शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पावणेसहा कोटींचा आराखडा

By admin | Updated: January 29, 2015 00:12 IST

पाणीटंचाई : जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समिती सभेत माहिती

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३ गावे ६५८ वाड्यांचा ५ कोटी ७५ लाख रुपयांचा पाणीटंचाई आराखडा तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला असून मंजुरी मिळाल्यानंतर या कामांना सुरुवात केली जाणार असल्याची माहिती सभेत देण्यात आली.जिल्हा परिषदेची जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची सभा जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडली. यावेळी उपाध्यक्ष रणजित देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, वित्त व बांधकाम सभापती संजय बोंबडी, महिला व बालविकास सभापती स्नेहलता चोरगे, सदस्य जनार्दन तेली, राजेंद्र रावराणे, वासुदेव परब, भारती चव्हाण, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावर्षीचा संभाव्य पाणीटंचाई आराखडा जाहीर करण्यात आला असून यात ३ गावे व ६५८ वाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. या आराखड्यासाठी ५ कोटी ७५ लाख १० हजार रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. सर्व तालुक्यातील पाणीटंचाई आराखड्यात समाविष्ट असणाऱ्या गावांच्या कामांची अंदाजपत्रके प्राप्त झाली असून ती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला असल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत देण्यात आली. तसेच या आराखड्याला मान्यता मिळाल्यानंतर कामांना सुरुवात केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (वार्ताहर)देवगड येथील शिक्षण विकास मंडळाच्या महाविद्यालयामध्ये परजिल्ह्यातील २७०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, त्यांना पाण्याची सोय नाही. संबंधित संस्थेने पैसे भरूनही अद्याप पाणी मिळत नाही. याकडे सदस्य जनार्दन तेली यांनी सभागृहाचे लक्ष वेधले असता विद्यार्थी पाण्यापासून वंचित राहू नये यासाठी तत्काळ पाण्याची सोय उपलब्ध करून द्या असे आदेश अध्यक्ष संदेश सावंत यांनी दिले.देवगड व विजयदुर्ग प्रादेशिक नळपाणी योजना तोट्यात चालविली जात आहे. या दोन्ही योजना सुरु ठेवण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाला निधीची कसरत करावी लागत आहे. या योजनांची पाणीपट्टी वसुली होत नाही. दोन्ही नळपाणी योजनांवर ९५ लाख रुपये खर्च झाला असून पाणीपट्टीमार्फत होणारी वसुली मात्र १६ लाख रुपये आहे. त्यामुळे या योजना तोट्यात चालविल्या जात आहेत.जिल्ह्यात संपूर्ण स्वच्छता अभियानांतर्गत शौचालयाची बांधकामे मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहेत. परंतु आता शौचालयाच्या टाक्या तुंबल्या आहेत. तरी या टाक्या साफ करण्यासाठी व मैला उचलण्यासाठी वाहन खरेदीसाठी निधी मिळावा असा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे करण्यात यावा असा ठराव करण्यात आला. (प्रतिनिधी)१0२ शाळांत पाण्याचा ठणठणाटसिंंधुदुर्ग जिल्ह्यात १४६८ शाळा असून त्यापैकी १०२ शाळांमध्ये मे अखेर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित होत असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी रत्नाकर धाकोरकर यांनी दिली. शिक्षणाचा अधिकार या कायद्यानुसार सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मुबलक प्रमाणात पिण्याच्या पाण्याची सोय होणे अनिवार्य असताना जिल्ह्यात काही वेगळेच चित्र दिसून येत आहे. अशा शाळा टंचाई आराखड्यात प्राधान्याने घ्याव्यात व विद्यार्थ्यांना पाण्याची व्यवस्था करा असे आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला दिले.२00 विहिरी दूषितसिंधुदुर्ग जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील १९०० शासकीय विहिरींचे पाणी नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी २०० पाणी नमुने दूषित आढळले असून हे सर्व पाणी नमुने पुन्हा शुद्ध करून पाणी पिण्यायोग्य केले असल्याची माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली.