शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
3
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
4
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
5
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
6
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
7
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
8
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
9
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
10
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
11
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
12
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
13
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
14
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
15
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
16
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
17
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
18
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
19
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
20
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!

देवगड हापूस आंब्याच्या मोहरावर आता फळमाशीचे नवे संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 13:42 IST

फळमाशीवर वेळीच संशोधन होऊन कृषी विभागाने लक्ष देऊन औषधांचे संशोधन करणे गरजेचे

अयोध्याप्रसाद गावकरदेवगड : देवगड हापूस आंब्यावर  नवीन येणारी संकटे आणि त्यामधील कृषी विभागाचा नाकर्तेपणा आंबा बागायतदारांच्या मुळाशी येऊन ठेपला आहे. आंबा मोहरावर २० वर्षांपूर्वी खार या चिकट द्रव्याने थैमान घालून आंबा मोहराचे प्रचंड प्रमाणात नुकसान केले होते. यानंतर थ्रीप्सने बागायतदारांना हतबल केले होते. या दोन्ही रोगांवर नवनवीन औषधे आल्याने ते नियंत्रणामध्ये आले. मात्र आता पुन्हा एकदा अवकाळी पावसामुळे फळमाशीचे संकट निर्माण झाले आहे. यामुळे आंबा बागायतदारांसमोर नवीन संकटच उभे राहिले आहे.अनेक प्रकारच्या रोगामुळेच महागडी कीटकनाशके बागायतदारांना फवारणी करावी लागत होती. यामुळे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त अशी अवस्था आंबा बागायतदारांची थ्रीप्स या रोगाने केली होती. आता थ्रीप्सवर देखील अनेक औषधे निर्माण झाल्याने हा रोग आटोक्यात येत असताना पुन्हा आंबा बागायतदारांसमोर फळमाशी हे मोठे संकट गेल्यावर्षीपासून उभे येऊन ठेपले आहे. या फळमाशीचा याहीवर्षी प्रादुर्भाव निर्माण झाला तर कोणती औषधे कृषी विभागाकडून संशोधन करून निर्माण केली जातात. याकडे बागायतदारांचे लक्ष लागून राहिले आहे.वेळीच संशोधन करणे गरजेचेफळमाशी ही अवकाळी पावसामुळे निर्माण झाली आहे. गेल्यावर्षी मोहर आल्यानंतर डिसेंबर ते मार्च महिन्यांमध्ये अधूनमधून अवकाळी पाऊस पडत राहिल्यामुळे फळमाशीचा प्रादुर्भाव वाढला होता. या फळमाशीवर वेळीच संशोधन होऊन कृषी विभागाने लक्ष देऊन औषधांचे संशोधन करणे गरजेचे आहे. या फळमाशीचा आंबा पिकाबरोबर केळी, चिकू व अन्य फळांवर देवगड तालुक्यामध्ये परिणाम दिसून आला होता. त्यामुळे कृषी विभागाने याकडे लक्ष देणे गरजेेचे आहे.कोकणातील बागायतदार देताहेत एकाकी झुंजखार, थ्रीप्स या आंबा पीक नष्ट करणाऱ्या रोगानंतर फळमाशीचे संकट आंबा बागायतदारांसमोर येऊन ठेपले असताना याकडे राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळे कोकणातील बागायतदारांना एकाकी झुंज द्यावी लागत आहे. आंबा बागायतदारांचे प्रश्न विधानसभेमध्ये चर्चिले जाणे महत्त्वाचे आहे. मात्र, राजकीय इच्छाशक्तीच कोकणातील शेतकऱ्यांना कमी पडत आहे. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा येथील शेतकऱ्यांच्या बाजूने तेथील लोकप्रतिनिधी नेहमीच उभे राहतात.

देवगड तालुक्यामध्ये विजयदुर्ग, गिर्ये येथे कोकण कृषी विद्यापीठाचे रामेश्वर फळ संशोधन उपकेंद्र आहे. मात्र, या संशोधन केंद्राच्या माध्यमातून बागायतदारांच्या फळांवर येणाऱ्या रोगांचे संशोधनच केले जात नाही. त्यामुळे दिखावूपणामध्ये असलेले फळसंशोधन केंद्र शेतकऱ्यांचे हित जोपासत नसेल तर हे केंद्र शोभेचेच कित्येक वर्षापासून ठरत आहे

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMangoआंबाFarmerशेतकरी