शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांचा लागतोय कस

By admin | Updated: January 4, 2015 01:01 IST

वेंगुर्ले नगरपरिषद पोटनिवडणूक : सहा जागांसाठी एकवीस जण रिंगणात

सावळाराम भराडकर ल्ल वेंगुर्लेवेंगुर्ले नगरपरिषदेच्या सहा जागांच्या पोटनिवडणुकीत शिवसेना भाजपा, राष्ट्रीय काँग्रे्रस व राष्ट्रवादी यांच्यातच तिहेरी लढत संभाव्य असली, तरी काही प्रभागामध्ये अपक्षांची ‘काँटे की टक्कर’ असणार, हे निश्चित. मात्र, डिसेंबर २०११ च्या निवडणुकीत एका पक्षात तर या निवडणुकीत दुसऱ्याच पक्षातून, तसेच काही पराभूत उमेदवार परत नशीब आजमावताना दिसत आहेत. नगरपरिषदेच्या स्थिर प्रशासनासाठी व शहराची विकासकामांची गती वाढविण्यासाठी या निवडणुकीत मतदारसंघाची कसोटी लागणार आहे. वेंगुर्ले नगरपरिषदेची निवडणूक २२ डिसेंबर २०१२ रोजी झाली. त्यावेळी राड्याचे प्रकरण काँग्रेसला भोवले व वेंगुर्लेवासीयांनी तत्कालीन आमदार दीपक केसरकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्ट बहुमत दिले. यावेळी नम्रता कुबल नगराध्यक्षपदी, तर राष्ट्रवादीला साथ देणारे अपक्ष रमण वायंगणकर उपनगराध्यक्षपदी विराजमान झाले. मात्र, त्यांचा कार्यकाल संपताच ९ जुलै २०१३ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीतच नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष निवडीवरून दोन गट निर्माण झाले. दोन्ही गटांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवार उभे केले. यात पूजा कर्पे नगराध्यक्षपदी, तर गटनेते वामन कांबळी उपनगराध्यक्षपदी विराजमान झाले. दोन्ही गटांनी एकमेकांवर व्हीप डावलण्याचा ठपका ठेवत जिल्हाधिकाऱ्यांकडे दावा केला. जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांनी त्यावेळी १२ नगरसेवकांना अपात्र ठरविले. मात्र, उच्च न्यायालयात स्टेविषयी धाव घेतली होती. न्यायालयाने सात नगरसेवकांचे निलंबन केले. याच सात जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. मात्र, प्रभाग क्र. ४ मधील एका जागेसाठीचे दोन्ही अर्ज अवैध ठरल्याने ही निवडणूक सहा जागांसाठी होणार आहे. सध्या परिषदेत भाजपचे दोन नगरसेवक आहेत. परंतु भाजपा सेनेच्या मदतीने युती झालेली असल्याने राज्यात व केंद्रात भाजपची सत्ता व नरेंद्र मोदी तसेच देवेंंद्र फडणवीस यांचा प्रभाव शहरातील मतदारांवर कायम राहिल्यास सेना-भाजप युती वेंगुर्ले नगरपरिषदेच्या सत्तेत येऊ शकते. तर राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष प्रसन्ना कुबल हे मात्र आपले बहुमत राखण्यासाठी जिल्हा राष्ट्रवादीच्या मदतीने ‘एकला चलो’ची भूमिका त्यांच्या कितपत पथ्यावर पडते व मतदार संधी देतील का? याबाबत मतदार राजा भविष्य ठरविणार आहे. तिरंगी लढतीने चुरस वाढली सात जागांसाठी काँग्रेस ६ व राष्ट्रवादी ५ स्वबळावर लढणार असून शिवसेना-भाजपाची युती असणार आहे. यामध्ये शिवसेना चार प्रभागात, तर भाजपा तीन प्रभागात निवडणूक लढविणार आहे. तर तीन जागा अपक्ष उमेदवार लढणार आहेत. त्यामुळे काही प्रभागात अडसर ठरणार आहे. ५/१२ चा प्रभाव पालिके च्या या निवडणुकीत दिसल्यास काँग्रेसला अधिक नगरसेवक विजयी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मेहनत करावी लागणार आहे. त्यामुळे सेना-भाजप व राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यातच तिरंगी लढत होणार आहे. मात्र, काही प्रभागात अपक्षांचेही वर्चस्व आहे.