहे. त्याचबरोबर अन्यही कणकवली शहरातील नाले गटारे अर्धवट टाकून बिल्डकॉनच्या अधिकाऱ्यांनी पळ काढला आहे.

अनेकदा सत्ताधारी व विरोधकांनी आवाज उठवून देखील त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे जाणवत आहे. पावसाच्या सुरवातीलाच अशी अवस्था होत असेल तर पुढील दिवसात काय होईल याची चिंता सतावू लागली आहे. गत वर्षी पावसाच्या पाण्याने नागरिकांचे हजारो रुपयांचे नुकसान केले होते.त्यामुळे निदान यावर्षी तरी काळजी घेणे आवश्यक बनले आहे.

नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी केली ऑन द स्पॉट पाहणी

 कणकवली शहरातील रामेश्वर प्लाझा इमारतीच्या तळमजल्यावर पहाटे पाणी भरल्याचे समजल्यानंतर कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी नाल्याची पाहणी केली.

नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी महामार्ग प्राधिकरण कार्यकारी अधिकारी सलीम शेख यांच्याशी चर्चा करत नाल्यातुन पाण्याचा विसर्ग होत नसल्याची समस्या तातडीने सोडवा,अशी मागणी केली.तर नगरपंचायतच्यावतीने हॉटेल गोकुळधाम येथील अडकलेली सेन्ट्रीगच्या फळ्या हटविण्यात आल्या आहेत.

कणकवली शहरातील अन्य काही ठिकाणी पाण्याचा विसर्ग होत नसल्याचा प्रश्‍न निर्माण झाला होता. त्या ठिकाणची पाहणी नगरपंचायतच्यावतीने करण्यात आली. त्याचबरोबर ज्या समस्या कणकवली शहरात आहेत, त्या संदर्भात महामार्ग प्राधिकरण व संबंधित ठेकेदार यांनी तातडीने कारवाई करत प्रश्न निकाली करण्याची मागणी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सलीम शेख यांच्याकडे केली आहे.यावेळी गटनेते संजय कामतेकर,अजय गांगण व नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :RainपाऊसKankavliकणकवलीMuncipal Corporationनगर पालिकाsindhudurgसिंधुदुर्ग