शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

भल्या पहाटे कणकवलीतील रामेश्वर प्लाझा इमारतीत भरले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 15:40 IST

Kankavli Rain Sindhudurg : गेले 3 दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने आपला जोर वाढविला असून कणकवली शहरात सलग तिसऱ्या दिवशी पुन्हा पहाटे ४ वाजता रामेश्वर प्लाझा इमारतीच्या तळमजल्यावर पाणी भरले.

ठळक मुद्देभल्या पहाटे कणकवलीतील रामेश्वर प्लाझा इमारतीत भरले पाणी नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी केली ऑन द स्पॉट पाहणी

कणकवली : गेले 3 दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने आपला जोर वाढविला असून कणकवली शहरात सलग तिसऱ्या दिवशी पुन्हा पहाटे ४ वाजता रामेश्वर प्लाझा इमारतीच्या तळमजल्यावर पाणी भरले.

गेले तीन-चार दिवस कोसळणार्‍या पावसामुळे मोठ्या प्रमाणात लगतच्या नाल्यांमध्ये पाणी आले होते. मात्र गोकुळधाम हॉटेलच्या बाजूला पाणी विसर्ग होत असलेल्या तोंडावर महामार्ग ठेकेदारांने सेंट्रींग साहित्य न काढल्यामुळे पुन्हा एकदा पाणी तुंबले.

इमारतीच्या तळमजल्यावर सारस्वत बँक एक हॉटेल व निवासी संकुल असल्याने काही भागात पाणी गेल्यामुळे मोठे नुकसान झाले. तळमजल्याला पाणी भरल्याने जीव मुठीत धरुन आपली वाहने पार्किंग मधून बाहेर काढली. लगेचच वीज पुरवठा खंडित करण्यात आल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

जवळील नाल्याचे पाणी नाल्या मधून बाहेर पडत बिल्डिंगच्या तळमजल्यावर आले पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे तिथे असणारा डायनिंग हॉल दुकाने तसेच घरामध्ये सर्वच ठिकाणी तळमजल्याला पाणी साचले यावेळी लगेचच तेथील रहिवाशांनी स्थानिक प्रशासन म्हणजे तहसीलदार कार्यलय, नगरपंचायत यांना कळवले व आपली वाहने तिथून सुरक्षित ठिकाणी लावली पण सकाळी सात वाजेपर्यंत पाणी ओसरले तरीही कोणतीही प्रकारची आपत्कालीन मदत येथे उपलब्ध न झाल्याने तेथील रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

यावेळी संजय राणे, अमोल कोळी, अशोक कदम ,पांडुरंग कुलकर्णी, अरुण चव्हाण, सुभाष सावंत, माधव कदम, सुनील कदम, अमित दळवी उपस्थित होते.

महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांनी केलेले दुर्लक्षमुळे पाणी थेट रामेश्वर प्लाझा इमारतीमध्ये घुसल्याने वाहने पाण्यात अडकली होती. मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण ठेकेदार दिलीप बिल्डकॉन यांच्या गलथान कारभाराचा कणवलीकरांना यावर्षी पुन्हा त्रास भोगावा लागला आहे.

कणकवली महामार्ग उड्डाणपुलाचे काम आटोपल्यानंतर कणकवली शहरातील गटारे व नाले विसर्ग चांगल्या पद्धतीने करण्याची गरज होती. मात्र ठेकेदार कंपनीने काम संपल्याने काढता पाय घेतला आहे. त्याचा फटका या ठिकाणी पहिल्याच पावसात या भागातील नागरिकांना बसला आहे. त्याचबरोबर अन्यही कणकवली शहरातील नाले गटारे अर्धवट टाकून बिल्डकॉनच्या अधिकाऱ्यांनी पळ काढला आहे.

अनेकदा सत्ताधारी व विरोधकांनी आवाज उठवून देखील त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे जाणवत आहे. पावसाच्या सुरवातीलाच अशी अवस्था होत असेल तर पुढील दिवसात काय होईल याची चिंता सतावू लागली आहे. गत वर्षी पावसाच्या पाण्याने नागरिकांचे हजारो रुपयांचे नुकसान केले होते.त्यामुळे निदान यावर्षी तरी काळजी घेणे आवश्यक बनले आहे.

नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी केली ऑन द स्पॉट पाहणी

 कणकवली शहरातील रामेश्वर प्लाझा इमारतीच्या तळमजल्यावर पहाटे पाणी भरल्याचे समजल्यानंतर कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी नाल्याची पाहणी केली.

नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी महामार्ग प्राधिकरण कार्यकारी अधिकारी सलीम शेख यांच्याशी चर्चा करत नाल्यातुन पाण्याचा विसर्ग होत नसल्याची समस्या तातडीने सोडवा,अशी मागणी केली.तर नगरपंचायतच्यावतीने हॉटेल गोकुळधाम येथील अडकलेली सेन्ट्रीगच्या फळ्या हटविण्यात आल्या आहेत.

कणकवली शहरातील अन्य काही ठिकाणी पाण्याचा विसर्ग होत नसल्याचा प्रश्‍न निर्माण झाला होता. त्या ठिकाणची पाहणी नगरपंचायतच्यावतीने करण्यात आली. त्याचबरोबर ज्या समस्या कणकवली शहरात आहेत, त्या संदर्भात महामार्ग प्राधिकरण व संबंधित ठेकेदार यांनी तातडीने कारवाई करत प्रश्न निकाली करण्याची मागणी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सलीम शेख यांच्याकडे केली आहे.यावेळी गटनेते संजय कामतेकर,अजय गांगण व नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :RainपाऊसKankavliकणकवलीMuncipal Corporationनगर पालिकाsindhudurgसिंधुदुर्ग