शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

बदलत्या हवामानाने जिल्हा कोलमडला

By admin | Updated: March 3, 2015 00:33 IST

पावसाने रडवले : वार्षिक गणितं मांडणाऱ्या बागायतदारांचे भविष्य अवघड वळणावर...

रत्नागिरी : जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचे ७२.६३ टक्के, तर काजूचे ६१.२० टक्के इतके नुकसान झाले आहे. पावसामुळे मोहोर कुजण्याबरोबर भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतकरीनिहाय पंचनाम्याचे आदेश देण्यात आले आहेत.जिल्ह्याला अर्थार्जन मिळवून देणारे आंबापीक असून, जिल्ह्यात एकूण ६५ हजार १०९ हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकाची लागवड करण्यात आली आहे. पैकी ५८ हजार ८३७ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम असून ४२ हजार ७३५ हेक्टर क्षेत्रावर पावसामुळे परिणाम झाला आहे, पीक धोक्यात आले आहे. सतत दोन दिवस कोसळलेल्या पावसामुळे फुलोरा धुवून निघाला आहे. शिवाय ज्या फुलोऱ्याला कणी ते सुपारीएवढी फळधारणा झाली होती, त्या फुलोऱ्यामध्ये पाणी साचून कुजण्याबरोबर फळे गळून पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. शिवाय जो आंबा मोठा होता त्या आंब्यावर काळे डाग पडण्याबरोबर आंबा देठाजवळ कुजून गळण्याचा संभव आहे. शिवाय भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. जिल्ह्यातील ९१ हजार ५३० हेक्टर क्षेत्रावर काजूची लागवड करण्यात आली आहे. ८३ हजार २९२ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम असून ५० हजार ९७६ हेक्टर क्षेत्र पावसामुळे बाधित झाल्याने पीक धोक्यात आले आहे. काजूचा फुलोरा पावसामुळे गळून पडला आहे. शिवाय काजू बीमध्ये पाणी गेल्याने बी टपोरी होणार आहे. संबंधित बी वाळविली तरी गराचा आकार, रंग व चवीवरही परिणाम होणार आहे. पांढऱ्या रंगाऐवजी गर पिवळट पडण्याचा धोका आहेच, शिवाय तुकडा पडण्याची शक्यता अधिक आहे. कृषी विभागाने नुकसानक्षेत्र जाहीर केले असले तरी शेतकरीनिहाय पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ग्रामसेवक, कृषिसेवक व कृषी अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)सोसाट्याचा वारा आणि पावसात मासेमारीच बुडालीप्रकाश वराडकर ल्ल रत्नागिरीअवकाळी पाऊस व हवामानातील बदलामुळे गेल्या आठवडाभरात जिल्ह्यातील मच्छिमारीला मोठा फटका बसला आहे. गेल्या दोन दिवसांतील पावसाने तर मच्छिमारी नौकाच बंदरात उभ्या करून ठेवाव्या लागल्याने मच्छिमारी व्यवसायातील सुमारे पाच कोटींची आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे. त्यामुळे मच्छिमार हवालदील झाले आहेत. यामुळे बाजारपेठेतही मासळीची टंचाई निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील हर्णै, दाभोळ, जयगड, मिरकरवाडा, पावस, तुळसुंदे, राजीवडा, नाटे यांसारख्या मच्छिमारी बंदरात साडेचार हजारांवर मोठ्या यांत्रिक मच्छिमारी नौका आहेत. छोट्या नौका ३ हजारांवर आहेत. बिगर यांत्रिकी नौका १२०० असून, गेल्या दोन दिवसांतील पावसामुळे खोल समुद्रात मासेमारीला न जाता या नौका संबंधित बंदरात नांगरून ठेवण्यात आल्या होत्या. रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदर हे मोठे मासेमारी बंदर म्हणून ओळखले जाते. गेल्या दोन दिवसात या बंदरातील नौकाही नांगरून ठेवणेच मच्छिमारांनी पसंत केले. सहा वर्षांपूर्वीच्या फयान वादळाच्या वेळी ज्या दुर्घटना खोल समुद्रात घडल्या होत्या, त्यामुळे मच्छिमार नेहमीच सावध राहणे पसंत करतात. याबाबत माहिती देताना मच्छिमार नेते आप्पा वांदरकर यांनी सांगितले की, गेले दोन महिने वातावरणात सातत्याने चढ-उतार होत आहेत. त्यामुळे सुरमई, पापलेट, हालवा, मोडोसा यांसारखे चवीचे मासे मिळण्याचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. गेल्या दोन दिवसात पावसामुळे तर मच्छिमारी नौका खोल समुद्रात गेल्याच नाहीत. त्यामुळे मच्छिमारी व्यवसायाची काही कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. मासेमारी नौकांवर काम करणाऱ्या खलाशांचा पगार मात्र द्यावाच लागतो. त्यामुळे वातावरण लवकरात लवकर नॉर्मल होऊन पूर्ण क्षमतेने मासेमारी सुरू होण्याची मच्छिमारांना प्रतीक्षा आहे.