शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

देवगड हापूस आंब्याच्या मोहरावर आता फळमाशीचे नवे संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 13:42 IST

फळमाशीवर वेळीच संशोधन होऊन कृषी विभागाने लक्ष देऊन औषधांचे संशोधन करणे गरजेचे

अयोध्याप्रसाद गावकरदेवगड : देवगड हापूस आंब्यावर  नवीन येणारी संकटे आणि त्यामधील कृषी विभागाचा नाकर्तेपणा आंबा बागायतदारांच्या मुळाशी येऊन ठेपला आहे. आंबा मोहरावर २० वर्षांपूर्वी खार या चिकट द्रव्याने थैमान घालून आंबा मोहराचे प्रचंड प्रमाणात नुकसान केले होते. यानंतर थ्रीप्सने बागायतदारांना हतबल केले होते. या दोन्ही रोगांवर नवनवीन औषधे आल्याने ते नियंत्रणामध्ये आले. मात्र आता पुन्हा एकदा अवकाळी पावसामुळे फळमाशीचे संकट निर्माण झाले आहे. यामुळे आंबा बागायतदारांसमोर नवीन संकटच उभे राहिले आहे.अनेक प्रकारच्या रोगामुळेच महागडी कीटकनाशके बागायतदारांना फवारणी करावी लागत होती. यामुळे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त अशी अवस्था आंबा बागायतदारांची थ्रीप्स या रोगाने केली होती. आता थ्रीप्सवर देखील अनेक औषधे निर्माण झाल्याने हा रोग आटोक्यात येत असताना पुन्हा आंबा बागायतदारांसमोर फळमाशी हे मोठे संकट गेल्यावर्षीपासून उभे येऊन ठेपले आहे. या फळमाशीचा याहीवर्षी प्रादुर्भाव निर्माण झाला तर कोणती औषधे कृषी विभागाकडून संशोधन करून निर्माण केली जातात. याकडे बागायतदारांचे लक्ष लागून राहिले आहे.वेळीच संशोधन करणे गरजेचेफळमाशी ही अवकाळी पावसामुळे निर्माण झाली आहे. गेल्यावर्षी मोहर आल्यानंतर डिसेंबर ते मार्च महिन्यांमध्ये अधूनमधून अवकाळी पाऊस पडत राहिल्यामुळे फळमाशीचा प्रादुर्भाव वाढला होता. या फळमाशीवर वेळीच संशोधन होऊन कृषी विभागाने लक्ष देऊन औषधांचे संशोधन करणे गरजेचे आहे. या फळमाशीचा आंबा पिकाबरोबर केळी, चिकू व अन्य फळांवर देवगड तालुक्यामध्ये परिणाम दिसून आला होता. त्यामुळे कृषी विभागाने याकडे लक्ष देणे गरजेेचे आहे.कोकणातील बागायतदार देताहेत एकाकी झुंजखार, थ्रीप्स या आंबा पीक नष्ट करणाऱ्या रोगानंतर फळमाशीचे संकट आंबा बागायतदारांसमोर येऊन ठेपले असताना याकडे राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळे कोकणातील बागायतदारांना एकाकी झुंज द्यावी लागत आहे. आंबा बागायतदारांचे प्रश्न विधानसभेमध्ये चर्चिले जाणे महत्त्वाचे आहे. मात्र, राजकीय इच्छाशक्तीच कोकणातील शेतकऱ्यांना कमी पडत आहे. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा येथील शेतकऱ्यांच्या बाजूने तेथील लोकप्रतिनिधी नेहमीच उभे राहतात.

देवगड तालुक्यामध्ये विजयदुर्ग, गिर्ये येथे कोकण कृषी विद्यापीठाचे रामेश्वर फळ संशोधन उपकेंद्र आहे. मात्र, या संशोधन केंद्राच्या माध्यमातून बागायतदारांच्या फळांवर येणाऱ्या रोगांचे संशोधनच केले जात नाही. त्यामुळे दिखावूपणामध्ये असलेले फळसंशोधन केंद्र शेतकऱ्यांचे हित जोपासत नसेल तर हे केंद्र शोभेचेच कित्येक वर्षापासून ठरत आहे

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMangoआंबाFarmerशेतकरी