शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

शैक्षणिक प्रक्रिया ठप्प

By admin | Updated: December 2, 2014 00:30 IST

महेंद्र नाटेकर : संस्थाचालकांच्या सभेत आरोप

कणकवली : इंग्रजी शिक्षणाचे स्तोम माजवल्यामुळे शैक्षणिक प्रक्रिया ठप्प झाली आहे. विनाअनुदान तत्त्वामुळे भ्रष्टाचार बोकाळला असून गरीब विद्यार्थी शिक्षणाच्या बाहेर फेकला जात आहे. शाळा अंतर्गत २० टक्के गुणदान योजनेमुळे शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला आहे. महाराष्ट्रात शैक्षणिक अराजक माजले असून त्याला बेजबाबदार राज्यकर्तेच जबाबदार आहेत, अशी टीका शिक्षण तज्ज्ञ प्राचार्य महेंद्र नाटेकर यांनी केली आहे.
जांभवडे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षक, पालक व संस्थाचालकांची नुकतीच सभा आयोजित केली होती. यावेळी प्रा. नाटेकर बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन सुभाष मडव होते. प्रा. नाटेकर म्हणाले, शिक्षण देणे म्हणजे सुसंस्कार करणे, मातृभाषेतून दिलेले शिक्षण विद्यार्थ्यांच्या हृदयाला भिडते. मुलांच्या मनावर सुसंस्कार होतात. त्यांच्यातील सुप्तगुण विकसीत होऊन विविधांगी व्यक्तिमत्त्व खुलते. शिक्षणातून माणूस घडविला जातो.
नाटेकर म्हणाले, विद्यार्थ्यांची गळती थांबविण्यासाठी परीक्षा रद्द करणे, शिक्षणावरील खर्च वाया जाऊ नये म्हणून तसेच शैक्षणिक दर्जा उंचवावा म्हणून प्रत्येक विषयात प्रत्येक विद्यार्थ्याला २० टक्के गुण देणे हे अशैक्षणिक व अडाणीपणाचे निदर्शक आहे. शिक्षकेतर अनुदान दिले जात होते म्हणून विशेषत: आर्थिक मागासलेल्या कोकणातही हायस्कूल, महाविद्यालयेही सुरू झाली. परंतु ते अनुदान मायबाप सरकारने बंद केल्याने संस्थाचालकांना शैक्षणिक साहित्य खरेदी करता येत नाही. त्यामुळे ही शैक्षणिक दर्जा खालावत आहे. शैक्षणिक अराजक मोडून काढून उच्च शैक्षणिक दर्जा निर्माण करायचा असेल तर इंग्रजी माध्यमाच्या शाळा बंद करून मराठी माध्यमाच्या शाळांतून इंग्रजी विषय शिकवा. राष्ट्राचे भवितव्य शिक्षणावर अवलंबून असल्याने लहरी राजकारण्यांवर अवलंबून शिक्षण खाते न ठेवता स्वायत्त शिक्षण तज्ज्ञांच्या मंडळाकडे सुपूर्द करा. बेजबाबदार राज्यकर्त्यांच्या हाती शिक्षण म्हणजे माकडाच्या हाती कोलीतच दिल्यासारखे आहे, असा आरोप त्यांनी केला. सुभाष मडव यांनी मनोगत व्यक्त केले. आभार प्राचार्य वागरे यांनी केले. (प्रतिनिधी)


जनता फार काळ सहन करणार नाही
ज्ञानविज्ञानासाठी जागतिक भाषा म्हणून मराठी माध्यमांच्या शाळांतून अनिवार्य भाषा म्हणून इंग्रजी अध्ययन- अध्यापन झाले पाहिजे. मात्र मातृभाषेचे स्थान इंंग्रजी घेऊ शकत नाही. ही वस्तुस्थिती असताना आज महाराष्ट्रामध्ये इंग्रजी माध्यमाचे पेव फुटले आहे ते नोकरी-धंदा मिळवून उदरभरण करण्याच्या आशेने, मृगजळाने. राज्यकर्ते आणि दांभिक संस्थाचालक इंग्रजी माध्यमाच्या शाळा चालवून स्वत:च्या तुंबड्या भरत आहेत. सूज्ञ जनता हे फार काळा सहन करणार नाही, असे ते म्हणाले.